Friday, May 3, 2024
Homeनगरधनगर आरक्षणासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन

धनगर आरक्षणासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी

- Advertisement -

जय मल्हार सेनेच्यावतीने गुरुवार (दि. 22) पासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदीपराज भोंडे, राज्य समिती सदस्य काशिनाथ आरगडे, जिल्हा संघटक सोपानराव कांदळकर, संगमनेर तालुका प्रमुख गंगाधर साळवे, बाळासाहेब घोडे, संतोष कांदळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेवाळे म्हणाले, भारतीय राज्य घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत 36 व्या क्रमांकावर असलेले धनगर हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तावेजातून सिद्ध झाले आहे.

मात्र, राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 25 वर्षांपासून धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. राज्य सरकार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आता गप्प बसणार नसून राज्यभर जय मल्हार सेनेच्यावतीने अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, व पाथर्डी तालुक्यातील 35 गावांमध्ये त्या त्या गावाजवळील नदी, बंधारे व तलाव याठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे व समन्वयक विठ्ठलराव रबदडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपराज भोंडे, रेवननाथ शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब घोडे आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या