Sunday, June 8, 2025
Homeनाशिकजानोरी : विद्यार्थांसाठी सुरु केली बससेवा; ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

जानोरी : विद्यार्थांसाठी सुरु केली बससेवा; ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

जानोरी | वार्ताहर

- Advertisement -

जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे यासाठी जानोरी ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेत वस्तीपासून शाळेपर्यंत बससेवा सुरू केली हे नक्कीच स्तुत्य असून त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. तसेच जानोरी ग्रामपंचायतीचा आदर्श इतरांनीही घेवून शिक्षण व्यवस्थेकडे अधिकाधिक लक्ष द्यावे असे प्रतिपादन दिंडोरीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी जानोरी येथे केले.

यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बससेवा सुरू यामुळे पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेतील शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत असताना याची गरज ओळखून वस्ती शाळेपासून शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना बस सेवा सुरू करण्याचा संकल्प जानवर ग्रामपंचायतीने केला होता. त्यानुसार शिवाजीनगर पासून जिल्हा परिषद शाळा पर्यंत बस सेवेचे शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बस सेवेचा प्रारंभ झाला असून त्याचे उद्घाटन दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार व गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना गट विकास अधिकारी यांनी जानोरी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा उपक्रम निरंतर चालू राहावे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम चालू ठेवावा असे सांगण्यात आले. तालुका नाहीतर या जिल्ह्यात जानोरी ग्रामपंचायतीने आदर्शवत काम सुरू केले असून यातून नक्कीच मुलांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होईल. खाजगी शाळेत जाणारे विद्यार्थी बस मध्ये जात असताना बघून या गरीब मुलांना ही वाटत असेल कि आपण हि बस मध्ये जावे अशी अपेक्षा मनात व्यक्त होत असेल. परंतु आज त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा खरा आनंद असून नक्कीच जानोरी ग्रामपंचायतीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असे उद्गार यावेळी गटविकास अधिकारी भावसार यांनी काढले.

शिवाजीनगर ते जिल्हा परिषद शाळा दोन किलोमीटरचा अंतर लहान मुले पायी जात असत त्यामुळे शिक्षणाविषयी त्यांची गोडी नक्कीच कमी होत होती. तसेच रस्त्यावरून चालताना अपघाला निमंत्रण मिळत असल्याने पालकांचीही ही काळजी वाढत होती. परंतु ग्रामपंचायतीने सुरू केलेले हे उपक्रम अतिशय आनंददायी असून अशाच योजना जिल्हा परिषद शाळेसाठी व आमच्यासाठी राबवाव्या असे पालकांनी मत व्यक्त करून पालकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्राम विकास अधिकारी के. के. पवार, तंटामुक्ती अध्यक्ष रेवचंद वाघ, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, दत्तात्रय घुमरे, सुभाष नेहरे, नामदेव डंबाळे, कमल विधाते, शैला गवारी, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. घोलप, केंद्रप्रमुख पागे, तसेच डी. बी. काठे, समीर शेटे, रामदास तिडके, कैलास पगारे, जिल्हा परिषद पर्यवेक्षक भाऊसाहेब कापडणीस, मुख्याध्यापक नाना गंगावणे, शिक्षिका अमृता धोंडगे, वंदना गरूड, मनीषा गायकवाड, बापू दिवे, प्रमोद शिरसाठ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ यांनी केले तर आभार उपसरपंच गणेश तिडके यांनी मानले.

जिल्हा परिषद शाळा ही आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीने यात सहभागी होणे आवश्यक आहे. जानोरी ग्रामपंचायतीने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच आदर्शवत असुन इतर गावांनीही आदर्श घेण्यासारखा आहे. शिक्षण देण्यासाठी आमचे शिक्षक कुठेही कमी पडणार नाही. याची मी ग्वाही देतो. चिमुकल्यांच्या आनंदाचा हा क्षण हा अविस्मरणीय क्षण असून शाळा आधुनिकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने असाच पुढाकार घ्यावा. यासाठी प्रयत्न करणारया सर्व लोकप्रतिनिधी व शिक्षण प्रेमींचे मी मनपूर्वक आभार व अभिनंदन करतो.

– भास्कर कनोज, गटशिक्षणाधिकारी दिंडोरी.

खाजगी शाळांकडे लोकांचा वाढलेला कल बघता जिल्हा परिषद शाळांमध्ये पटवारी कमी झाली आहे. आधुनिक युगात जिल्हा परिषद शाळांचे ही आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी जानोरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून जिल्हा परिषद शाळा ही डीजीटल करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वस्तीपासून शाळेपर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बससेवा सुरू केली असून सर्वच स्तरातून यांचे कौतुक व सर्वात करण्यात आले. यापुढेही शिक्षणाच्या विविध योजना अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

– गणेश तिडके, उपसरपंच जानोरी.

आमच्या वस्तीपासून जिल्हा परिषद शाळा दोन ते अडीच किलोमीटर असून रोज मुले पायी ये-जा करतात .रोज मजुरीला जात असल्यामुळे पालकांना मुलांना सोडण्यासाठी जाता येत नाही. मुले शाळेतून येईपर्यंत जीवाला घोर लागत होता. परंतु ग्रामपंचायतीने बस सुरू करून खुप चांगले काम केले हे नक्कीच आम्हाला आनंददायी असून हे कायम चालू ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.

-कैलास सापटे, पालक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

तब्बल 73 गोवंश जनावरांची कत्तलीपासून केली सुटका

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे कत्तलखाने सुरूच असल्याचे दिसून येते. संगमनेर शहरातही वारंवार कारवाया करुनही कत्तलखाने सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत...