रांजणगाव देशमुख (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील दोन गावामधील दोन जणाना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविले आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते यांनी दिली आहे.
शेजारच्या येवला व सिन्नर मध्ये रुग्ण असल्याने अगोदरच कोपरगावच्या नागरिकांची चिंता वाढली आहे . कोपरगावमधील कोरोना झालेल्या महिलेचे निधन झाल्यानंतर चेक केलेले सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
त्यामुळे कोपरगावकर थोडे बिनधास्त झाले होते परंत आता परत दोन जणांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठविल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हे दोन्ही जण ग्रामीण भागातील आहे.ग्रामीण भागात आता जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.