Saturday, May 31, 2025
Homeदेश विदेशCOVID19 Update : देशात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, सक्रिय रुग्णांची संख्या 2700...

COVID19 Update : देशात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, सक्रिय रुग्णांची संख्या 2700 च्या पुढे

दिल्ली । Delhi

- Advertisement -

देशात करोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांवर पुन्हा दबाव वाढत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 2,710 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषत: केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याने तिथली परिस्थिती गंभीर बनली आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळमध्ये 1,147 कोविड रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे देशातील सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 424, दिल्लीत 294 आणि गुजरातमध्ये 223 रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूत प्रत्येकी 148, तर पश्चिम बंगालमध्ये 116 रुग्णांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी देशातील कोविड परिस्थितीचे गांभीर्य दर्शवते.

गेल्या 24 तासांत देशात सात कोविड मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. यापैकी महाराष्ट्रात दोन, तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, पंजाब आणि तामिळनाडूत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, बहुतांश प्रकरणे सौम्य असून घाबरण्याची गरज नाही. तरीही नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात करोनाच्या नव्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 84 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी सर्वाधिक 32 रुग्ण मुंबईत नोंदवले गेले. ठाणे महापालिका क्षेत्रात 14, ठाणे ग्रामीण भागात 2, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी 1, रायगडमध्ये 2, नाशिकमध्ये 1, पुणे महापालिका क्षेत्रात 19, साताऱ्यात 2, कोल्हापूरात 2 आणि सांगलीत 3 रुग्णांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या 681 झाली असून, सध्या 467 सक्रिय रुग्ण आहेत.

करोनाची प्रकरणे सौम्य असली, तरी आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेषत: पावसाळ्यात इतर आजारांसह कोविडचा धोका वाढू शकतो, याची जाणीव ठेवून प्रशासनाने खबरदारीचे उपाय तीव्र केले आहेत. नागरिकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. केरळ आणि महाराष्ट्रासारख्या जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. तसेच, रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मराठीला

Pratap Sarnaik: “आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो, पण हिंदी आता मुंबईची बोलीभाषा...

0
मुंबई | Mumbai राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या "हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे" या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरनाईक यांनी...