Thursday, May 8, 2025
Home Blog Page 12337

कर्जमाफी मिळाल्यास जिल्हा बँकेला चांगले दिवस

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत विधानसभेच्या रणांगणात उतरलेल्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत माहिती मागविली असून, संकटातील शेतकर्‍यांना तुटपुंजी मदत देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यानुसार राज्य शासनाकडून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून थकीत कर्ज,पीक कर्जाची माहिती मागविण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यास आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेला ‘अच्छे दिन’येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा बँकेकडे शेतकर्‍यांच्या कर्जाबाबत शुक्रवारी सविस्तर माहिती मागविण्यात आली. शासनाने ३१ ऑक्टोबर २०१९ अखेरची थकबाकीबाबतची माहिती मागविली असल्याचे पत्र आले आहे. या पत्रानुसार, बँकेकडून माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत,शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यातही सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर, लागलीच कर्जमाफी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात सर्व अधिकार्‍यांकडून माहिती मागविली आहे, विचारपूर्वकपणे कर्जमाफी दिली जाणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेनंतर, राज्य शासनाकडून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

तर जिल्हा बँकेला दिलासा
नोटाबंदीनंतर जिल्हा बँक आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. भाजप सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा अल्पसा दिलासा या बँकेला मिळाला. मात्र, ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी बँकेला किमान अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची नितांत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतल्यास बँकेचा भार काही प्रमाणात हलका होऊ शकतो. तसेच शेतकर्‍यांनाही दिलासा मिळणार असल्याने बँकेचे थांबलेले आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होईल. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्यास शेतकर्‍यांबरोबरच जिल्हा बँकेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अशी आहे थकबाकी
जिल्हा बँकेच्या एक लाख ८२ हजार ९९० सभासदांकडे ३१ ऑक्टोबर अखेर २५१४.१७टी कर्ज येणे बाकी आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात १४ हजार ११६ सभासदांकडे ३८६ कोटी कर्ज बाकी आहे. बँकेकडून एकूण १ लाख ६८ हजार सभासदांकडे २१२८.८० कोटींची थकबाकी आहे. यात अल्पमुदतीचे १ लाख ६५ हजार सभासदाकडे १८२१.७६ कोटी, मध्यम मुदतीचे २ हजार ५९२ सभासदांकडे २७८ कोटी तर, दीर्घमुदतीचे(थकित कर्ज) ३४८ सभासदाकांकडे २७ कोटींची येणे बाकी आहे.

नव्या ३१ महाविद्यालयांना मान्यता; पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत महाविद्यालये सुरू होणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नाशिक, पुणे व नगर या तीन जिल्ह्यात ३१ महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. या ३१ महाविद्यालयांत नाशिकमधील पाच ते सहा महाविद्यालयांचा समावेश असल्याचे समजते. विद्यापीठाअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे ६५० महाविद्यालये, २५० इन्स्टिट्यूट, संशोधन संस्था अशा सुमारे १ हजार संस्था असून, त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी अद्यापही कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे कमी झालेले नाही.

राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाविद्यालयाची इमारत, पायाभूत सुविधा, फिक्स डिपॉजिट यासह ११ मुद्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून विद्यापीठांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यास व्यवस्थापन परिषद सर्व निकषांची व कागदपत्रांची तपासणी करून हे प्रस्ताव मान्य केले जातात. त्यानंतर राज्य शासनाकडून यास अंतिम मंजुरी दिली जाते.

