नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारविरोधात काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले…
- Advertisement -
गॅॅस सिलेंडरचे भाव वाढल्याने गरिबांना सिलेंडर खरेदी करता येत नाही. खाद्यतेलाचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मोदी सरकारच्या काळात रोजगाराचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. तसेच लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. सरकारने महागाईवर तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.