मुंबई | Mumbai
आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी साधून त्यांनी पवारांची भेट का घेतली? याबाबत अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट केली होती. आता याच मुद्द्यावर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे…
जयंत पाटील म्हणाले की, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काय रणनिती असावी? याबाबत आमची बैठक सुरु होती. त्यावेळी मला अचानक सुप्रियाताईंचा फोन आला. त्यांनी मला तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरला बोलावले.
पावसाळी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दातच विषय संपवला
यशवंतराव चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीतून फुटलेले सर्व मंत्री उपस्थित होते. त्यांनी पवार साहेबांकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. झालेल्या घटनेतून काहीतरी मार्ग तुम्ही काढा, अशी विनंती त्यांनी पवार साहेबांना केली आहे.
Accident News : जम्मूमध्ये जवानांना घेऊन जाणारी गाडी नदीत कोसळली
त्यावर शरद पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी अचानकपणे ही भेट घेतलेली आहे. त्यांचा उद्देश काय हे आजच सांगणे अवघड आहे. पक्ष एकत्रित राहावा यासाठी काहीतरी मार्ग काढावा अशी त्यांनी विनंती केली. मात्र पवार साहेबांनी अजूनतरी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
अजित पवार गटातील मंत्र्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण