नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जेतेपदानंतर बंगळुरूमध्ये काढलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून आता पहिली अटक झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा मार्केटिंग हेड निखिल सोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पोलिसांना चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरले होते. पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आले आहे.
निखिल मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते असा दावा केला जात आहे. मात्र विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना अटक केली. आता पोलीस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत निखिल यांची चौकशी करत आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणात त्यांची भूमिका काय होती हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगळुरमध्ये RCB च्या विजयानंतर विक्ट्री परेड दरम्यान झालेली चेंगराचेंगरी आणि अव्यवस्थेत त्याची भूमिका किती गंभीर होती, याची पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारने शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या बरोबरच या संपूर्ण घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.
🚨RCB, DNA EMPLOYEES ARRESTED🚨
The Bengaluru Police, on Friday, arrested Nikhil Sosale, Kiran Kumar and Sunil Mathew following orders from Karnataka's chief minister Siddaramaiah. The decision was taken following the death of 11 people in a stampede outside the M Chinnaswamy… pic.twitter.com/x25TS3lNJt
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) June 6, 2025
निखिलशिवाय पोलिसांनी या प्रकरणात आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची सुद्धा कसून चौकशी सुरु आहे. सध्या पोलीस हे जाणून घेत आहेत की, कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान कुठल्या-कुठल्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोणाच्या अनुमतीने आयोजन करण्यात आले होते आणि सुरक्षा निकषांच पालन करण्यात आले होते का?. याला कोण जबाबदार आहे?. ही अटक या प्रकरणात मोठी कारवाई मानली जात आहे. यातून येणाऱ्या दिवसात अनेक खुलासे होऊ शकतात.
अटक का झाली?
आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसले यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणुकीची घोषणा केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतरही सोशल मीडियावरून पोस्ट हटवण्यात आली नाही, ज्यामुळे हजारो चाहत्यांची दिशाभूल झाली. त्यांनी दावा केला की, गेट ९ आणि १० जवळ दुपारी १ वाजता मोफत तिकिटे वाटली जातील, परंतु तसे झाले नाही, ज्यामुळे गर्दी जमली. दुसऱ्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, स्टेडियममध्ये दुपारी ३ वाजता एन्ट्री सुरू होईल, ज्यामुळे गोंधळ आणखी वाढला.
नेमके काय घटना घडली?
आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे सांगितले जाते. यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत तब्बल ३० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा