Saturday, April 11, 2026
Home Blog Page 13162

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी आज पक्ष कार्यालयात मुलाखती

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

प्रदेश कमिटीकडून तीन सदस्यीय समिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून रिक्त असलेल्या युवक काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा युवक कॉँग्रेसला लवकरच जिल्हाध्यक्ष मिळणार आहे.

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव सुमित भोसले, अभय देशमुख व अभिजित शिवरकर यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती उद्या दि. 26 डिसेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महिलाध्यक्षा व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची भेट घेऊन युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाबाबत चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार आहेत.

काँग्रेस पक्षाची भूमिका, ध्येय धोरणे आणि जबाबदारींची विभागणी, प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी. राष्ट्रीय अध्यक्षा खा. सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांचा विचार अखेरच्या माणसांपर्यंत पोहचावा व युवक संघटन मजबूत करणे आदी बाबींवर सक्षम असणार्‍या जिल्हाध्यक्षाची निवड प्रदेश नेतृत्वाला अपेक्षित आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणार्‍या जिल्ह्यातील युवक पदाधिकार्‍यांची उद्या दि. 26 डिसेंबरला दुपारी बारा वाजता पक्षाच्या लालटाकी येथील कार्यालयात मुलाखत घेण्यात येणार असल्याचे निवड समिती सदस्य महासचिव सुमीत भोसले यांनी सांगितले.

‘त्या’वेळी बरखास्त
दरम्यान, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे पद हे लोकसभा निवडणुकीपासूनच रिक्त होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान युवक काँग्रेसच्या निरीक्षक जिल्हा परिषद सदस्या नयना गावित यांनी अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली होती. पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने तत्कालीन परिस्थितीत त्यांनी ही कारवाई केली होती.

अण्णांच्या मौनव्रताचा सहावा दिवस : जिजाऊ ब्रिगेडचा पाठिंबा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- महिलांना कार्य करताना अडचणी येतील, काही लोक टीका, निंदा करतील, अपमान केला तर पचवायला शिका, नैराश्य कधी येऊ देऊ नका, नैराश्य येणे रोग आहे, सावित्रीबाई फुले यांच्यासारखी क्रांती जरी करता आली नाही तरी त्यांनी दिलेल्या विचारांच्या वाटेवरून गेलो तरी समाजासाठी मोठे काम होईल, त्यातच आपल्या देशाचे हित आहे, असा संदेश ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी दिला. हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिजाऊ बिगेडच्या महिलांनी हजारे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. त्यावेळी हजारे यांनी त्यांच्याशी लिखीत संदेशाद्वारे संवाद साधला.

हजारे यांनी दिल्लीच्या निर्भयास न्याय मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार केला असून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलाही निर्भयास न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चूल, मूल समाजासाठी महत्त्वाचे आहे. मला एक शिवबा, भगतसिंग घडवायचा आहे असा विचार करून यश, अपयशाची चिंता न करता निष्काम भावनेने काम करा. वयाच्या 62 व्या वर्षापर्यंत मी अपमान सहन केला, तेव्हा कुठे मला समाजासाठी काहीतरी करता आल्याचे हजारे यांनी आपल्या संदेशात नमूद केले.

महिलांवर होत असलेले अत्याचार पाहून महिलांच्या सुरक्षिततेविषयी काळजी वाटते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान दिले. चूल व मूल या चक्रातून बाहेर काढले. अत्याचार सहन करण्यासाठी सावित्रीने स्त्रिला समाजात स्थान दिले का, असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या या महाराष्ट्रात अशा घटना घडायलाच नको यासाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रणालीतही बदल करणे गरजेचे आहे. मुलींना स्वतःचे संरक्षण करण्याचे शिक्षण देउन आत्मनिर्भर करणे गरजेचे असून ती काळाची गरज असल्याच्या भावना विविध महिलांनी व्यक्त केल्या.

यावेळी रोहिणी वाघमारे, डॉ. रजनी मुळे, रोहिणी कासार, उषा खेडेकर, सुवर्णा गट, अर्चना औटी, कविता मगर, मनीषा मगर, गायत्री मगर, मंगल काळे, पल्लवी बांदल, संगीता गाडेकर, कमल देशमाने, राधिका तोटे, रेखा औटी, मयुरी औटी, वैशाली ठुबे, लिलाबाई बोरुडे आदी उपस्थित होत्या.

