Thursday, May 15, 2025
HomeनगरAhilyanagar : वर्षभरापासून 99 ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतिक्षा

Ahilyanagar : वर्षभरापासून 99 ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतिक्षा

सरपंच पद आरक्षण सोडतीनंतर रणधुमाळीची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींना निवडणुकीची प्रतिक्षा आहे. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार की नाही? याकडे गावकारभार्‍यांचे लक्ष आहे.

दरम्यान, 25 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील पुढील पाच वर्षाच्या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे.त्यानंतर निवडणूका जाहीर होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनला आहे. गेल्या वर्षभरापासून नगर जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींसह 197 ठिकाणी पोटनिवडणूका झालेल्या नाहीत. या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार 19 मार्चला प्रभागनिहाय प्रारूप मतदार प्रसिध्द करण्यात. या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेवून 27 मार्चला या ठिकाणी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. दरम्यान, नगरसह राज्यातील मुदत जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका रखडलेले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

मागील महिन्यांत राज्य सरकारने जातीच्या प्रवर्गानूसार लोकसंख्येची माहिती राज्य सरकारने घेतलेली आहे. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण अंतिम करून ते 25 एप्रिलपर्यंत अंतिम करण्याचे आदेश दिलेले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून अकोले 8 ग्रामपंचायती, संगमनेर 2 ग्रामपंचायती, कोपरगाव 3 ग्रामपंचायती, राहाता 1, श्रीरामपूरमधील 2 ग्रामपंचायती, राहुरी तालुक्यातील 3 ग्रामपंचायती, नेवासा तालुक्यातील 26 ग्रामपंचायती, शेवगाव 6 ग्रामपंचायती, पाथर्डी 4 तालुक्यातील, जामखेड 3, श्रीगोंदा 1, कर्जत 8, पारनेर 1 ग्रामपंचायत आणि नगर तालुक्यातील 7 ग्रामपंचायती अशा 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य यांचा समावेश आहे.

तर 2025 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 6, संगमनेर 2, कर्जत 2, पारनेर 2 आणि अकोले तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ठिकाणी गाव कारभार्‍यांना निवडणुकांची प्रतिक्षा आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीसाठी निवडणूका होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...