दिल्ली | Delhi
केंद्र सरकारनं आणखी ४३ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. सुरक्षा तसेच देशाच्या अखंडतेसाठी हे अॅप धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
- Advertisement -
हि आहेत ती अॅप्स
आयटी अॅक्ट ६९ ए अंतर्गत सर्व ४३ अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे. आयटी कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले सर्व अॅप्स भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे.