Friday, April 17, 2026
HomeराजकीयShankar Mandekar: भावाचा कलाकेंद्रात गोळीबार; अजितदादांचे आमदार भरसभेत भावनिक, वारकरी समाजाची माफी...

Shankar Mandekar: भावाचा कलाकेंद्रात गोळीबार; अजितदादांचे आमदार भरसभेत भावनिक, वारकरी समाजाची माफी मागत म्हणाले…

मुंबई । Mumbai

भोर-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी आपल्या भावाच्या चुकीबद्दल वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. बुधवारी यवत येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात वारकरी बांधवांच्या उपस्थितीत बोलताना ते भावूक झाले. त्यांनी भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही देत समाजाचे आणि वारकऱ्यांचे आभार मानले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी यवतजवळील चौफुला परिसरातील एका कला केंद्रावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास मांडेकर यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणानंतर कैलास मांडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती, आणि शंकर मांडेकर यांनाही पत्रकारांनी धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर मांडेकर यांनी वारकरी संप्रदायाच्या सभेत आपली बाजू मांडली.

“मी स्वतः वारकरी नाही, पण वारकऱ्यांनी आणि माळकऱ्यांनी माझ्यावर संतांसारखे प्रेम केले आहे. माझ्या भावाने चूक केली, आणि त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाची मनापासून माफी मागतो,” असे मांडेकर यांनी भावूक होत सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, या घटनेनंतरही वारकरी बांधवांनी त्यांना फोन करून पाठिंबा दिला आणि दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. “हा विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे,” असे ते म्हणाले.

मांडेकर यांनी समाजातील चुकीच्या प्रवृत्तींवरही भाष्य केले. “जे चुकीचे करतात, त्यांना समाजातून मुळासकट उपटून टाकले पाहिजे. समाजाला लागलेली ही कीड नष्ट करण्याचे काम मी करत आहे. वारकऱ्यांचा मान कमी होईल, असे कधीच वागणार नाही,” अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी मांडेकर यांनी विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला. “चुकी नसेल तर कोणी दोषी धरणार नाही. हीच ताकद घेऊन मी पुढे काम करणार आहे,” असे सांगत त्यांनी काही नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्यांनी वारकरी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला.

या घटनेने पुणे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. मांडेकर यांच्या माफीमुळे आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे वारकरी संप्रदायातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. यापुढे त्यांच्या कृती आणि समाजसेवेच्या कार्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ एप्रिल २०२६ – मायबोली सक्ती हा सन्मानच!

0
महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात मराठी भाषेचा वापर आणि सन्मान केवळ संवादाचा भाग नसून तो राज्याच्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. राज्य सरकारने घेतलेला एक निर्णय या अस्मितेला...