Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : 'नाफेड'चा कांदादर 'घसरणी'चा; खरेदीसाठी सरकार पुढे, पण भाव मागे

Nashik News : ‘नाफेड’चा कांदादर ‘घसरणी’चा; खरेदीसाठी सरकार पुढे, पण भाव मागे

शेतकऱ्यांचा रोष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) माफक आणि समाधानकारक दर मिळण्यासाठी आणि कांदा दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) नाफेड आणि एनसीसीएफमार्फत यावर्षी ३ लाख टन कांदा खरेदीचे नियोजन केले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने रब्बी उन्हाळ कांद्याला क्विंटलला १,४३५ रुपये दर जाहीर केला आहे. सध्या बाजार समिती आवारात विक्री होणाऱ्या चांगल्या प्रतीच्या कांदा दरापेक्षा तो ७०० ते ७६५ रुपये तर सरासरी १५० ते २०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदीचा कुठलाही फायदा होणार नाही. ‘नाफेड’चा कांदा दर ‘घसरणी’चा असून त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या कांदा खरेदीत असलेल्या जाचक अटी आणि कमी दर यापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) विक्री होणाऱ्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल बाजार समितीमध्येच कांदा विकण्याकडे दिसत आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून गेल्या दीड महिन्यांपासून कांदा खरेदी संदर्भात निविदा प्रक्रिया संपली. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, उशिराने कांदा खरेदी सुरू झाली असून केंद्राकडून कांदा खरेदीचा जो दर जाहीर करण्यात आला. तो बाजार आवारात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत स्पर्धात्मक नसल्याने कांदा उत्पादकांकडून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी खरेदीचे दर केंद्रीय खरेदीदार संस्था स्थानिक पातळीवर जाहीर करत होत्या. गेल्या वर्षांपासून केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून हे दर निश्चित केले जात आ हेत.

YouTube video player

या वर्षासाठी जाहीर केलेले दर व प्रत्यक्षात बाजार समितीत मिळणारे भाव यात मोठी तफावत आहे. नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी करण्यासाठी प्रतवारी असलेल्या कांद्याचा निकष लावून खरेदी करण्याची अट आणि खुल्या बाजाराच्या तुलनेत कमी दर जाहीर करायचा अशी तऱ्हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाच फायदा होत नसल्याचे दिसत आहे. शेतकरी हित डोळ्यांसमोर ठेवून कांदा खरेदीचे उद्दिष्ट असताना कमी दराने खरेदी करून नेमका फायदा कोणाला द्यायचा आहे? असा सवाल शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी विचारला आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.२१) कांद्याची किमान ७०० रूपये, कमाल २,२०० रूपये तर सरासरी १,५८० रुपये क्विंटल दराने विक्री झाली होती.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) यंदा २०२४-२५ या हंगामात उन्हाळ कांद्याचे उत्पादन ५९ लाख टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते ६३ टक्क्‌यांनी वाढले आहे. मागील हंगामात (२०२३-२४) कांदा उत्पादन ३६ लाख टन होते. ही वाढ मुख्यतः लागवडीखालील क्षेत्रात आणि अनुकूल हवामानामुळे झाल्याचे राज्य कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. चालू हंगामात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची ला गवड झाली असून, हेक्टरी सरासरी २३.४ टन उत्पादन नोंदवले गेले. मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सुमारे १० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असले तरी हंगाम भरघोस राहिल्याने ऑक्टोबरपर्यंत पुरेसा पुरवठा उपलब्ध राहील, असे जाणकारांचे मत आहे. उन्हाळी कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची टिकाऊ गुणवत्ता ! हा कांदा ६ ते ७ महिने कांदा चाळीत साठवून ठेवता येतो. शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने विक्री करता येते. सध्या लासल-गाव बाजार समितीत कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल १५८० रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १,५०० रुपयांपेक्षा तो किंचित जास्त आहे.

उत्पादन खर्च प्रतिक्विंटल सुमारे १८०० रुपये येतो. परंतु गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना १,०५० ते १,६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. त्यामुळे सरसकट तोटा सहन करावा लागतो आहे. इतक्या कष्टाने पिकवलेला कांदा शेतकऱ्यांना उत्पादन खचर्चापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे. उन्हाळ कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे जरी पुरवठा शाश्वत राहणार असला, तरी योग्य दर मिळत नसल्याने केंद्राने कांदा निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भारत दिघोळे, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष

स्थिर दरासाठी प्रयत्न

यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. कांद्याचे दर पुरवठा व मागणीवर ठरतात. पुरवठा प्रचंड झाल्याने बाजारपेठांमध्ये मागणी वाढलेली नाही अपेक्षित दर वाढीच्या दृष्टीने उत्पादक उत्पा कांदा साठवणूक केली जात आहे. कांदादर स्थिर राहण्यासाठी लासलगाव बाजार समितीकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.

डी. के. जगताप, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...