Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात 109 गावांमध्ये राबविली जाणार 'अटल भूजल योजना'

नगर जिल्ह्यात 109 गावांमध्ये राबविली जाणार ‘अटल भूजल योजना’

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याचा विचार करुन भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उपलब्धता वाढविण्यासाठी राज्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रातील ठराविक 13 जिल्ह्यांमधील 1339 ग्रामपंचायतीं मधील1443 गावांमध्ये केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत ‘अटल भूजल योजना’ केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्पाची (सुधारित नाव अटल भूजल योजना) घोषणा केंद्र शासनाद्वारे सन 2016-17 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी करण्यात आली आहे. केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील महाराष्ट्र राज्यासह अन्य सात राज्यांमध्ये 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून त्याची अधिकृत घोषणा दि.25 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक आहे. भूजल उपशामध्ये फळ बागायत तसेच कृषी क्षेत्राकरिता होणारा उपसा देखील अधिक आहे. परिणामी या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पाणलोटक्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहेत. अशा भागातील सिंचन विहिरींची क्षमता कमी झाल्यामुळे खोल विंधन विहिरींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विपरीत परिणाम भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर होत आहे. राज्यातील भूजल पुनर्भरणाची मर्यादा लक्षात घेता भूजल उपशावर मागणी आधारित व्यवस्थापना द्वारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने महाराष्ट्र राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन मंत्रीमंडळाच्या दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व भूजलाची गुणवत्ता व उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राज्यात ठराविक 13 जिल्ह्यांमधील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतीमधील 1443 गावांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेमध्ये केंद्र शासन व जागतिक बँक यांचा वाटा 50:50 असा आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याला प्राप्त होणारा अधिकतम निधी एकूण रु.925.77 कोटी इतका असून, राज्यास प्राप्त होणारा संपूर्ण निधी हा अनुदान व प्रोत्साहन स्वरूपात प्राप्त होणार आहे. अटल भूजल योजना राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.

अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे कार्यक्षेत्र…

केंद्र शासन तसेच जागतिक बँकेच्या निर्देशांप्रमाणे प्रकल्पाकरिता क्षेत्र निवड करताना राज्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशत: शोषित पाणलोटक्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, राज्यातील सन 2013 च्या भूजल अंदाज अहवालानुसार अति-शोषित(74), शोषित (04) आणि अंशत: शोषित(111) असलेल्या एकूण 189 पाणलोट क्षेत्रांपैकी 13 जिल्ह्यांतील 38 तालुक्यातील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतीमधील 1443 गावांची निवड करण्यात आली आहे.

अ.क्र.- जिल्हा – तालुके संख्या – पाणलोट क्षेत्र सांख्या – ग्रामपांचायत संख्या – गावांची सांख्या

1) पुणे – 03 – 05 – 110 -118

2) सातारा – 03 – 03 – 114 -114

3) साांगली – 04 – 06 – 93 – 93

4) सोलापूर- 04 – 05 – 115 -117

5) नाशिक – 02 – 09 – 116 – 129

6) अहमदनगर – 03 – 06 -101 -109

7) जळगाव – 04 – 06 – 101 – 114

8) जालना – 03 – 05 – 50 – 50

9) लातूर – 04 – 09 – 121 – 136

10) उस्मानाबाद–02–07–55–55

11) अमरावती–03–06–217–217

12) बुलढाणा – 01 – 04 – 68 – 68

13) नागपूर – 02 – 02 – 78 -123

एकूण – 38 – 73- 1339 – 1443

अटल भूजल योजनेत समाविष्ट असलेली नगर जिल्ह्यातील गावे

कर्जत तालुका (24 गावे) – अखोणी, येसवाडी, बेनवाडी, कोळवाडी, भांडेवाडी, चिलवडी, होळेवाडी, देशमुखवाडी, दुरगाव, काळ्याची वाडी, कानगुडवाडी, कारभानवाडी, कारपडी, नेटकेवाडी, नंदगाव, परीटवाडी, पिंपळवाडी, राशीन, रेहकुरी, सोनलवाडी, थेरवाडी, तोरकडवाडी, वडगाव तनपुरे, वायसेवाडी.

राहाता तालुका (09गावे) – भगवतीपूर, चंद्रपूर, गोगलगाव, हणमंतगाव, हसणापुर, लोहगाव,लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, पाथरे बुद्रुक.

संगमनेर तालुका (76गावे) – अंभोरे,अश्वी बुद्रुक, अश्वी खुर्द, औरंगपूर, चंदनापूरी, गभानवाडी, चिकणी, चिंचपूर खुर्द, चिंचपूर बुद्रुक, दाढ बुद्रुक, देवगाव, दाढ खुर्द, दिग्रस, दुर्गापूर, घुलेवाडी, गुंजाळवाडी, हंगेवाडी, हिवरगाव पावसा, जाखोरी, जोरवे, कणकापूर, कानोली, गुंजाळवाडी, करजुले पठार, कारुळे, कासारदुमला, खळी,खांडगाव,खांजापूर, खर्डी,कोकणगाव, शिवापूर, कोल्हेवाडी, कोलवाडे,कोंची,मानची, कुरण, मलदाड, मालेगाव हवेली,मालुंजे, मंगलापूर, मानोली, निलवंडे, निंभाळे, निमगाव भोजपूर,निमगाव जाली, निमगाव टेंभी, ओझर बुद्रुक,ओझर खुर्द, पानोडी, पिंपळगाव ढेपा, पिंपरणे, पिंपरीलौकी, पोखरी बाळेश्वर,पोखरी हवेली, प्रतापूर, रहीमपूर, राजापूर,रायते, रायतेवाडी, सादतपूर, समनापूर, संगमनेर खुर्द, वैदूवाडी, सावरगाव ताल, सायखिंडी, शेडगाव, शिबलापूर, सोनोशी, सुकेवाडी, बाळापूर,उंबरी, वडगाव पान, वाघापूर, वेल्हाळे,झोल.

- Advertisment -

ताज्या बातम्या