नेहरू मार्केटचे बांधकाम तातडीने करावे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भाजी विक्रेते संघटना व बचाव कृती समितीचे निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) – नऊ वर्षांपूर्वी पाडलेले नगरमधील नेहरू मार्केट अत्याधुनिक पद्धतीने उभारून गाळेधारक व ओटेधारकांची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी चितळे रोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटना आणि नेहरू मार्केट बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना निवेदन दिले. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे द्विवेदी यांनी शिष्टमंडळास सांगितले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा, नगरसेवक दत्ता कावरे, सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख, शरद मडुर, सोमनाथ चिंतामणी, श्रीदेवी अरोगोंडा, अनीस शेख, राजेंद्र राऊत, अदिनाथ गिरमे, मुन्ना बागवान, भागचंद कोकाटे, रामा केळकर यांच्यासह नेहरू मार्केटचे गाळेधारक व ओटेधारक उपस्थित होते.

2010 मध्ये चांगल्या अवस्थेत असलेले नेहरू मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. नेहरू मार्केट पाडताना पुन्हा त्या जागेवर भाजी मार्केट व शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या नऊ वर्षामध्ये नेहरू मार्केटच्या उभारणीचे काम सुरू झाले नाही. नेहरू मार्केटच्या उभारणीसाठी दोन्ही संघटनांनी वारंवार आंदोलने, निवेदन देऊन शासनस्तरावर पाठपुरावा केला.

2013 मध्ये झालेल्या आंदोलनात तत्कालीन पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. यावर अद्याप कार्यवाही झालेली नसून, नाईलाजास्तव नेहरू मार्केटचे गाळेधारक व ओटेधारकांना रस्त्यावर भाजी विक्रीस बसावे लागत आहे. दिल्लीगेट ते नेता सुभाष चौक दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, नेहरू मार्केट उभारून भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविल्यास हा रस्ता मोकळा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळाने नेहरू मार्केटचा संपूर्ण इतिहास सांगून, शासन नेहरू मार्केट उभारणीसाठी अनुदान देत नाही. महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी नेहरू मार्केटचे काम खाजगीकरणातून पूर्ण केले जाऊ शकत असल्याचे स्पष्ट करीत यासाठी लवकरच निविदा काढण्याचे आश्वासन दिले. ताबडतोब नेहरू मार्केट उभारणीबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

बारागाव नांदूरला 18 पैकी 10 मास्तरांची शाळेला दररोज दांडी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संत तुकाराम विद्यालयात ‘राम भरोसे’ भरते शाळा || प्रार्थना, राष्ट्रगीत बंद; मुख्याध्यापकांची ‘लेटएन्ट्री’; नागरिक संतप्त

बारागाव नांदूर (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर असलेले बारागाव नांदूर गाव मात्र, शैक्षणिकदृष्ट्या पिछाडीवर पडले आहे. येथील श्रीशिवाजी प्रसारक मंडळाच्या संत तुकाराम विद्यालयातील 18 शिक्षकांपैकी 10 शिक्षकच शाळेत गैरहजर राहत असल्याने शाळेचा बोजवारा उडाला आहे.

ज्यांच्या खांद्यावर शाळेची जबाबदारी दिली, ते मुख्याध्यापकही शाळेमध्ये 12 वाजता येऊन ‘लेटएन्ट्री’ करीत असल्याने शाळेत प्रार्थना, राष्ट्रगीत वाचन होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, काही शिक्षकांना राजकीय नेते बोलावून घेतात, त्यामुळे त्यांना जावे लागते, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. शिक्षकांकडे राजकारण्यांचे काय काम अडते? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

बारागाव नांदूर येथील संत तुकाराम विद्यालयामध्ये मंगळवारी सकाळी 11.30 वाजता ग्रामपंचायत सदस्यांसह काही ग्रामस्थांनी अचानकपणे भेट दिली. शाळेमध्ये केवळ 4 ते 5 महिला शिक्षिका वगळता 2 शिक्षक हजर होते. तत्पूर्वी शाळा प्रार्थना व राष्ट्रगीत वाचन न होताच मुले वर्गामध्ये जाऊन बसली असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी 11.30 वाजता वर्गात जाणे पसंत केले. त्यानंतर काही शिक्षकांनी शाळेमध्ये हजेरी दिली.

