Friday, May 3, 2024
Homeजळगावमहाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य -पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

महाआवास अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य -पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

जळगाव – jalgaon

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या घरकुलांची निर्मिती करावी. राज्य शासनाचे महत्त्वकांक्षी असलेले हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister Gulabrao Patil) ना.गुलाबराव पाटील यांनी दिले.

- Advertisement -

महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वांसाठी घरे-2022 या उपक्रमांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा ऑनलाईन संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज अशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मीनल कुटे, जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेस खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्यावा. ज्या गावांमध्ये घरकुलासाठी जागा उपलब्ध नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. जेणेकरून हे अभियान यशस्वी होईल. तसेच ज्याठिकाणी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही त्याठिकाणी गावठाण, गायरान व शासकीय जमिनी उपलब्ध असतील त्याठिकाणची जमीन उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करावा. कमी जागा असेल अशा ठिकाणी अपार्टमेंटचा विचार करावा. शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य यासाठी करण्यात येऊन प्रशासनाने घरकुलांचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.

या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे, हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना यावेळी केले. जिल्ह्यात जी घरकुल पूर्ण झाली आहेत त्यांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय, सौभाग्य योजनेअंतर्गत विद्युत जोडणी, उज्व्ीला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन तर जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या अभियाना अंतर्गत घरकुल बांधताना कुणालाही, कुठल्याही प्रकारची अडचण येत असल्यास त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून त्या त्वरीत सोडविण्यात येईल, असे (Collector Abhijeet Raut) जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सर्व गटविकास अधिकारी यांना सांगितले. तसेच उद्दिष्ट अधिक असले तरी एकमेकांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. महाआवास अभियानाअंतर्गत प्रलंबित घरकुले 4020 इतके आहेत. ते पूर्णकरण्यासंदर्भात जनजागृतीकरुन घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करण्याची योजना असुन 11 डिसेंबर रोजी लोकअदालतद्वारे लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या