Sunday, June 8, 2025
HomeनाशिकNashik Politics : ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी सर्वच आतूर; नाशकात कार्यकर्ते, नेते सकारात्मक

Nashik Politics : ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी सर्वच आतूर; नाशकात कार्यकर्ते, नेते सकारात्मक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शिवसेना (उबाठा) आणि मनसे (Shivsena UBT and MNS) या दोन मराठी अस्मितेच्या पक्षांमध्ये मनोमिलन होण्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. या दोन्ही पक्षांतील तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने, नजिकच्या काळात दोन्ही संघटनांचा एकत्रित प्रवास पाहायला मिळणे अशक्य नाही. त्यामुळे सर्वच ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) मनोमिलनासाठी आतूर झाले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष केला होता. त्याच परंपरेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या पक्षांमार्फत ही भूमिका पुढे चालवली. त्यामुळे दोन्ही पक्षांची विचारसरणी, कार्यशैली आणि जनभावना जवळपास सारख्याच असल्याचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मानतात. जिल्ह्यातील तळागाळातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यामध्येही या मनोमिलनाबाबत सकारात्मक भावना दिसून येत आहे. दोन्ही पक्ष आदेशांवर चालणारे असल्याने नेतृत्वाने निर्णय घेतल्यास कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता साधणे सहज शक्य होईल, असे निरीक्षण व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांच्यातील संभाव्य मनोमिलन केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या हातात असला, तरी कार्यकर्त्यांच्या (Worker) पातळीवर याला भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी शहरातील मनोमिलनाचे वातावरण आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली. दुसरीकडे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही मनसेच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.

तळागाळात दोन्ही पक्षांची पकड

मनसेकडे सध्या ठोस पदाधिकारी रचना नसतानाही मराठी माणूस अन्यायाविरोधात मनसेचा आधार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे हिंदुत्वाचे सूत्रदेखील आजही तळागाळात पोहोचलेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची पकड सामान्य जनतेत ठाम असल्याचे निरीक्षण आहे.

बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे मनोमिलन झाल्यास पक्ष कार्याला फारशी अडचण येणार नाही.

सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे

शिवसैनिक हा आदेशावर चालणारा कार्यकर्ता आहे. उद्धवसाहेबांनी आदेश दिला तर प्रत्येक शिवसैनिक तो शिरसावंद्य मानेल.

डी.जी. सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Leopard : वाकडी परिसरात बिबट्यांची दहशत

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata तालुक्यातील वाकडी भागात चार बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु आहे. बिबट्यांनीवाकडी च्या लबडे वस्ती भागातील सर्व कुत्रे फस्त केले असून एकही कुत्रे ठेवले...