Thursday, May 14, 2026
Home Blog Page 13306

सैन्यदलाच्या परीक्षेत भोसलाचे 9 विद्यार्थी चमकले; एनडीए, सीडीएस परीक्षांचा निकाल जाहीर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील भोसला करियर अकादमी, भोसला मिलिटरी स्कूल व भोसला मिलिटरी कॉलेजचे 9 विद्यार्थी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दलाच्या एनडीए, सीडीएस आणि एएफसीएटी परीक्षांमध्ये चमकले आहे. हे 09 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून नुकताच या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.) परीक्षेत भोंसला मिलिटरी स्कूलमधून कार्तिक लथ, अथर्व बनसोडे, निमिष गरडे आणि लक्ष अग्रवाल व भोसला करिअर अकादमीमधून शुभम तावरे व हर्ष मिश्रा हे उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांना व सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीला दिले आहे. संस्थेने नेहमीच त्यांना आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी सशस्त्र सैन्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

शुभम तावरे हा सध्या भोंसला मिलिटरी कॉलेज येथून तर हर्ष मिश्रा हा पुणे विद्यापीठातून बी.एस्सी. चे शिक्षण घेत आहे. भोसला करिअर अकादमीच्या तीन पदवीधर विद्यार्थ्यांनीही या नोव्हेंबर महिन्यात एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) आणि कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (सीडीएसई) उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी शुभम कुमारसिंग यांनी पहिल्या प्रयत्नात एअरफोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) परीक्षा क्लिअर केली. भारतीय वायुसेनेतील अधिकारी म्हणून निवड होण्यासाठी ही चाचणी आहे.

रणजित कोकाटे आणि प्रवीण शेवाळे भोसला करिअर अकादमीचे विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये आर्मीसाठी सीडीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे, भोसला मिलिटरी स्कूलचे चेअरमन अनिरुद्ध तेलंग, भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, भोसला करिअर अकादमीचे विंग कमांडर अनिल सिंघा यांनी अभिनंदन केले आहे.

‘एमपीएससी’चा कारभार सहापैकी दोन सदस्यांच्या हाती; उर्वरित सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्थात एमपीएससी कारभार सहापैकी केवळ दोन सदस्यांवर सुरू असल्याने, ‘एमपीएससी’कडून होणार्‍या पदभरतीच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकारने तातडीने उर्वरित सदस्यांची नियुक्ती करून, प्रशासनाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पावल उचलावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार एकूण सहा सदस्य पाहतात. त्यापैकी प्रशासनात सध्या एक अध्यक्ष आणि सदस्य कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत एक अध्यक्ष व एक सदस्य असे दोन जण मिळून ‘एमपीएससी’चा कारभार पाहत असल्याने, प्रशासनाचा कारभार धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून, निवड प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’तील रिक्त पदांच्या ठिकाणी तत्काळ सदस्यांची नेमणूक करावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडंटस राइटस् संघटने’तर्फे करण्यात आली आहे.‘एमपीएससी’तर्फे 2017 सालामध्ये खात्यांतर्गत झालेली पोलिस उपनिरीक्षक परीक्षा; तसेच 2018 सालच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. तर, 2019 पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील मैदानी चाचणी व मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत.

या सोबतच 2019 अभियांत्रिकी सेवा, 2019 वनसेवा आणि 2019 राज्यसेवा परीक्षांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या परीक्षांद्वारे पदभरतीची प्रक्रिया संथ सुरू असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे तात्काळ रिक्त सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक महिने एमपीएससीचा कारभार हा प्रभारी अध्यक्षांच्या हाती होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर पूर्ण वेळ अध्यक्षांची नेमणूक झाली.

‘किऑस्क’ची बेशिस्त वाहनधारकांवर नजर; राजीव गांधी भवन येथे यंत्रणा कार्यान्वित

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

महिलांच्या सुरक्षेसह बेशिस्त वाहनधारक आणि परिसरातील घटनांवर नजर ठेवणारी किऑक्स यंत्रणा शनिवार (दि.9) पासून राजीव गांधी भवन समोर कार्यन्वित करण्यात आली. खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते या यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. या यंत्रणेमुळे पोलीसांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. शहरातील ही दुसरी किऑस्क यंत्रणा आहे.

