मुंबई :
आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु झाले. आमदार गोपीचंद पडळकराचे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाबाहेर ढोल वाजवात त्यांनी आरक्षणाच्या विषयावर लक्ष वेधले.
- Advertisement -
परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसात सोमवारी पहिल्या दिवशी विरोधक सभागृहात आक्रमक झाले. रवी राणा यांच्या फलकावरुन वाद सुरु झाला. भाजपच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरु केली.