Sunday, April 12, 2026
Home Blog Page 13274

रांजणी येथे घर बांधकाम मजुराचा खंडणीसाठी कुर्‍हाडीने खून

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजणी येथे नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करणार्‍या नगर तालुक्यातील खोसपुरी येथील साहिल पठाण या मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कुर्‍हाडीने डोक्यात गंभीर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता. नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतलेला होता.  या कामावर 10 दिवसापासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण (रा खोसपुरी ता. नगर) हे मजुरीने बांधकाम करत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली.

असता दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान वाळू चाळत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात असे सांगितले त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले असता त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेहले व आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कुर्‍हाडीने वार करून गंभीर दुखापत केली त्यामुळे साहिल यास तात्काळ पाथर्डी व नंतर नगर येथे खाजगी दवाखान्यात हलवले परंतु गंभीर दुखापत असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत.

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वडनेर भैरव | वार्ताहर

शेतीच्या वादातून चांदवड तालुक्यातील वडनेर वडनेर भैरव  येथे वयोवृद्ध माजी सरपंचाच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वडनेर भैरव येथील खडकजांब रोडवर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी गट क्रमांक  ८७४ या वडिलोपार्जित जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू असलेल्या शेतात बंडू विश्वनाथ पाचोकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर जमीन वहीती करत असताना त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या माजी उपसरपंच फकीरराव नारायण पाचोरकर (वय ८०) यांच्या अंगावर ट्रक्टर घालून ठार केल्याचा मारल्याचा आरोप मयताची पत्नी रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी फिर्यादीत केला.

नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान काल (दि. ०३) रोजी मृत्यू झाला. दरम्यान, नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता.

३०४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४९ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (दि. ४) रोजी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. पोलीस स्टेशनला असंख्य नातेवाईकांनी गर्दी केल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आल्याने छावणीचे स्वरूप आले होते.

रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडनेर भैरव खडकजांब रस्त्यालगत  गट नंबर ८७४ या वडिलोपार्जीत जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू आहे.

नियमित बातम्या थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी आमचे ‘टेलिग्राम चॅनल’ (Telegram) जॉईन करा

दावा प्रलंबित असून निकाल लागलेला नसतानाही जमिनीवर शेतीची मशागत करण्यासाठी शनिवारी (दि.२३) दुपारी १२:३० वाजता आले होते.

म्हणून मी व माझे  पती त्यांना समजण्यास गेलो असताना अजून आपल्या दाव्याचा निकाल लागलेला नाही म्हणून आपण शेतीची मशागत करू नका अशी चर्चा करत असताना ट्रक्टर चालक रोशन बंडू पाचोरकर याने फकीरराव पाचोरकर यांच्या कमरेवर व पायावर ट्रक्टर चालविल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बंडू विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, हरी बंडू पाचोरकर,प्रतिक सुरेश पाचोरकर,गोकुळ सुरेश पाचोरकर,अलका बंडू पाचोरकर, आशा सुरेश पाचोरकर यांनी शिवीगाळ करून ओढताड केली.

याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकही संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी रेड्डी मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहे.

पोलिसाची उपअधीक्षकांकडून धुलाई; अदखलपात्र गुन्हाची नोंद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी नेमणुकीस असलेल्या एका पोलीस शिपायाला नगर ग्रामीणच्या पोलीस उपअधिक्षकांनी व त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या गेट शेजारी मंगळवारी (दि. 03) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक याविषयी कोणती भूमिका घेतात याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलीस शिपाई सागर भास्कर तावरे हे मंगळवारी रात्री वरिष्ठांच्या परवानगीने मुख्यालयातील स्वत:च्या निवासस्थानी गेले. तावरे यांनी घरी जेवण केल्यानंतर मुख्यालयातील गेटजवळ असलेल्या एका टायर दुकानासमोर सहकार्‍यांसह गप्पा मारीत थांबले होते. साडेदहाच्या सुमारास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे सहकार्‍यांसह शासकीय वाहनाने पोलीस मुख्यालयाकडे जात होते. तावरे उभा असलेल्या ठिकाणी उपाअधीक्षक पाटील हे सहकार्‍यांसह उतरले व त्यांनी तावरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलीस कर्मचारी असल्याचे कळाले तरी पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले, तुला मारहाण केली तर बाकी लोक पळून जातील. पाटील यांनी मारहाण केल्याने तावरे हे दुचाकीवरून खाली पडले. ते जखमी झालेत. पाटील यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍याने तावरे यांचे हात पकडून मारहाण करण्यासाठी मदत केली. तावरे यांच्या सोबत असलेल्या सय्यद नावाच्या मित्राने यांना सांगितले की, तावरे हे पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी आहे. त्यावर पाटील म्हणाले, तो कुठे असला तरी माझे कोणीच काही करू शकत नाही. पाटील यांनी तावरे यांना शिवीगाळ केले असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत नेहमीच कठोर निर्णय घेत असतात. आतापर्यंत गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. तावरे यांना झालेली मारहाण धक्कादायक आहे. वरिष्ठांच्या आदेशानेच तावरे यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याचे समजते. याबाबत आता पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते- जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते, याठिकाणी मी येत नसून बाबा मला बोलावून घेतात अशी प्रतिक्रिया जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान बॉलीवुडचे सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी बुधवारी सकाळी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी शिर्डीला येत नाही मात्र साईबाबा मला येथे बोलावतात. आम्ही कितीतरी दिवसांपासून दर्शनासाठी येण्याचा विचार केला होता पण जोपर्यंत साईंचा बुलावा येत नाही तोपर्यंत शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनशांती होते तसेच आत्मा तृप्त होतो. जणूकाही परमेश्वराला स्पर्श केल्यासारखे वाटते. माझ्या परीवारासह सर्वासाठी साईबाबांना प्रार्थना केली आहे. 22 वर्षापूर्वी स्टुडिओच्या बाहेर पाय ठेवला असून पुन्हा स्टुडिओत जाणार नाही हा संकल्प केला होता. सध्या माझी मुलगी आणी मुलगा यांच्या पाठीमागे उभा असल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.