जि.प.सदस्य धनराज गाडे, उपसरपंच युवराज गाडे, निवृत्ती देशमुख, डॉ.ज्ञानेश्वर आघाव, गोविंद जाधव, संतोष शिंदे, शिवा गाडे, रोहिदास बर्डे, विनोद पवार, आदींनी शाळेत दाखल होऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली. बहुतेक शिक्षक अनुपस्थित असल्याने अनेक वर्गांमध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरूच होता.

मुख्याध्यापक हरिश्चंद्रे हे दुपारी 12 वाजता शाळेत हजर झाले. त्यांनी शिक्षकांच्या अनुपस्थितीबाबत ग्रामस्थांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व अधिकार्‍यांवर आपला रोष व्यक्त केला. मुख्याध्याक हरिश्चंद्रे यांनी यापुढे शाळेबद्दल कोणतीही तक्रार येणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

देवळालीत डेंग्यूसदृश आजाराने नागरिक हैराण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – डेंग्यूसदृश आजाराच्या तापाने देवळाली प्रवरातील अवघा शेटेवाडी परिसर फणफणला आहे. प्रत्येक कुटुंबातील दोन-तीन व्यक्ती या आजाराने बाधीत झाले आहेत. मात्र, याकडे लक्ष द्यायला आरोग्य विभागाला वेळ नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेटेवाडी परिसरात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने सुरूवातीला तीन-चार दिवस अंगावर बारीक ताप येतो व डोके दुखते. त्यानंतर रुग्णाला प्रचंड ताप येतो. या आजाराने शेटेवाडी येथील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी नागरिक देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी येथील स्थानिक दवाखाने तसेच श्रीरामपूर, राहुरी व नगर येथे दाखल झाले आहेत.

घरातील एकाला उपचार करून घरी आणले की, घरातील दुसरी व्यक्ती आजारी पडत आहे. काहींचे तर संपूर्ण कुटुंबच आजारी पडले आहे. तर काही ठिकाणी एक-एक व्यक्ती आजारी आहे. रुग्णांनी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. या आजारावरील उपचार मोठा खर्चीक असल्याने नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

एका रुग्णाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपयांपासून पन्नास, साठ हजार रुपये खर्च येत आहे. आरोग्य विभागाने दखल घेऊन रुग्णांची तपासणी करून लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.

मध्यंतरीच्या सततच्या पावसा नंतर शेटेवाडीसह परिसरात मोठ्या प्रमाणात डास निर्माण झाले. डास निर्मूलनासाठी वेळेत फवारणी होणे गरजेचे होते. परंतु ही फवारणी वेळेवर झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी कडेकडेने फवारणी करून निघून गेले. वाडीच्या आतमधील गल्ल्यांत थातूरमातूर फवारणी करून ते निघून गेले. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात डास झाले व त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला. डेंग्यूसदृश आजाराने वाडीवर थैमान घातले असताना येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी, बहेनजी किंवा तत्सम कोणीही नागरिकांना बघण्यास अद्यापपर्यंत आले नाही हे विशेष !

संतप्त आदिवासी महिलांनी ठोकले म्हैसगाव ग्रामपंचायतीला टाळे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कर्मचार्‍यानेच तोडले टाळे; ठाकरवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी, पाण्यासाठी आदिवासी महिलांची रानोमाळ भटकंती

राहुरी (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील म्हैसगाव हद्दीतील आदिवासी बहूल असलेल्या ठाकरवाडीच्या समस्या गेल्या अर्धशतकातही सुटलेल्या नाहीत. हाकेच्या अंतरावर मुळा धरण असूनही गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणार्‍या संतप्त आदिवासी महिलांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायतीलाच टाळे ठोकून सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर महिलांनी ठोकलेले टाळे एका कर्मचार्‍यानेच तोडल्याने आदिवासी महिलांचा संताप वाढला आहे.