राजीव गांधी भवनजवळ शनिवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल, सभागृहनेते सतिश सोनवणे, भाजप चे सभागृह गटनेते जगदीश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, कोडवेल किऑक्स कंपनीचे संस्थापक आनंद सुंदरराज आदी उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना किऑक्स यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ही यंत्रणा शहरातील 13पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कार्यान्वित केली जाणार आहे.

9 सप्टेंबर 2019 पासून उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नल येथे ही यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या ठिकाणच्या घटनांच्या दोषसिध्दतेसाठी या यंत्रणेतील हायटेक पुरावे कामी येणार आहेत. या यंत्रणेची वयोमर्यादा पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली आहे. या मशिनच्या माध्यमातून पोलीस,रूग्णवाहिका तसेच अग्निशमन विभागाची तात्काळ मदत मिळविता येणार आहे. मशीनमध्ये पॅनिक बटण आणि कॅमेरा आहे. हे मशीन परिसरातील सर्व घटनांवर नजर ठेवणार आहे. मुलींसह महिलांनी मदतीसाठी मशीनचे पॅनिक बटन दाबताच त्याची सूचना पोलिसांसह संबंधित यंत्रणेला मिळणार आहे. तसेच कॅमेर्‍यामुळे सिग्नलवरील सर्व चित्रिकरण होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करणे शक्य होणार आहे.

शिक्षणातून उद्याचे भवितव्य घडेल-लेफ्ट जन. शेकटकर; डॉ. मुंजे व्याख्यानमालेचा समारोप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

वर्तमान चांगला झाल्याशिवाय भविष्य घडणार नाही. शिक्षणातून उद्याचे भवितव्य घडणार आहे. त्यासाठी मेक इन इंडियासारखा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे, नाशिकसारखी महाराष्ट्रातील शहरे बौद्धिक संपदा असलेली आहेत. त्यासाठीच भोसलासारखी संस्था नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘मेक इन इंडिया’ सरंक्षण उत्पादन साहित्य केंद्र म्हणून नाशिकची संभाव्यता या विषयावर ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, प्रमुख पाहुणे प्रदीप पेशकार उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी तीन दिवसीय व्याख्यानमालेचे शेवटचे म्हणजे तिसरे पुष्प गुंफले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला सैन्याची गरज नाही अशा मानसिकतेची मांडणी सुरुवातीच्या काळात झाली होती. त्याचवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद हिंद सेना उभी करून संघर्ष उभा केला. त्यामुळे केवळ सत्याग्रहाचे योगदान नसून क्रांतिकारकांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे.

विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण भारतीय सीमेलगत प्रतिकूल आहे. त्यामुळे भारतात सरंक्षण निर्माण झालेले तंत्रज्ञान जगाच्या कुठल्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. भारतातील 130 कोटी लोकसंख्या अनेक क्षेत्रात प्राविण्य मिळवते आहे. असे त्यांनी सांगितले. आपल्या जवळ असलेल्या संसाधनांचा उपयोग मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांसाठी करण्याची आवश्यकता आहे असे म्हणतांना त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अमेरिकन विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर दिलेला भाषणाचा संदर्भ दिला. भारताकडे असलेली बौद्धिक संपदा हे आपले सामर्थ्य आहे. त्याचा उपयोग मेक इन इंडियासाठी होऊ शकतो. जगभरातील परिस्थितीचा विचार करता येणार्‍या काळात मेक इन इंडिया भारताला प्रगतीपथावर नेणारी ठरेल त्या दृष्टीने आपण सज्ज व्हायला हवे, सेही त्यांनी म्हटले.