 कौतुकास्पद! आता मुलीही होणार सैन्यात अधिकारी; संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । सैनिकी शाळांमध्ये आतापर्यंत फक्त मुलांनाच प्रवेश दिला जात होता. मात्र या शाळांमध्ये आता 2020-2021 या वर्षापासून मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयासंबंधी ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना शालेयदशेतच सैन्य शिस्तीचे धडे देत त्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), नेव्हल अकादमी (एनए) अथवा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) या अधिकारी तयार करणार्‍या अकादमींच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने सन 1961 मध्ये या सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. इयत्ता बारावीनंतर दिल्या जाणार्‍या एनडीए, एनए किंवा एएफएमसीसाठीच्या प्रवेश परीक्षा या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असतात.

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत यासाठी सैनिकी शाळा सोसायटीची स्थापना झाली. प्रत्येक राज्यात एक अशी शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार जून 1961 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सातार्‍यात ही शाळा सुरू झाली. काही राज्यांत अशा दोन शाळा आहेत. राज्यातील सातारा आणि चंद्रपूर येथे या शाळा आहेत. लष्कराच्या तिन्ही दलांमधील उच्चाधिकारी आणि अनेक प्रमुख हे सैनिकी शाळेचेच असल्याचे आजवर दिसून आले आहे. सैनिकी शाळेत दरवर्षी सहावी व नववीमध्ये प्रवेश घेता येतो. प्रवेश परीक्षा तसेच वैद्यकीय तपासणीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होते. यामध्ये आता मुलींनाही प्रवेश दिला जाईल.

2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून मुलींना सहाव्या वर्गात प्रवेश घेता येईल. यासाठी 6 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. http://www.sainikschool.in या संकेतस्थळावर हा अर्ज करता येईल. परीक्षा 5 जानेवारी 2020 रोजी आहे. संरक्षण मंत्रालयाने सुरुवातीला पाच शाळांची निवड केली आहे. त्यामध्ये चंद्रपूरसह बिजापूर (कर्नाटक), कोडागू (कर्नाटक), कालिकिरी (आंध्र प्रदेश) व घोराखल (उत्तराखंड) यांचा समावेश आहे.

निकष :  वयाची अट : 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2010 दरम्यान जन्म झालेल्या मुली, लेखी परीक्षा : पर्यायी प्रकारची परीक्षा. गणित (50 गुण), सामान्यज्ञान (25 गुण), भाषा (25 गुण) व बौद्धिक क्षमता (25 गुण), अर्जाची अखेरची तारीख : 6 डिसेंबर 2019.

भुसावळ : हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणारा पोलीसांच्या ताब्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भुसावळ (प्रतिनिधी) –

भुसावळ शहरात बस स्टॅण्ड परिसरातील रोडवर सार्व. जागी आज दि.४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक इसम हा हातात धारधार तलवार घेवुन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस

अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, उप.वि.पो.अधिकारी गजानन राठोड, भुसावळ पो.नि.दिलीप भागवत भु.बा.पेठ पो.स्टे यांच्या मार्गदर्शना खाली भु.बा.पेठ पो.स्टेचे  पो.ना.रविंद्र बि-हाडे, पो.कॉ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आश्यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले.