संतप्त महिलांनी राहुरीचे तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनाही निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले, ठाकरवाडी येथील ग्रामस्थ म्हैसगाव ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला वैतागलो आहे. आदिवासी वाडीला शासनाने रोजगार हमी योजनेतून 11 लाख रुपये खर्चून विहीर बांधून दिली. विहिरीत सध्या 50 फूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

मात्र, त्यावरील मोटारी दुसरीकडेच बसविण्यात आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दर्‍यांत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. ठाकरवाडीतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत. ठाकरवाडी ही आदिवासी वस्ती असून स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव होऊन साथीच्या आजाराची लागण झाली आहे. कचरा कुंडीजवळ सुमारे 5 ते 10 फूट कचर्‍याचे ढीग साचलेले असल्याने दुर्गंधीही वाढली आहे.

सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारी व स्वच्छता गृह तुंबलेले असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्या तुंबून आजार वाढले असून ठाकरवाडीत डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत वाडीवर डास प्रतिबंधक फवारणी केली जात नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. सरपंच बाहेरगावी नोकरीला असून सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानीला आदिवासी कंटाळल्याने सरपंच व ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आदिवासी महिलांनी केली आहे.

निवेदनावर विजय विधाटे, सोमनाथ मुसळे, राहुल दुधाट, अर्जुन दुधाट, हिरामण बर्डे, भीमराज शेलार, वनिता जाधव, ताराबाई जाधव, अनिता जाधव, गीताबाई पारधे, सविता पारधे, मंदाबाई जाधव, मनीषा जाधव, भाऊराया जाधव, पारूबाई जाधव, येणूबाई जाधव, कारूबाई जाधव, कविता जाधव, सोनाबाई जाधव, वैशाली जाधव, झुंबरबाई जाधव, किसन जाधव, पोपट जाधव, भीमबाई जाधव, लता जाधव, किरण जाधव, अंकुश जाधव, रोहित जाधव, मंगल जाधव, मंदाबाई पारधे, मीनाबाई पारधे, रमेश जाधव, भाऊसाहेब पारधे आदींसह आदिवासी महिलांची नावे आहेत.

गेल्या 50 वर्षांपासून ठाकरवाडी येथील आदिवासी शेतकरी आणि महिला आपल्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी संघर्ष करीत होते. त्यांचे काही प्रश्न पद्मभूषण स्व. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी मार्गी लावले. मात्र, आता राजकीय कोलदांड्यामुळे पुन्हा ठाकरवाडीच्या समस्या आ वासून उभ्या राहिल्या असून आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी हेळसांड होत आहे. वनखात्याच्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी गेलेल्या महिलांना वनखात्याचे कर्मचारी अरेरावी करून त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तर ठाकरवाडीतील वीजही खंडित करण्यात आली असून ठाकरवाडी पुन्हा अंधारात सापडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शासनाने दिलेल्या विहिरीच्या पाण्यावर धनदांडगे सायफन करून डल्ला मारीत असल्याने आदिवासी महिलांना हक्काचे पाणी मिळत नाही. अशी दुरवस्था झाली असून शासकीय अधिकारी मात्र, याकडे डोळेझाक करीत आहेत.

जीवघेणी डबलट्रॉली ऊस वाहतूक देतेय अपघातांना निमंत्रण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

परिवहन विभागाचे दुर्लक्ष; नेवासा बुद्रुक ग्रामस्थांचा रास्तारोकोचा इशारा

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- टेप लावून गाण्याच्या तालावर बेधुंद चालणारी ऊस वाहतूक करणारी वाहने आपघाताला निमंत्रण देत असून चाळणी झालेल्या नेवासा- श्रीरामपूर रस्त्यावर अशा वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून नेवासा बुद्रुक परिसरातील नागरिक, व्यापारी वर्ग व शालेय विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने लवकरच रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर तसेच नेवासा बुद्रुक, बहिरवाडी, भालगाव, सुरेगाव, पुनतगाव, पाचेगाव या भागात डबलट्रॉलीच्या ट्रॅक्टरद्वारे उसाची सर्रास वाहतूक सुरू आहे. यात अपघात झाल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. नेवासा बुद्रुक परिसर गंगाथडीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन आहे. येथून ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून पंधरा ते वीस टन उसाची वाहतूक केली जाते. ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर टेप लावून बेशिस्तपणे चालत असल्याने इतर वाहनांना अपघताचा धोका निर्माण होतो.

