अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोना संकट काळात एकाही बैठकीला शहराचे प्रतिनिधी म्हणून महापौरांना बोलविले नाही अशी खंत व्यक्त केल्यानंतर आजच्या बैठकीला कलेक्टरांनी पत्र पाठवून महापौर बाबासाहेब वाकळे यांना बोलवून घेतले.
पालकमंत्र्यांना महापौरांचे वावडे ही बाब ‘नगर टाइम्स’ने सर्वात अगोदर मांडली होती. नगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजपची सत्ता असून बाबासाहेब वाकळे हे महापौर आहेत.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगरला करोनासंदर्भात अनेक बैठका घेतल्या, पण एकाही बैठकीला शहराचे प्रतिनिधी म्हणून महापौरांना बोलविण्यात आले नाही. एव्हाना महापालिकेला कोणताही निधी दिला नाही, ही खंत वाकळे यांनी बोलून दाखविली होती.
ती बाब ‘नगर टाइम्स’ने सर्वात अगोदर मांडली. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ पहिल्यादांच आज नगरला आले. पाकलमंत्र्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी महापौर वाकळे यांना पत्र दिले होते. त्यानुसार वाकळे यांनी आज पहिलीच करोना आढावा बैठक अटेंड केली. त्यातही शहरात जनता कर्फ्युचा निर्णय घेण्याची वेळ आली.