सर आरोपीचे नाव अजय ( ऊर्फ ) सोनु मोहन अवसरमल (वय-22) रा.राममंदिर चिंचाल, लालबाग, बुऱ्हाणपुर (मध्यप्रदेश) ह.मु.भारत नगर भुसावळ असे त्याने सांगितले. तसेच त्याजवळील एक लोखंडी तलवार जप्त केली. यापुर्वीही त्याचेवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

पेठरोडवर साडेचार लाखांचा गुटखा पकडला; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत असलेल्या वाहनावर शहरातील पेठरोडवरील दत्तनगर येथे आज दुपारी छापा टाकून साडेचार लाखाच्या गुटख्यासह 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल शहर पोलीसांनी जप्त केला आहे.  जैद सलाउद्दीन शेख(33, रा. निळकंठ अर्पा. पाथर्डीफाटा) व समीर नसरूद्दीन खान (22, रा. झिनीत नगर, वडाळा गाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक सचीन खैरनार व त्यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस नाईक शांताराम महाले यांना खबर्‍याने पठेराडेवर अवैध गुटखा विक्रीच्या तयारीत पिकअप वाहन असल्याची माहिती दिली.

याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ, सहायक निरिक्षक सचीन खैरनार, महेश कुलकर्णी, कर्मचारी पोपट कारवाळ, वसंत पांडव, प्रविण कोकाटे, येवाजी महाले, अनिल दिघोळे, असिफ तांबोळी, दिलीप मोंढे, विशाल काठे, मनोज डोंगरे यांच्या तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दत्तनगर येथे पाटाच्या बाजुला सापळा रचला होता.

निर्धारेत वेळत संशयित पिकअप वाहन येताच पथकाने छापा मारून तपासणी केली असता त्यामध्ये 3 लाख 60 हजार रूपयांचा आरबी रंगबाज पान मसाल्याच्या 3 हजार पाकिट (15 गोणी) तर बारबी झेड च्युंविंग टोबॅको तीन हजार पाकिट (15 गोण्या) असा मुद्देमाल आढळून आला.

तसेच 6 लाखाचे पिकअप वाहनही पोलीसांनी जप्त केले. असा एकुण 10 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

केडगावचे सराईत चोरटे गजाआड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

एलसीबीची कारवाई । सावेडीतून चोरलेली कारही जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीच्या बोरुडे मळ्यातून कार चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेले दोघे सराईत चोर निघाले. केडगावच्या दोघा चोरांना अटक करण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी या चोरट्यांकडून चोरी केलेली कारही जप्त केली आहे.

गणेश शिवाजी लोखंडे (रा. लोंढे मळा, केडगाव) आणि संकेत सुनील खापरे (रा. विनायकनगर) अशी अटक केेलेल्या दोघांची नावे आहेत. 25 नोव्हेंबरला बोरुडे मळ्यातून या दोघांनी स्वीफ्ट कार चोरी केली होती. चोरी केलेली कार घेऊन हे दोघे सुपा एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पोलीस पथकाने सुपा एमआयडीसी परिसरात सापळा लावला. कार दिसताच पोलिस पथकाने घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी ही कार बोरुडे मळ्यातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कार जप्त केली.

औरंगाबाद येथील विजय प्रभाकर लटंगे यांची स्वीफ्ट कार (एम.एच.20,एजी-6758) या दोघांनी चोरी केली होती. त्यासदंर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरातच करायचे चोर्‍या
गणेश लोखंडे विरोधात सहा तर संकेत खापरे विरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. हे दोघे शहरातच चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले. कोतवाली आणि तोफखाना या दोनच पोलीस ठाण्यात दोघांविरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. चोरीच्या आणखी काही गुन्ह्याची उकल या दोघांकडून होईल असे पोलिसांनी सांगितले.

नगर अर्बनच्या ठेवी व्याजदारात वाढ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर अर्बन बँकेने ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 डिसेंबरपासून लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासकांनी दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवींवरील व्याजदर ठरविणेबाबत बँकांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यानुसार नगर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवस्थापक समितीने 1 ते 2 वर्षासाठी ठेवीवरील व्याजदरात .25 टक्केने वाढ केली. 1 ते दोन वर्षावरील ठेवींना पूर्वी 8 टक्के दराने व्याजदर दिला जायचा तो आता 8.25 टक्के करण्यात आला आहे.

सुधारित व्याजदराची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून पासून नव्याने येणार्‍या व नूतनीकरण होणार्‍या ठेवींसाठी करण्यास सुरूवात झाली आहे. शतकोत्तर गौरवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी उदंड प्रतिसाद देत बँकेवरील विश्वास वृद्धिंगत केलेला आहे. बँकेच्या दैनंदिन ठेवींमध्ये भरघोस वाढ होत आहे. आपल्या बँकेचे ठेवींवरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेने आकर्षक व अधिक फायद्याचे असून सर्व सन्माननीय ठेवीदार व सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक समितीने केले आहे .

