मुंबई | वृत्तसंस्था Mumbai
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने जोर धरत होती. अखेर या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.
- Advertisement -
अशोक खरात प्रकरणी वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आरोप झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.