पुणे विद्यापीठाने नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण ३९ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. त्यातील २९ प्रस्ताव पुणे, नगर ४, तर नाशिकमधून ६ महाविद्यालयांसाठीचे प्रस्ताव होते. ३९ पैकी ३६ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे, तर ३ प्रस्ताव विधी महाविद्यालयांचे होते. हे प्रस्ताव नोव्हेंबर संपण्यापूर्वी राज्य शासनाकडे दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे (शुक्रवारी) पुणे विद्यापीठात तातडीने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. त्यामध्ये अपूर्ण कागदपत्र व त्रुटींमुळे आठ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंजूर झालेले ३१ प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

२१ पोलीस निरीक्षकांची खांदेपालट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयातील २१ पोलीस निरीक्षक आणि १५ सहायक पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे. दरम्यान, पंचवटी, म्हसरुळ, उपनगर व अंबड या पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक विभागातील एक अशा पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही अंतर्गत बदली करण्यात आली आहे.

पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क आधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांची वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागात बदली झाली आहे. तसेच वाहतूक शाखेतील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांची अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची तक्रार निवारण कक्षात तर सुभाष देशमुख यांची दहशतवाद विरोधी पथकात बदली झाली आहे.

वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून म्हसरूळचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांची वाहतूक शाखेच्या जागरुकता अभियान-प्रशिक्षण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची तांत्रिक विश्लेषण शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेतील सुरेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

तक्रार निवारण कक्षातील किशोर मोरे यांची विशेष शाखेत, दहशतवाद विरोधी पथकाचे राजेश आखाडे यांची नियंत्रण कक्षात, विशेष शाखेचे निलेश माईनकर यांची शहर वाहतूक शाखेत, पोलीस मुख्यालयातील विजय पन्हाळे यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तर वाचक शाखेच्या पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांची निर्भया पथक, महिला सुरक्षा विभागाच्या प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह दंगल नियंत्रण पथकाचे अनिल पवार यांची शहर वाहतूक शाखेत, तांत्रिक विश्लेषण शाखेतील इरफान शेख यांची पोलीस आयुक्त यांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.

या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या(एपीआय) बदल्या
पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील १५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यातील १२ आधिकार्‍यांच्या बदल्या पदोन्नतीवर पदस्थापना आवश्यक असल्याने करण्यात आल्या असून इतर ४ बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा विभागाच्या भावना महाजन यांची पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) म्हणून बदली झाली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक काकवीपुरे आणि शांताराम डंबाळे यांची अनुक्रमे सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांची अंबड पोलीस ठाणे, महेश येसेकर यांची आर्थिक गुन्हे शाखा, दिनेश खैरणार यांची गुन्हे शाखा, सत्यवान पवार यांची पंचवटी पोलीस ठाणे, प्रविण सूर्यवंशी गंगापूर पोलीस ठाणे, यतिन पाटील यांची सरकारवाडा, साजिद मन्सुरी यांची मुंबई नाका, हेमंत नागरे यांची सातपूर, प्रकाश गीते यांची देवळाली कॅम्प, सुधीर पाटील यांची म्हसरूळ, चंद्रकांत सपकाळे यांची अर्थिक गुन्हे शाखा, सुरेश कोरबू यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

नाशिककरांसाठी इराकहून आलेल्या पवित्र ‘गलेफ’ चे ८ डिसेंबर पासून मिळणार दर्शन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जुने नाशिक । प्रतिनिधी

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरू पिराने पीर रौशन जमीर बडे पीर हजरत गौस-ए-आझम यांच्या पवित्र जयंतीनिमित्त येथील खडकाळी मशिदीत दोन दिवस बगदाद शरीफ (इराक) येथील पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या पवित्र ‘गलेफ’ (इस्लामी चादर) चे भाविकांना दर्शन मिळणार आहे.

