Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : अंबडला तिघांचा जीवनत्याग; तरुण-तरुणीसह ज्येष्ठाचा समावेश

Nashik Crime : अंबडला तिघांचा जीवनत्याग; तरुण-तरुणीसह ज्येष्ठाचा समावेश

मानसिक तणाव वाढताच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चार दुर्दैवी घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. चेहडीशिव येथे कीटकनाशक सेवन करून एका ज्येष्ठ व्यक्तीने तर अंबड परिसरात (Ambad Area) तरुण, तरुणी व मध्यमवयीन व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या चारही घटनांमुळे शहरात मानसिक तणाव, एकाकीपणातून टोकाचे निर्णय घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Road Police Station) हद्दीतील चेहडीशिवलगतच्या म्हसोबानगर येथे पोपट बबन गिते (वय ६२) यांनी शुक्रवारी (दि.९) सकाळी सुमारे दहा वाजता राहत्या घरात ‘रोगर’ हे कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. नाशिकरोड पोलिसांत नोंद करण्यात आली असून कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. १०) वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या. सिंहस्थनगर येथे राहणारा अनिल राजू इंगळे (वय २१) याने दुपारी एक वाजता घरात गळफास घेतला.

YouTube video player

जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) दाखल के ले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तसेच, अंबडच्या दत्तनगरात संजय नागेश्वर सिंग (वय ५७) यांनी दुपारी दोनच्या सुमारास घरात गळफास घेत जीवन संपविले. त्यांनाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तिसरी घटना शिवशक्ती चौकात घडली. छकुली भास्कर गवळी (वय २२) या तरुणीने सकाळी साडेदहा वाजता घरातील किचनमध्ये ओढणी बांधून गळफास घेतला. तिलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. या तिन्ही घटनांची नोंद अंबड पोलीस ठाण्यात झाली आहे. चौघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...