सुधारीत व्याजदर
15 ते 90 दिवसांसाठी व्याजदर 4.25%
91 ते 180 दिवसांसाठी व्याजदर 5.00%
181 ते 364 दिवसांसाठी व्याजदर 8.00%
1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत व्याजदर 8.25%
2 वर्ष ते 10 वर्षापर्यंत व्याजदर 7.75%
टॅक्स सेव्हिंग स्कीम – मुदत 5 वर्ष
(सर्वांसाठी एकच दर) व्याजदर 7.75%
जेष्ठ नागरिक, जेष्ठ नागरिक संघटना,
दिव्यांग व माजी सैनिकांना व्याजदर 0.50% अधिक
15 लाख व त्यापुढील रकमेस 0.25% अधिक

नगर: भिंगारचे पाणी दिल्लीत !

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

खासदार डॉ. सुजय विखेंनी उठविला संसदेत आवाज

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराला मुबलक पाणी अन् शहराचाच भाग असलेल्या भिंगारमध्ये मात्र पाण्यासाठी वणवण. पाणी पुरविण्याची जबाबदारी असलेल्या कॅन्टोंमेंट बोर्डही उडवाउडवीची उत्तरे देतात. खासदार डॉ. सुजय विखे यांना रविवारच्या बैठकीत ही बाब प्रकर्षाने जाणवली. आज त्यांनी भिंगारचा पाणी प्रश्‍न थेट दिल्लीतील संसदेत उपस्थित करत केंद्र सरकारने कॅन्टोंमेंट बोर्डाला आदेश करावेत अशी मागणी केली.

भिंगार हा नगर शहराचाच भाग. भिंगारकरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही कॅन्टोंन्मेंट बोर्डाची. गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमीत पाणी पुरवठा केला जातो. कॅन्टोंन्मेंटचे अधिकारी आणि प्रशासनाकडे तक्रार केली तर ते समाधानकारक उत्तर देत नाहीत, असा तक्रारीचा पाढा त्रस्त भिंगारकरांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासमोर रविवारी मांडला.

भिंगारकरांच्या या तक्रारीमुळे खा. डॉ. विखे अस्वस्थ झाले. पाणी टंचाईने त्रस्त् नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व प्रशासनास योग्य त्या सूचना द्यावी अशी खासदार डॉ. विखे यांनी लोकसभेत शुन्य प्रहारात केली.

भिंगार येथील रहिवाशी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या अधिपत्याखाली येतात. तेथे कॅन्टोंन्मेंट बोर्ड व एमआयडीसी यांच्यात झालेल्या कराराद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र कॅन्टोंन्मेंट बोर्ड पाणी गळती, जुनी पापईपलाईन या कारणांकडे बोट दाखवुन रहिवाशांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. मुळात पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगली आहे. त्यामुळे एकीकडे नगर शहराला महापालिकेकडून मुळा धरणातून नियमित पाणी पुरवठा तर दुसरीकडे शहराचाच भाग असणार्‍या भिंगारमध्ये पाणी-बाणी अशी अभुतपुर्व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थानिक रहिवाशांना कॅन्टोंन्मेंट प्रश्शसनाकडून कुठलीच माहिती व्यवस्थित दिली जात नसल्याची तक्रार दिवसोंदिवस वाढत आहे. नागरीकांचा रोष लक्षात घेता कॅन्टोंन्मेंट हे संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याबाबत हस्तक्षेप करावा अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी केली. रविवारीच खा. डॉ. सुजय विखे यांनी भिंगारच्या नागरीकांची बैठक घेऊन त्यांचा प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विखे यांनी थेट संसदेत आवाज उठविला.

कॅन्टोंमेंटकडून तुसडेपणा
सर्वात मोठा सुरक्षा व सैनिकी दलाचा एरिया अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भिंगार गाव आणि परिसरात आहे. अनेक वर्षांपासून तिथे असलेल्या संरक्षण विभागाद्वारे रहिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतू मागील काही महिन्यांपासून ओढवलेल्या पाणी प्रश्नामुळे संरक्षण विभागातील अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी जाणार्‍या रहिवाशांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, केंद्र सरकारने मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती खा. विखे पाटील यांनी केली.

पाणी गळती, जुनी पापईपलाईनच्या नावाखाली कॅन्टोंमेंट बोर्ड भिंगारकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. पाण्याची एकूण मागणी, त्याची विभागणी व पाणी रेशनिंग बाबत प्रशासनाने संधिग्ता बाळगल्याने भिंगारमध्ये पाणी प्रश्‍न निर्माण झाला आहे.
– खा. डॉ. सुजय विखे