मागील पांच वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदाही खडकाळी मशिदच्या आवारात हजरत गौस-ए-आझम व इमामे आझम हजरत अबू हनिफा यांच्या पवित्र मजार शरीफवरुन आलेल्या गलेफचे भाविकांना दर्शन देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होणार आहे. तर सोमवारी (दि.९) रात्री बारा वाजेपर्यंत चालणार आहे. या दरम्यान फक्त पुरुषांना प्रवेश राहणार असून दर्शन घेऊन प्रार्थना करण्यासाठी व बसण्याची विशेष सोय करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत अब्दुल मजीद सालीमुल कादरी यांनी नाशिककरांसाठी खास बगदाद शरीफहून नाशिकचे मरहूम हनिफ पाटकरी यांच्याकडे गलेफ पाठवले होते. पाटकरी परिवार व परिसरातील तरुणांच्या वतीने दर्शनाचा कार्यक्रम अखंडित सुरू असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मशिदीचे इमाम मौलाना अब्दुल रशीद मुक्तदी, असलम खान, जुबेर सय्यद, गुलाम गौस पाटकरी यांनी केले आहे.

ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौस-ए-आझम यांची जयंतीप्रीत्यर्थ सोमवारी चौक मंडई येथून जुलुसे गौसीयाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त शहरपरिसरातील मुस्लीम बहुल भागात सजावटीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मशिदी, दर्गा शरीफसह मुस्लीम बांधवांची घरे व दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. दरवर्षी इस्लामी रब्बीउल सानी महिन्याच्या ११ तारखेला जयंती जगभर साजरी होते. नाशिकमध्ये जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर २०१९, रविवार, शब्दगंध

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘नियोजन’च्या पाच जागांसाठी 24 डिसेंबरला पोटनिवडणूक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कार्यक्रम जाहीर : उद्यापासून उमेदवारी अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन मंडळाच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारपासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजनच्या जिल्हा परिषद (ग्रामीण निर्वाचन क्षेत्र) यामधून राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटातील सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून महापालिका (मोठ्या नागरी निर्वाचन) क्षेत्रातून तीन जागा मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत. नगरपालिका-नगरपरिषद (लहान नागरी निर्वाचन) क्षेत्रातून एक जागा रिक्त झाली आहे. या पाच जागांसाठी 24 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सोमवार (दि.2) ते गुरूवार (दि.5) या काळात उमेवादी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच दिवशी दाखल उमेदवारांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहे.

त्यानंतर शुक्रवारी 6 तारखेला छानणी होणार असून शनिवार (दि.7) वैध उमदेवारी अर्जाची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. याच काळात उमदेवारी अर्जासंदर्भात अपिल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 13 तारखेला वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार असून 16 तारखेला माघार घेता येणार असून 24 तारखेला प्रत्यक्षात सकाळी 8 ते सायंकाळी 5 या काळात मतदान प्रक्रिया होणार असून 26 तारखेला मतमोजणी होणार आहे.

मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही महासैनिक लॉन या ठिकाणी होणार आहे. या निवडणुकीत ग्रामीण निर्वाचन क्षेत्रासाठी उर्मिला पाटील महसूल उपजिल्हाधिकारी, मनपा निर्वाचन क्षेत्रासाठी अजय मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन आणि लहान निर्वाचन क्षेत्रसाठी शाहुराज मोरे उपजिल्हाधिकारी भूसंपादन हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांनी आरोग्याला अग्रक्रम द्यावा : अश्विनी आहेर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नांदगाव । प्रतिनिधी

संसाराचा रहाटगाडा हाकताना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाला पुढे नेतांना स्वत:चे आरोग्य चांगले राहील, याची काळजी महिलांनी घेतली पाहिजे. यासाठी पहिले प्राधान्य आरोग्याला दिले पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी अनिल आहेर यांनी व्यक्त केले. ‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नांदगाव येथे आयोजित महिला आरोग्य महोत्सव आणि बचत गट जत्रेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

‘देशदूत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने नांदगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. प्राचार्म डॉ.एस.आम.पटेल, तालुका अभिमान कक्षाचे विलास झाल्टे, नामको हॉस्पिटलच्या डॉ.प्राची डुबेरकर, देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे, जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने व्यासपीठावर होते.

अश्विनी आहेर  म्हणाल्या की, २१ व्या शतकात स्त्री पुरुष भेदाभेद नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी ठसा उमटवला आहे. कुटूंबाची काळजी घेतांना महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कुटूंबाला पुढे न्यायचे असेल तर महिलांनी स्वत:च्या आरोग्याला अग्रक्रम दिला पाहिजे. त्यासाठी वेळ काढला पाहिजे. महिलांसाठी देशदूत राबवित असलेल्या उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राचार्य पटेल म्हणाले की, महिला घराला घरपण देते मात्र तिच्या आरोग्याची उपेक्षा होते.

सुदृढ कुटूंबासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. डॉ.प्राची डुबेरकर म्हणाल्या की, शिक्षणाइतकेच महत्व विद्यार्थिनींनी आरोग्याला दिले पाहिजे. उपचारापेक्षा आरोग्याची दक्षता अधिक महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका अभियान कक्षाचे विलास झाल्टे यांनी महिला व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

हेमंत अलोने यांनी प्रास्ताविकात आरोग्य महोत्सवाची भूमिका मांडली. देशदूतचे मनमाड तालुका प्रतिनिधी बब्बु शेख यांनी सूत्रसंचालन केले तर नांदगाव तालुका प्रतिनिधी संजय मोरे यांनी आभार मानले. आरोग्य महोत्सवासाठी सकाळपासूनच विद्यार्थिनी व महिलांनी गर्दी केली होती. दिवसभर अनेक महिलांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन विविध तपासण्या करुन घेतल्या. विद्यार्थिनी वजन, उंची, बीएमआय, रक्तदाब, रक्तातील साखर अशा प्राथमिक तपासण्या करुन घेण्यासाठी उत्साहाने पुढे आल्या.

डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडे तपासणी व समुपदेशनासाठी दाम्पत्यांनी हजेरी लावली. नामको हॉस्पिटलच्या कान नाक घसा तज्ज्ञ डॉ.प्राची डुबेरकर, वैद्यकीय समन्वयक डॉ.पंकज दाभाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आरती नवले यांनी विद्यार्थिनी व महिलांची तपासणी केली. त्यांना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते महेश बेंडकुळे, आरोग्य मित्र पुंडलिक चोरटे, परिचारिका सपना विसपुते, पुष्पा गाडगीळ यांनी सहाय्य केले. डॉ.लाड यांचे नवजीवन हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनाली लोंढे यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्यांना रश्मी वाहब यांनी सहाय्य केले.

बचत गटांची जत्रा
यावेळी बचतगट जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बारा बचतगटांंनी सहभाग नोंदवला. यात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी स्वराज्य संंयम् (न्यायडोगरी), गणेश व साईश्रध्दा (मल्हारवाडी), एकता (साकोरा), जय बाबाजी (न्यायडोगरी), शिवगौरी (न्यायडोगरी), बिजासनी (न्यायडोगरी), एकता (न्यायडोगरी), लक्ष्मी माता (पिपरखेड) हे बचतगट जत्रेत सहभागी झाले होते. बचत गट जत्रेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभिमान (उमेद) अंतर्गत नांदगाव तालुका पंचायत समितीच्या अभिमान कक्षाचे सहकार्य लाभले.

सॅनिटरी नॅपकिन मशिन भेट
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून देशदूततर्फे जिल्हाभरात १०० सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. आजच्या आरोग्य महोत्सवात नांदगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन भेट देण्यात आले. देशदूतचे महाव्यवस्थापक आर.के. सोनवणे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थिनींकडे हे मशिन सुपूर्द केले. जिल्ह्यातील १०० शाळा, महाविद्यालये व काही सार्वजनिक स्थळी हे मशिन्स बसविण्यात येणार आहेत. आवश्यक त्या महाविद्यालयांना डिस्पोजल मशिनही देण्यात येणार आहेत.

नुकसानग्रस्तांना मदतीचा दुसरा हप्ता उद्या मिळणार ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले संकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंंबर महिन्यांत अतिवृष्टी आणि अवेळी पावसाने शेतकर्‍यांचे 485 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने मदतीचा अहवाल तयार करून शासनाकडे भरपाईसाठी पाठविला होता. त्यानुसार सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता. यातील दुसर्‍या टप्प्यातील निधी उद्या (सोमवारी) मिळणार असल्याचे संकेत विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी ‘सार्वमत’शी बोलतांना दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी विभागीय आयुक्त माने यांच्याकडे केली असून पहिल्या हप्त्यातील जवळपास 80 टक्के रक्कम तालुका पातळीवर आणि तेथून शेतकर्‍यांपर्यंत वर्ग करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

जिल्ह्यात अवेळी आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून 4 लाख 54 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 36 हजार 146 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनदरबारी होता. त्यानूसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी बँकेत वर्ग करण्यात आला. या मदतीचे वाटप तालुकास्तरावरून करण्यात येत आहे.

खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे. मात्र बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्ध्वस्त केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या शासनाला पाठविलेल्या 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.

दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.
दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.

विकास आराखडा ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी फिरविली पाठ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पुणतांबा ग्रामपंचायत सरपंचासह बहुतांशी सदस्यही गैरहजर

पुणतांबा (वार्ताहर) – गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी पाठ फिरविली. तसेच सरपंच व बहुतांशी ग्रामपंचायत सदस्य गैरहजर राहिल्यामुळे पुणतांब्याच्या विकासाबाबत गावच्या विकासाच्या गप्पा मारणारे नेते व ग्रामस्थ किती जागृत आहे, याचा प्रत्यय दिसून आला.

शनिवारी 11 वाजता गावच्या विकासाचा आराखड्यावर चर्चा करण्यासाठी उपसरपंच वंदना धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य श्याम माळी, सर्जेराव राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी डी. के. राऊत, डॉ. घालम, नामदेव धनवटे, प्रताप वहाडणे, जे. डी. धुमाळ, अरुण बाबरे, डॉ. बखळे, संदीप वहाडणे आदींसह शिक्षण व आरोग्य विभागाच्या काही सेवकांसह 20 हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या गावच्या ग्रामसभेत 30 ते 40 ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी उशिरा सुरू झालेल्या ग्रामसभेचे प्रास्ताविक केले. यावेळी नामदेव धनवटे यांनी नियमानुसार ग्रामसभेची सूचना 7 दिवस अगोदर दिली पाहिजे, आपण काल 29 तारखेचा उल्लेख करून फलकावर सूचना लावली हे कायदेशीर नाही. या बाबीकडे लक्ष वेधले. मात्र या मुद्यामुळे ग्रामविकास अधिकारी निरूत्तर झाले व त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी गावच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला व बालकल्याण युवक प्रशिक्षण, अनु. जाती, जमाती पर्यावरण तीर्थस्थळ, धार्मिक ठिकाण विकास, पशुसंर्वधन, वृक्षारोपण, अपंग व्यक्तीसाठी योजना माहिती व तंत्रज्ञान, ग्रंथालय, सौर उर्जा, गाव सुशोभीकरण या घटकावर चर्चा करून विकास आराखड्यात कोणत्या बाबींचा समावेश करावयाचा आहे, याबाबत सूचना करण्याचे आवाहन केले. विकास आराखडा तयार केल्यामुळे 15 व्या वित्त आयोगात पुरेसा निधी मिळेल. तसेच प्रत्येक वर्षासाठी आराखड्यानुसार विकासाच्या योजना प्रभावीरित्या राबविता येईत, असे स्पष्ट केले.

