Sunday, March 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरी कॉंक्रिट रस्त्याबाबत मंत्री भुजबळांनी दिले 'हे' निर्देश

Nashik News : कोपरगाव-येवला-मनमाड चौपदरी कॉंक्रिट रस्त्याबाबत मंत्री भुजबळांनी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई | Mumbai

स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या भावना लक्षात घेऊन कोपरगाव येवला मनमाड एन.एच.१६० एच आणि एन.एच.७५२ जी चौपदरी कॉक्रींट रस्त्यासह येवला बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर सादर करावा तसेच याठिकाणी बायपास रस्ता बांधणीच्या दृष्टीने कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्दैश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले. मंत्रालयात कोपरगाव येवला मनमाड एन.एच.१६० एच आणि एन.एच.७५२ जी चौपदरी कॉक्रींट रस्त्यासह येवला बायपास रस्ता सविस्तर प्रकल्प अहवालाच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले.

- Advertisement -

यावेळी मंत्री भुजबळ यांनी सूचित केले की, कोपरगाव येवला मनमाड (Manmad) एन.एच.१६० एच आणि एन.एच.७५२ जी चौपदरी कॉक्रींट रस्त्यासह येवला बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना भविष्यातील शहराचा वाढता विकास लक्षात घेऊन पर्यायी मार्ग निवडावा तसेच त्यासाठीच्या आवश्यक यंत्रणांच्या मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण होईल, हे लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा विचार करावा. बायपास रस्त्याची व्यापक उपुयक्तता लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीने बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल लवकर सादर करण्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, या बैठकीस आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, यांच्यासह वाहतूक अपर पोलिस महासंचालक प्रविण साळुंखे, दूर दृश्यप्रणाली द्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी नाशिक, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे राज्याचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, एनएचएआय प्रकल्प संचालक श्रीकांत ढगे,नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे,छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक परिवहन विजय कोथळे, येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसिलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता सा.बां नाशिक मुकेश ठाकूर,येवला नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

समीर भुजबळ काय म्हणाले?

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ (Samir Bhujbal) म्हणाले की, येवला शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी मुळे प्रचंड अडचणींना सामोर जावे लागत असून येवला-मनमाड या रस्त्यावर वाहनांची गर्दी, वाढती वर्दळ,वाहन संख्या लक्षात घेऊन तातडीने याठिकाणी पर्यायी रस्त्यावर वाहूतक विशेषतः जडवाहनांची वाहतूक वळवण्याची आवश्यकता आहे,त्यादृष्टीने वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणांनी आणि जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने या रस्त्यावरील वाहूतक अन्य पर्यायी रस्त्याकडे वळवावी. त्याचप्रमाणे वाढत्या प्रमाणातील वाहूतक कोंडी मुळे नागरिकांना दररोज होत असलेला मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय या सर्व बाबी समजून घेत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही यंत्रणांनी हा वाहतूक कोंडीचा प्रश्न तत्परतेने सोडवावा. यासाठी नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,रस्ते विकास महामंडळ,या सर्व यंत्रणांनी समन्वयाने तातडीने या रस्त्यावरील वाहतूक व वळवून वाहतूक सुरळीत करावी.

ताज्या बातम्या

Nashik Shalarth ID Scam : तिघांचे ‘साम्राज्य’ टाचेखाली! बच्छाव, उपासनी, चव्हाणच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकच्या शिक्षण (Nashik Education) क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या दीडशे कोटींच्या 'शालार्थ आयडी' घोटाळ्याचा (Shalarth ID Scam) विळखा आता अधिक घट्ट झाला...