पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
पंचवटीमधील तारवालानगर ते राजमाता मंगल कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर दिवाळीनंतर प्रचंड कचरा टाकण्यात आला होता. सर्वत्र कचर्याचे साम्राज्य पसरले होते. कचर्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
- Advertisement -
दैनिक ‘देशदूत’मध्ये तीन दिवसांपूर्वी सर्वत्र ‘कचराच कचरा’ अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा तातडीने उचलला असल्याने रस्ता व परिसर मोकळा श्वास घेत आहे. परिसरातील नागरिकांनी व महिला भगिनींनी तसेच शाळकरी मुला-मुलींनी रस्ता स्वच्छ झाल्याने व तेथील दुर्गंधी कमी झाल्याने समाधान व्यक्त केले आहे व दैनिक ‘देशदूत’चे आभार व्यक्त केले.
यानंतर परिसरातील नागरिकांनी कचरा अस्ताव्यस्त टाकू नये, कचरा घंटागाडीतच टाकावा, अशा प्रकारची आशा देखील ज्येष्ठ नागरिकांनी, माता-भगिनींनी व्यक्त केली आहे.