पुणतांबा- चांगदेवनगर रस्त्याच्या विद्युतीकरणाचा आराखड्यात समावेश करण्याची सूचना डॉ. बखळे यांनी केली. शिक्षण विभागाशी निगडीत मागण्यांची यादीच सोमनाथ वैद्य यांनी सादर केली. वीज विभागाच्या प्रतिनिधीने ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईनवर आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते, ही बाब निर्दशनास आणून दिली. कृषी विभागाचे धुमाळ यांनी कृषी योजनांची माहिती दिली. यावेळी अरुण बाबरे, प्रताप वहाडणे, सर्जेराव जाधव, महेश कुलकर्णी, डॉ. बखळे यांनी चर्चेत भाग घेतला. ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याबद्दल नाराजीचे वातावरण होते.

वीज मंडळाच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी हैराण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त झाला. आता पाऊस उघडला. वीज मंडळाने शेतकर्‍यांना जेरीस आणले आहे. कार्यकारी अभियंता म. राज्य वीज मंडळ, कर्जत जि.अहमदनगर यांचेकडून शेतकर्‍यांना जळालेले ट्रान्सफार्मर महिना , दोन महिने मिळत नाहीत. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे ठेकेदार भरपूर आहेत. परंतु वीज मंडळाकडे ऑईल नसल्याचे कारण वेळोवेळी सांगितले जाते. कधी कधी तुमचा नंबर फार लांब आहे असे सांगितले जाते. वीज मंडळात लाईन ओढण्याची ठेकेदारी करणारे काही ठेकेदार शेतकर्‍यांकडून 15 ते 20 हजार रुपये घेऊन ऑईलसह ट्रान्सफार्मर तातडीने पोहोच करतात. ही शेतकर्‍यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक आहे अशी तक्रार श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवून केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवरही दाखल केली आहे.

प्रा. दरेकर म्हणाले, हिरडगाव येथील दरेकर मळ्यातील ट्रान्सफार्मर 15 दिवसात दोन वेळा जळाला. त्याच्या कारणांची शहानिशा करून वीज मंडळाने ट्रान्सफार्मर भरणार्‍या ठेकेदाराकडून हमी ( वारंटी) कालावधीत तातडीने ट्रान्सफार्मर बदलून देण्यासाठी वीज मंडळाने तत्परता दाखविली पाहिजे. परंतु वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्‍यांनाच पिळू पिळू घेतात. एका बाजूला शेतकर्‍यांना न्याय देणार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात आणि वीज मंडळाचे अधिकारी नेमके उलटे वागतात. शासनाने जळालेला ट्रान्सफार्मर दोन ते तीन दिवसात देण्याची व्यवस्था करावी व त्यासाठी लागणारे ऑईल मान. कार्यकारी अभियंता , म.रा. वीज मंडळ यांना उपलब्ध करून द्यावेत. ऑईलसाठी शेतकर्‍यांचा खोळंबा करू नये.

वीज मंडळाचे अधिकारी शेतकर्‍यांना जुमानत नाहीत. त्यांची चेष्टा करतात. फोन उचलत नाहीत. ट्रान्सफार्मर घेऊन जाण्यासाठी शेतकर्‍यांना भाड्याच्या गाड्या करावयास लावतात. दरमहा किती ट्रान्सफार्मर जळाले ? त्यापैकी किती भरून दिले ? किती दिवसांनी भरून दिले ? याचा आढावा दर महिन्याला वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतला पाहिजे.

सध्या शेतकरी सर्व खात्यामध्ये वीज खात्याला फारच वैतागलेले आहेत. या खात्याच्या सचिवांनी स्वत: लक्ष घालून याबाबत शिस्त निर्माण करावी अशी अपेक्षा आहे. सध्या कर्जत ( अहमदनगर ) येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे सुमारे 80 जॉब (ट्रान्सफार्मर) शेतकर्‍यांना देणे पेंडिंग आहेत, अशी माहिती मिळते.हे किती दिवसांनी मिळणार ? तोपर्यंत शेतकर्‍यांची पिके जगणार का ? हा खरा प्रश्न आहे. नैसर्गिक आपत्ती नंतर वीज मंडळ अनैसर्गिक आपत्ती निर्माण करीत आहे, असेही प्रा. दरेकर म्हणाले.