Thursday, May 15, 2025
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर...

Sharad Pawar : “जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता…”; पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शरद पवारांचे वक्तव्य

पुणे | Pune

- Advertisement -

जम्मू-काश्मीरातील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात असून, तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मन की बात या कार्यक्रमातून बोलतांना दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असे म्हणत इशारा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते’ असे म्हणत भाष्य केले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “भारतवासीयांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकारणात मतभिन्नता असेल. पण जेव्हा देशावर (Country) हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही. आत्ता भूमिका एकच देश एकत्र ठेवणे. त्यानंतर या गोष्टींचा विचार करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण पहलगामचा विषय ऐकत आहोत. अतिरेक्यांनी हल्ले केले. निष्पाप लोकांचा बळी घेतला. जे काही घडलं ती घटना देशाला धक्का होती. हा कुठलाही जाती-धर्माला धक्का नव्हता. हा भारताला धक्का होता. . त्यामुळे आता देशवासीयांसाठी राजकारणात मतभिन्नता नाही,”असे शरद पवार यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “केंद्र सरकारने (Central Government) दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला आपल्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, देशाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. त्यांनी हे सांगितलं की कुठेतरी कमतरता आमच्याकडून झाली. या कमतरतेवर आज चर्चा नाही. ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे वातावरण कसं निर्माण करता येईल हे आता बघितले पाहिजे”, असे शरद पवार यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की, “आज देश संकटात असताना काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू”, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. तसेच “शरद पवार एक विचार आहे. ज्या पद्धतीने आजचे राजकारण सुरू आहे, ते देशासमोरील सगळ्यात मोठे आव्हान आहे. आज विचारहीन राजकारण सुरु असून, लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, संविधानात जिवंत ठेवायचं असेल, तर समाजवादाशिवाय पर्याय नाही,” असे रावसाहेब पवार यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...