Saturday, June 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIndia vs Pakistan : "मोदीजींनी मला माझं कुंकू परत मिळवून दिलं"; पाकिस्तानच्या...

India vs Pakistan : “मोदीजींनी मला माझं कुंकू परत मिळवून दिलं”; पाकिस्तानच्या ताब्यातील BSF जवान परतल्यानंतर पत्नीची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत बदला घेतला होता. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या युद्धजन्य परिस्थितीवेळी भारतीय सैन्य दलाच्या बीएएसएफ (BSF) तुकडीतील जवान पूर्णम कुमार साहू यांनी सीमारेषा ओलांडत पाकिस्तानात प्रवेश केला होता.

- Advertisement -

यानंतर आज गेल्या २२ दिवसांपासून पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या जवान पूर्णम कुमार साहू (Purnam Kumar Sahu) यांना पाकिस्तानने (Pakistan) आज भारताच्या स्वाधीन केले. त्यामुळे साहू यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त करत देशवासीयांचे आभार मानले. तसेच साहू यांच्या पत्नीने ‘मी आज किती आनंदी आहे, हे सांगायला माझ्याकडे शब्द नाहीत,’ अशी भावना माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली आहे.

यावेळी बोलतांना साहू यांची पत्नी रजनी म्हणाली की,”आज आमचं पूर्ण कुटुंब (Family) खूप आनंदी आहे.मी माझ्या पतीशी व्हिडिओ कॉलवर बोलले, तेव्हा पहिल्या नजरेत मी त्यांना ओळखलेच नाही. ते ठीक आहेत. त्यांनी मला सांगितले की तू घाबरू नकोस, मी परत आलो आहे. ते परत आल्यानंतर आता आमची सगळी काळजी दूर झाली आहे. तसेच या कठिण परिस्थितीत सैन्यातील अधिकारी, सरकार आणि देशावासीय आमच्या पाठीशी उभे होते, त्या सर्वांचे मी आभार मानते, असे म्हणत रजनी यांनी केंद्र सरकारचे (Central Government) आभार मानले.

पुढे त्या म्हणाल्या की, “माझ्या पतीच्या (Husbend) परत येण्यात आमच्या संचालकांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मला पूर्ण साथ दिली. त्यांनी गेल्या तीन दिवसांत दररोज माझ्याशी बोलल्या. आणि अखेर आज माझे पती मायदेशी परत आले. तसेच मोदी आहेत तर सर्वकाही शक्य आहे. २२ एप्रिल रोजी आपल्या पहलगाममध्ये दहशवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर, १५ ते २० दिवसांत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या महिला भगिनींचे कुंकू पुसलं, त्याचा बदला आपण घेतला. मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव या मिशनला दिलं होतं, आता ‘मोदीजींनी मला माझं कुंकू परत मिळवून दिलं’, अशा शब्दात रजनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

BSF ने काय म्हटले?

बीएसएफने (BSF) एका निवेदनात म्हटले आहे की, “आज बीएसएफ जवान पूर्णम कुमार साह, जे २३ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात होते, त्यांना संयुक्त तपासणी चौकी अटारी, अमृतसर मार्गे सुमारे १०.३० वाजता भारताकडे सोपविण्यात आले. हस्तांतरण शांततापूर्ण आणि स्थापित प्रोटोकॉलनुसार झाले. ४० वर्षीय पूर्णम साहू २३ एप्रिल रोजी नकळत आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले होते आणि त्यानंतर त्यांना ‘पाकिस्तान रेंजर्स’नी ताब्यात घेतले होते. पंजाबमधील फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात असलेले पूर्णम साहू गणवेशात होते आणि त्यांच्याजवळ त्यांची सर्व्हिस रायफलही होती. बीएसएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना त्यावेळी घडली जेव्हा साहू सीमेजवळ शेतकऱ्यांच्या एका गटाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यासोबत होते. ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी गेले आणि नकळत पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. यानंतर त्यांना त्वरित पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतले.

YouTube video player

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “आतापर्यंतचा माझा अनुभव…”; ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात शरद पवार...

0
मुंबई | Mumbai  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ठाकरे...