Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : महाराष्ट्रदिनी समृद्धी महामार्ग होणार खुला; नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर होणार...

Nashik News : महाराष्ट्रदिनी समृद्धी महामार्ग होणार खुला; नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर होणार कमी

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

राज्याच्या दळणवळणाला ‘समृद्ध’ करणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) १ मे महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) पार्श्वभूमीवर पूर्ण क्षमतेने खुला होण्याची शक्यता आहे. या महामार्गाचा अखेरचा नाशिक-मुंबई हा टप्पा महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी खुला केला जाण्याची शक्यता असल्याने, नाशिक-मुंबई हे अंतर अवघ्या अडीच तासांवर येणार आहे.

- Advertisement -

इगतपुरी ते आमणे (Igatpuri To Aamane) या टप्प्यातील ७६ किमी लांबी नाशिक व ठाणे जिल्ह्यात येते. या टप्प्यामध्ये कसारा घाटात एकूण पाच बोगदे असून, या बोगद्यांची एकूण लांबी ११ किमी आहे. त्यातील इगतपुरी ते कसारा दरम्यान दुतर्फा बोगदा ७.८ किमी लांबीचा असून, हा देशातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा बोगदा आहे. या बोगद्याची उंची ९.१२ मीटर आहे. या बोगद्यामुळे केवळ आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा (Igatpuri to Kasara) हे अंतर पार करता येणार आहे. कसारा घाटाला पर्यायी मार्ग म्हणून या महामार्गाकडे पाहिले जात आहे.

YouTube video player

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक जलद होणार आहे. त्याचा फायदा नाशिकच्या दळणवळणाला होणार आहे. रस्ते विकास महामंडळाने ५५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्चुन ७०१ किमी लांबीचा २४ जिल्ह्यांना जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें समुद्धी महामार्ग उभारून राज्याचे दळणवळण गतिमान केले आहे. आतापर्यंत या महामार्गाचे टप्प्याने लोकार्पण करण्यात आले असून, ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

आता अखेरचा इगतपुरी-आमणे, भिवंडी हा ७६ किमीचा टप्पा पुढील मे महिन्यात खुला केला जाणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्याला होणार असून, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता नाशिकहून अवघ्या अडीच तासांत गाठता येणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिकला स्थान असले तरी, मुंबई-पुणे, नाशिकचा म्हणावा तसा विकास झाला नाही यास दळणवळण हे प्रमुख कारण मानले जाते. समृद्धीमुळे नाशिक मुंबईच्या अधिक जवळ जाणार असल्याने, त्याचा मोठा फायदा नाशिकच्या (Nashik) विकासाला होणार असल्याने अखेरचा टप्पा लवकर खुला केला जावा, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...