पाहुण्यांचा परिचय स्नेहा कुलकर्णी यांनी केला. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत अंजली सहस्त्रबुद्धे यांनी स्वागत गीतातून केले.कार्यक्रमाचे आभार मुग्धा जोशी यांनी मानले. तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने रुपाली कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आणि संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

‘नाशिक’मेक इन इंडियासाठी योग्य

संरक्षण उत्पादनक्षेत्र मेक इन इंडीयासाठी नाशिकची भौगोलिक स्थिती योग्य आहे. नाशिक, अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद ही शहरे यासाठी पूरक असून नजीकच्या काळात हवाई वाहतूक चांगली झाली आहे. समुद्रमार्ग हा सुद्धा नाशिक शहरापासून अवघ्या दोनशे किमीवर आहे. येणार्‍या काळातील मोठ्या शहरांची वाढ दोनशे किमी परिघात होईल. त्या दृष्टीने नाशिक संरक्षण उत्पादनक्षेत्र यासाठी पूरक आहे.

मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पित्याचे निधन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील धनाजी संपत धेंडे (वय 46) यांनी नापिकी आणि सोसायटी कर्ज, खाजगी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याचा धक्का बसल्याने या शेतकर्‍यांचे वडील संपत नामदेव धेंडे (वय 62) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
शेडगाव येथील धनाजी धेंडे हे शेतात पारंपरिक पिके घेत होते. मात्र, नसर्गाच्या लहरीपणामुळे व शेतातून खर्चापेक्षा उत्पन्न कमी येत असल्याने यापूर्वी घेतलेले सोसायटी, बँक व खाजगी सावकारांच्या कर्ज असल्याने त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोटच्या मुलाने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे वृध्द वडील संपत नामदेव धेंडे यांचा अकस्मात मृत्यू झाला. धनाजी यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. मात्र, त्यांनी जीवनयात्रा संपवल्याने शोककळा पसरली. यात मुलगा आणि वडील या दोघांचा मृत्यू या कुटुंबासाठी धक्कादायक असल्याने गावावर शोककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला बाजारभाव मिळत नसल्याने व अवकाळी पावसाने खरीप आणि रब्बी पिकांचे झालेले नुकसान. त्यातच बँक, सेवासंस्था वसुलीचा धाक यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असल्याने असे प्रसंग घडत असल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये सुरू आहे.

राष्ट्रवादीची पावले सत्तेच्या दिशेने!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जिल्हा परिषद : सदस्यांशी संवाद मोहिम

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत राज्यातील सत्तेप्रमाणे महाविकास आघाडीची सत्ता आणण्याच्या दिशेने राष्ट्रवादीने पावले टाकली आहेत. पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची शनिवारी नगरमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठक घेतली. अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांना पक्षाकडे अर्ज करण्यास देखील यावेळी सुचविण्यात आले.
शनिवारी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे निरिक्षक तथा आ.दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार होते. मात्र आ.वळसे पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बैठकीचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हा परिषदेतील सत्तासुत्र, याच सोबत मित्र पक्षाचे संंख्याबळ, पक्षातून गेलेले जुन्या सदस्यांचे काय करायचे, याबाबत प्राथमिक चर्चा झाली.
विद्यमान परिस्थितीत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी सर्वाधिक सदस्य असणारा पक्ष ठरणार आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी पक्षाकडे तशी लेखी स्वरूपात इच्छा व्यक्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी नव्याने गट नोेंदणी करावी की अन्य पर्यायांचा वापर करावा, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोण-कोण?
या बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्रीताई घुले, सभापती उमेश परहर, सदस्य माधवराव लामखडे, रमेश देशमुख, सुधाकर दंडवते, विमलताई आगवन, सोनाली साबळे, संगिता दुसिंग, सोनाली रोहमारे, रामभाऊ साबळे आदी उपस्थित होते. तर तेजश्री लंघे, कोमल वाखारे, सुप्रिया झावरे, सभापती कैलास वाकचौरे, धनराज गाडे, नंदा गाडे, गुलाबराव तनपुरे, सुवर्णाताई जगताप आदी सदस्य गैरहजर होते.

