मुंबई | Mumbai
भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील (T20 series) शेवटचा सामना आज सायंकाळी ७ वाजता इंदूरच्या होळकर मैदानावर (Holkar Ground) खेळविण्यात येणार आहे…
भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला ७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात झालेल्या टी २० मालिकेत पराभूत करून इतिहास रचला आहे. त्यानंतर आज होणारा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला ३-० अशी धूळ चारून वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यासाठी सज्ज झाला आहे.
तसेच इंदूरच्या होळकर मैदानावर २ आंतरराष्ट्रीय टी २० सामने झाले असून या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohali) लोकेश राहुल (KL Rahul) सूर्यकुमार यादव यांनी मागील २ सामन्यात चांगली खेळी केली आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाऊमा, रायली रुसो,एडम मार्करम, मागील दोन्हीही सामन्यात अपयशी ठरले आहेत.
दरम्यान, आजच्या सामन्यावर पावसाचे (Rain) सावट नसल्यामुळे संपूर्ण सामन्याचा थरार पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे. याशिवाय आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सलिल परांजपे, नाशिक