टॅ्रक्टरच्या ट्रॉलीला मागील बाजूस कुठल्याही प्रकारची रेडियम पट्टी किंवा साईड लाइट लावलेले नसतात. याकडे परिवहन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोईस्करपणे दुर्लक्ष करताना दिसून येतात. यापूर्वीही रस्त्यावर लहान मोठ्या अपघातात हकनाक अनेकजण बळी गेले आहेत. या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भरधाव वेग, कर्णकर्कश हॉर्न, टेपरेर्कार्डरच्या गाण्यांचा मोठा आवाज आणि डबलट्रॉलीने उसाची नियमबाह्य वाहतूक करणार्‍या या ट्रॅक्टरला ओलांडून दुचाकीस्वार व अन्य वाहनचालक भीतभीतच पुढे जातात. दुचाकी, चारचाकी वाहन चालवणे म्हणजे मरणाला सामोरे जाणे अशीच परिस्थिती आहे.

डबलट्रॉली ट्रॅक्टर चालकांत बहुतेक जणांकडे वाहन परवाना व वाहनांची कागदपत्रेही नसतात. वाहनांना रिफ्लेक्टरही नसते. अशी वाहने बंद पडली किंवा टायर पंक्चर झाले तर रस्त्यावर आहे तिथेच दोनदोन दिवस वाहन सोडून चालक निघून जातात. रात्रीच्या वेळी अशा वाहनांना धडकून अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे.

वाहन परवाना नियमावलीनुसार ट्रॅक्टरचालकांना वाहतुकीसाठी फक्त एकाच ट्रॉलीचा वापर करता येतो. त्याचबरोबर पाठीमागील बाजूस परावर्तक पट्ट्या बसवाव्या लागतात. वाहनाचा वेग ताशी दहा किमी वेगाचा असावा व क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करू नये. ट्रेलरसहित ट्रॅक्टरची लांबी 18 मिटरपेक्षा अधिक असू नये. हे सर्व नियम असले तरी मात्र परिवहन अधिकारी यांनी हे नियम धाब्यावर बसवले असल्याचे दिसते.

नेवासा श्रीरामपूर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर चाळणी झाली असून सदरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत .सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
– नवनाथ मारकळी, ग्रामपंचायत सदस्य, नेवासा बुद्रुक

डबल ट्रॉलीची वाहने एकामागे एक धावतात. मागच्या वाहनांना अशा वाहनांना ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) अपघात घडतात.रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार समोरच्या वाहनांना धडकतात. अशा बेशिस्त वाहतुकीला लगाम घालावा.
– संभाजी ठाणगे, सामाजिक कार्यकर्ते

शेती व पिण्याच्या शाश्वत पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आ. आशुतोष काळे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन केली मागणी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा पर्जन्यछायेखाली येत असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात नेहमीच पाऊस कमी पडतो. मागील काही वर्षांपासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचे हक्काचे पाणी जायकवाडीला जात आहे. त्यामुळे मतदारसंघातील शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असून कोपरगाव शहरासह मतदार संघातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे.

आपण व्यक्तिगत लक्ष घालून कोपरगाव मतदारसंघासाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथे आ.आशुतोष काळे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांसह भेट घेतली व त्यांना या आशयाचे निवेदन दिले. तसेच याप्रश्नी शरद पवार यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी आ. काळे व कार्यकर्त्यांनी केली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पिकाच्या व पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवलोकन केली. शरद पवार यांनीही सर्व गोष्टी समजावून घेतल्या.
यावेळी शरद पवार यांना दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे.

