राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीतील बंडांनंतर शरद पवार यांनीही मैदानात उतरत दंड थोपटले असून आज त्यांची पहिली सभा येवल्यात होत आहे.