Tuesday, May 20, 2025
Homeनगरसंगमनेरातील पठारभागासह तळेगावचा पाणीप्रश्न सोडवणार - डॉ. सुजय विखे

संगमनेरातील पठारभागासह तळेगावचा पाणीप्रश्न सोडवणार – डॉ. सुजय विखे

नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची विजयी सभा

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

अनेक वर्ष दुर्लक्ष झालेल्या संगमनेरच्या पठारभागासह तळेगावचा पाणीप्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून लवकरच उपसा जलसिंचन योजना राबवून सोडवणार असल्याची ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची रविवारी (दि.24) दुपारी संगमनेरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मालपाणी लॉन्स येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब थोरात, कपिल पवार, अ‍ॅड. श्रीराज डेरे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, रामभाऊ रहाणे, बापूसाहेब गुळवे, दिलीप शिंदे, बाबासाहेब कुटे, रमेश काळे, अरुण इथापे, गुलाब भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, अमोलचा विजय हा सर्वांचा असून सर्वांचे हे यश आहे. हे कोणत्या एकट्याचे यश नाही. त्यामुळे आज आपण संगमनेरात परिवर्तन करू शकलो आहे. संगमनेर विधानसभेचा आमदार हा खताळ नसून आपण सर्वजण असणार. सगळ्यांना न्याय मिळणार आहे. कोणीही आमदार म्हणायचे नाही भाऊ म्हणून हाक मारायची आहे. यावर कोणीच साहेब नाही आम्ही सर्व सेवक आहोत आणि तुम्ही साहेब आहात. येणार्‍या काळात आपल्याला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. केवळ संगमनेरात नव्हे तर राज्यात परिवर्तन झाले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून पठारभागावर उपसा जलसिंचन योजना आणणार आहे, त्यामुळे तुमचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल. आरोग्य, पाणी हे सर्व देण्याची जबाबदारी आपली आहे. पुढे जिल्हा परिषद निवडणुका आहेत. ही सत्ता सर्वसामान्य माणसांची आहे.

प्रत्येक वाडी-वस्तीवर आपल्याला पोहोचायचे आहे. जो व्यक्ती त्याच्या गावात प्रश्न सोडवेल त्याला यापुढे संधी दिली जाईल. आपल्याला पैशांची गरज नाही. कारण सरकार आपले आहे. त्यामुळे विकासाच्या माध्यमातून आपण संगमनेरात पैशांचा पाऊस पाडू. यापुढे मी जसे शक्य असेल तसे नगरपालिकेच्या वॉर्डात येईल, यापुढे कोणीही स्वागत करायचे नाही, फटाके वाजवायचे नाही. आता आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सत्ता आणायची आहे. तालुक्यातील अनेक वर्षांपासून जे प्रलंबित प्रश्न आहेत ते जनसेवा मंच या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण सोडवणार आहोत. कोणत्याही नेत्यापुढे अर्ज देऊन फिरावे लागणार नाही.

आता अनेक लोक आपल्याला दाबायचा प्रयत्न करतील पण आता घाबरायचे कारण नाही. गोरगरीब जनतेचा आवाज आता याठिकाणी ऐकला जाणार आहे. कोणाला धमकावणे, अपशब्द वापरणे हे आपल्याला करायचे नाही. चाळीस वर्षांचा राग तुम्ही सर्वसामान्यांनी मतपेटीतून दाखवला आहे. आपल्या गाड्या जाळल्या, लोकांना मारले पण आता आपल्याला विकासाचे राजकारण करायचे असून तळेगाव, पठारभागाचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे. आपल्या मनातील राग शांत करून आता आपल्याला विकास करून दाखवायचा आहे. आजची सभा आमची शेवटची आहे. तुम्ही देखील पराभव पत्कारावा, पण तुम्ही इथून पुढे आमच्या एकाही माणसाला हात लावला तर ‘टायगर अभी जिंदा है’. माझ्यात आणि तुमच्यात संगमनेरमधील कोणताच पुढारी येणार नाही याचा तुम्हाला मी विश्वास देतो. तुमच्या विश्वासाला कधीच मी तडा जावू देणार नाही हा शब्द देखील त्यांनी दिला.

आमदार अमोल खताळ म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास टाकला त्यामुळे मी आज निवडून आलो आहे. सहाशे कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. ज्यांना चाळीस वर्षांत पाणीप्रश्न सोडवता आला नाही. त्यांची दहशत वाढली होती. मात्र ही दहशत मोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे. हा विजय लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यामुळे झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून कामे करायची आहेत. भविष्यात संगमनेर तालुका हा आपल्याला भयमुक्त करायचा आहे. इथून पुढे कार्यत्यांवर अन्याय होणार नाही. या विजयी सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदारांसह डॉ. सुजय विखेंचा केला सत्कार…
संगमनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला निमंत्रण दिले असून पहिल्याच दिवशी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सोबत खताळ हे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहे. तत्पूर्वी पराभूत उमेदवार वसंत गुंजाळ, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, साहेबराव नवले, अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे, दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, डॉ. भानुदास डेरे, डॉ. अरुण इथापे यांच्याहस्ते नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ व डॉ. सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; नाशिकच्या...

0
मुंबई | Mumbai गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार अस्तित्वात आल्यावर डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या विस्तारावेळी छगन भुजबळ यांना...