गोदावरी खोरे हे अतीतुटीचे असूनही नगर, नाशिकच्या धरणांतून अनेकवेळा जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्यामुळे अहमदनगर, नाशिक व मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण झालेला आहे. हा वाद मिटवण्यासाठी व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पाणी पूर्ववत मिळण्यासाठी पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी राज्य शासनाला तातडीने निधीची उपलब्धता करण्यासाठी योग्य त्या सूचना कराव्यात, असे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राज्य शासनाने नुकतीच शेतकर्‍यांना कोणत्याही अटी, शर्तीविना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. पावसाळ्यात पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे 80 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविण्यासंदर्भात आ. आशुतोष काळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नागपूर अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पाथर्डी : दैत्यनांदूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर गोळीबारामध्ये सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे यांच्या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव पंढरीनाथ दहिफळे याला बुधवार (दि. 25) पोलीसांनी अटक केली आहे.

17 डिसेंबरला सायंकाळी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात जखमी सरपंच संजय दहिफळे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहादेव दहिफळे यांच्यासह 12 जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येतील मुख्य संशयीत आरोपी शहादेव दहिफळे हा अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होता. उपचार पुर्ण झाल्यानंतर पाथर्डी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान रुग्णालयात मुख्य संशयीत अरोपी शहादेव दहिफळे उपचार घेत असतांना त्यांनी दिलेल्या जबाबावरून मयत संजय दहिफळे यांच्या सह 11 जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली आहे. याप्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परा विरोधा गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यात शहादेव दहिफळे, विष्णू दहिफळे, ज्ञानेश्वर दहिफळे, राहुल दहिफळे व व्दारका नागरगोजे या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येचा तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी करत आहेत.

कोपरगाव तालुक्यात पावसाची हजेरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) – काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असून तालुक्यातील काही भागात काल बुधवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यासह जिल्ह्यात देखील वेधशाळेने पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरणासह आकाश भरून आले होते. सकाळी सूर्यनारायणाने नुसते दर्शन दिले. त्यानंतर दिवसभर आकाशात ढगांची दाटी झाली होती.

दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरासह तालुक्यातील कोळपेवाडी, चास, मंजूर, धामोरी, बक्तरपूर, सुरेगाव, हंडेवाडी, सोनेवाडी, पोहेगाव, देर्डे कोर्‍हाळे, चांदेकसारे, कोकमठाण, चांदवड, जेऊर कुंभारी, डाऊच खुर्द आदी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची मोठी धावपळ झाली.

मकाचे रचून ठेवलेले ढीग पावसाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कापडाने झाकण्यात आले. अगोदरच उशिरा सुरू झालेला मान्सून त्यात परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे, भुईमूग, बाजरी, सोयाबीन यासह खरिपाच्या इतर पिकांची नासाडी केलेली असताना आता या अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.

यंदा परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरिपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाताशी आलेल्या मका, बाजरी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते. शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती.

त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत माजले. शेतकर्‍यांनी शेतातील मका व बाजरी पिकाची कणसे व इतर धान्य आवरून गवताची साफसफाई करून ऊस, गहू, हरभरा, उन्हाळी मका, कांदा, भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यामुळे रब्बीची पेरणी बर्‍यापैकी झाली. ही पिके तग धरून आहेत. या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित होत असताना ढगाळ वातावरणामुळे पिके माना टाकत आहेत.

त्यामुळे संपूर्ण वाढ होईपर्यंत हे पीक हाती लागते की नाही याची चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. यावर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकर्‍यांच्या आशा रब्बीवर असल्या तरी ढगाळ वातावरणामुळे रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न आहे.दरवर्षी नोव्हेबर महिन्यात थंडीस सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते.

ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिकांना पोषक असते. परंतु, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटला तरी अजूनही पाहिजे तशी थंडीची चाहूल दिसत नाही.

भंडारदरा धरण परिसरात पाऊस

भंडारदरा (वार्ताहर) – गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना काल (बुधवार) पहाटे व सायंकाळी 6.15 वाजता रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. कडाक्याची थंडी सुरू असताना गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवेत उकाडा निर्माण झालेला असताना काल पहाटे 3.30 वाजता अचानक पाऊस सुरू झाला. पाच मिनिटांत पावसाने उघडीप दिली. मात्र सायंकाळी 6.15 वाजता पुन्हा रिमझिम पाऊस सुरु झाला. 15 मिनीटे सुरु असलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे आदिवासी जीवन पुन्हा गारठले आहे.