Friday, August 21, 2026
Homeनगरपश्चिमेच्या पाण्यासाठी राज्यात मोदींच्या विचारांचे सरकार हवे

पश्चिमेच्या पाण्यासाठी राज्यात मोदींच्या विचारांचे सरकार हवे

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्याची योजना साकारण्याचे काम येड्यागबाळ्याचे नाही. त्यासाठी मोठा निधी लागतो. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. पुढील साडेचार वर्षे तेच पंतप्रधान राहणार आहेत. त्यांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आल्यास निधी मिळू शकतो. त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. कोपरगावकरांनी तरुण, उच्चशिक्षित व व्हिजन असलेला आमदार आशुतोष यांच्या रूपाने दिला, असे कौतुक केल्यानंतर ना.अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका विरोधक करतात. ही योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयातही गेले. लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला आनंदी आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या. पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

संपादकीय : २१ ऑगस्ट २०२६ – कर्तव्यकठोरता अन् विवेकाचा समतोल हवा

0
महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात भेसळखोर, हॉटेल्स आणि मिष्टान्न भांडारांमधील अस्वच्छता, दूषित पाणी आणि अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू केलेली धडक मोहीम ही...