Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रखबरदारी न घेतल्यास पुन्हा लॉकडाउन

खबरदारी न घेतल्यास पुन्हा लॉकडाउन

नागपूर –

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांनी खबरदारी घेतली नाही तर पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री

- Advertisement -

विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. आता सरकार राज्यात नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही ते म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, पुणे या ठिकाणी करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कितीही सांगितले तरी लोक विना मास्क फिरताना दिसत आहेत. कुठलीही काळजी लोक घेताना दिसत नाहीत. अशावेळी काही कठोर पावले उचलावी लागणार आहेत. लोकांनी नियमांचे पालन केले नाहीतर नाईट कर्फ्यू करण्याचे विचाराधीन आहे. सायंकाळी 6 नंतर ते सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूचा विचार सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तरीही लोकांनी खबरदारी घेतली नाही तर लॉकडाउन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्याची परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी नाईट कर्फ्युचा निर्णय घ्यायचा आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि करोनाचा प्रसार पाहता काय काय उपाययोजना करता येतील त्याचे बर्‍यापैकी अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय नेत्यांकडून केली जाणारी आंदोलने त्यामुळे होणार्‍या गर्दीवर देखील वडेट्टीवार यांनी भाष्य केले. करोनाची परिस्थिती पाहता सर्वच पक्षांनी आंदोलन करताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक कार्यक्रम, मेळाव्यांना नेत्यांना बोलावले जाते. त्यामुळे कार्यक्रमांना जाणे शक्यतो टाळले पाहिजे असेही ते म्हणाले.

शाळा पुन्हा बंद होणार?

अनेक शाळांमध्ये विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यासंदर्भात विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. यासह दहावी आणि बारावीच्या परीक्षाही तोंडावर आल्या आहेत. त्यावर बोलताना, परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार सुरू होता. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे त्यावर अनेकांचे एकमत झाले नाही. त्यावर पुढील बैठकीत चर्चा होईल. तसेच येणार्‍या अधिवेशनाच्या कालावधीबाबतही चर्चा केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या