मुंबई | Mumbai
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल (शनिवार) आपल्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवर पोस्ट करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. यानंतर आता राहुल गांधींच्या या आरोपावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लेखानेच प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले की, “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक आयोगासंबंधी काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईलच, पण, मुख्य प्रश्न आहे, तो सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा, सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचा, जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. सातत्याने लोकशाही (Democracy) प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
Rejected by people, now he rejects people’s mandate @IndianExpresshttps://t.co/PpsuX7lCbb
जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात !@LoksattaLivehttps://t.co/JSDeGr3LjI
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात ! @lokmat https://t.co/TEPSGxvzb8 https://t.co/mj9sXLtmo9 pic.twitter.com/Lq85A933Ak
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 8, 2025
पुढे फडणवीस म्हणाले की,”महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmer) लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करीन”, असंही त्यांनी नमूद केले आहे.
तसेच “काँग्रेसच्या (Congress) काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. २६ पैकी २५ निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढले. तर मतदानाची (Voting) टक्केवारी अचानक वाढली हा तर फारच मोठा विनोद आहे. शेवटच्या तासांत टक्केवारी कशी वाढली हे समजून घेण्यासाठी ताशी मतदान समजून घ्यावे लागेल”, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना लगावला.