Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याJayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले...

Jayant Patil : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने व्हिडिओ शेअर करत सांगितले १० कारणे

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाला रामराम करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहे. त्यातच, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता. ‘जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,’ असं विधान करुन संजय शिरसाट यांनी खळबळ उडवून दिली होती. अर्थात, जयंत पाटील यांनी हसत-खेळत सिरसाट यांच्या विधानावर पलटवार केला. मात्र, आता भाजपने जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे भाजपने त्याची १० कारणेही सांगितले आहेत.

- Advertisement -

भाजपने ट्विट केलेल्या व्हिडीओत काय म्हटलेय?

शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवले होते, त्यामध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केले ते जयंत पाटलांनी… किती रडले होते ते… पण आता जाणवते ते आश्रू खरे होते फक्त कारण वेगळे होते. म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार ? अशी कुजबूज सुरु झाली आहे. जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही तर दहा कारणे आहेत. 2019 पासून शरद पवार यांनी जयंत पाटलांना डावलायला सुरुवात केली. कधीकाळी गृह मंत्रालय भूषवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रालय देऊन नाचक्की केली. त्यात राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट.. अन् पाटील याही गटातले नाहीत अन् त्याही गटातील नाहीत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीतले भविष्य अंधारातच राहिले. जयंत पाटील मुळातच महत्वाकांक्षी… आता हेच पाहा ना, त्यांना पडणारी उप मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने कुणापासून लपून राहिली नाहीत. आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वाचा मानही गेला. सुप्रिया सुळे अध्यक्षपदी आल्यामुळे अजित पवारांचेच वांदे झाले. तेव्हा यांच्या स्वप्नाला कोण विचारणार ? महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षाचे नेतेपद भूषवायचे होते, तेव्हाही त्यांची झोळी रितीच राहिली.

कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटाला समाधानी केले. सुप्रिया सुळे यांना आणि अजित पवार यांचे समर्थक अशी ओळख असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष बनवले. जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला. राज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यात शरद पवार चुकून कधी निवृत्त झालेच, तर स्वत:ला वरिष्ठ समजणाऱ्या जयंतरावांना सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या हाताखाली काम करणे कठीण होईल. जयंत पाटालांना आता शरद पवारांसारखेच आपल्या मुलाला राजकारणात आणायचे आहे. नुकताच त्यांचा मुलगा प्रतिक जयंत पाटील याला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणले. पण इथे स्वत:च्या सख्या पुतण्याला डावलणारे पवारसाहेब जयंतरावांच्या मुलाला थोडेच पुढे येऊ देणार…?

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEOबर्थडे बॉय केक कापत होता अन् तेवढ्यात त्याच्या चेहऱ्याने घेतला पेट, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील का रडत होते, तुम्हाला माहित आहे का ? कारण त्यांना माहित आहे, उद्या शरद पवार साहेब तुम्ही राजीनामा दिला तर मी काय करू ? मी तर मेलोच, म्हणून ते रडत होते बाकी काही नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ते रडत नव्हते त्यांचं रडणं वेगळंच होतं. हे असे जे बोलणारे असतात ना ते पटकन उड्या मारतात. म्हणून काही दिवस वाट पाहा, तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठेतरी झालेले दिसेल, असे शिरसाट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या