नाशिक | वैभव कातकाडे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) १६६ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील निवृत्ती आव्हाड यांनी ‘देशदूत’च्या विशेष संवाद कट्ट्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मिळवलेल्या यशाचे गमक काय होते यावर चर्चा केली. गेली सहा वर्षे केलेल्या कष्ट, संयमाची परीक्षा आणि मानसिक स्थिरतेमुळेच या यशाला गवसणी घालता आली असे आव्हाड म्हणतात. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी वैभव कातकाडे यांनी केलेली चर्चा….