Sunday, September 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजIND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) क्रिकेट संघांमध्ये २ कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने (Team India) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाविरुद्ध २८० धावांनी दणदणीत विजय संपादन करून मालिकेत १-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

हे देखील वाचा : IND vs BAN 1st Test : भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय!

मालिकेतील दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर (Kanpur) येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघनिवड समितीने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघनिवड समितीने पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेला संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कायम राखला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पतीची गळफास घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलहातून घटना

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गील, लोकेश राहुल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, आकाशदिप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या