मुंबई | Mumbai
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना बुधवारी म्हणजेच आज ख्राईस्टचर्च येथे खेळवला गेला. न्यूझीलंड दौऱ्यातील संपूर्ण सामन्यांवर पावसाचे सावट दिसून आले. दोन्ही संघांपैकी कोण जिंकणार यापेक्षा पाऊस पडणार का यावरच बरीच चर्चा झाली.
- Advertisement -
मालिकेतील तिसरा सामना देखील पावसामुळे वाहून गेला आणि त्यामुळे न्यूझीलंडने १-० अशी मालिका खिशात घातली. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.