युवक व महिला राष्ट्रवादी नाराज
बैठकीसाठी युवक राष्ट्रवादी आणि महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. पक्षाच्या अन्य कार्यक्रमांत युवक आणि महिला पदाधिकार्‍यांवर जबाबदारी देण्यात येते. मात्र, सत्ता स्थापनेच्या संदर्भात असणार्‍या महत्वाच्या बैठकांना या दोन्ही आघाडीच्या पदाधिकार्‍यांना टाळण्यात येत असल्याने या पदाधिकार्‍यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

अधिवेशनानंतर…
सोमवारपासून राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेनेचे नेते निवांत होणार आहे. यामुळे त्यानंतर खर्‍याअर्थाने जिल्हा परिषदेच्या मोर्चेबांधणीला सुरूवात होणार आहे. गत आवठड्यात या तिनही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी प्राथमिक बैठक झाली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने अद्याप अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तो देखील पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोळपेवाडी परीसरातील घटना : पाथर्डी तालुक्यातील आरोपी फरार

कोळपेवाडी (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी सुरेगाव येथील विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर बसवून एका फार्म हाऊसवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी अमोल अशोक निमसे यांच्याविरूध्द विरूध्द अत्याचार व अ‍ॅक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.
डॉ. प्रियंका रेड्डी घटनेच्या जखमा ताज्या असतानांच ही घटना घडल्यामुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी 4.40 वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या घरी गेले. बहुतांशी विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेण्यासाठी येत असतात. अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला वडील नियमितपणे शाळेतून घेण्यासाठी येत असत. मात्र शुक्रवारी ते बाहेरगावी गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या विद्यार्थिनीस शाळेतून आणण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांना शाळेत येण्यास थोडा उशीर झाला. सायंकाळी 5.15 मिनिटांनी ते शाळेत आले. त्यावेळी त्यांना सदर मुलगी विद्यालयात नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मुलीच्या वर्गशिक्षकांशी संपर्क केला असता शाळा सुटून अर्धा तास झाला असून तुमची मुलगी शाळा सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी असेल असे सांगितले. परंतु मुलगी त्या ठिकाणी नव्हती. नातेवाईकाने मुलीच्या घरी चौकशी केली. मात्र ती घरी आली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले. त्यांनी शोध घेतला. मात्र ती मिळून न आल्याने मुलीचे अपहरण झाले असल्याची शंका आल्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.
वर्गशिक्षकांनी वर्गातील मुलींकडून या मुलीबाबत माहिती घेतली असता ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीच्या गाडीवर बसून गेल्याची माहिती समजली. सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी शाळेचे विद्यार्थी व सदरची विद्यार्थिनी ज्या रस्त्याने घरी जाते त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलेे. यामध्ये कोळपेवाडी-सुरेगाव रस्त्यावरील हॉटेल आनंदचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मुलगी निळा शर्ट घातलेल्या आरोपीने त्याच्या मोटारसायकलवर पुढे बसवून घेवून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉ. बाळासाहेब जुंधारे व जगदाळे कलेक्शनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची गाडी मोतीनगर सुरेगावच्या दिशेने जातांना दिसून आली. त्यानंतर प्रमोद दंडवते यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी शिर्डी-लासलगाव रोडने शहाजापूरकडे जातांना दिसले. पोलिसांनी व शिक्षकांनी रात्रभर तपास करून देखील मुलगी मिळून आली नाही.
दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी मोतीनगर सुरेगाव येथे सदर मुलीच्या नातेवाईकाच्या घरी या मुलीला सोडून देण्यात आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेवून वैद्यकीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात गाठले. त्यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. शनिवारी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे मुलीच्या शोध घेण्यासाठी शहाजापूर शिवारात गेले असता त्यांना शिवाजी बोरसे यांच्या फार्म हाऊसवर हिरो होंडा कंपनीची गाडी (एम. एच. 41-3033) चावीसह मिळून आली. गाडीच्या नंबरवरून गाडी मालकाची ओळख पटल्यानंतर त्यांनी आपली गाडी अमोल अशोक निमसे याला दिली असल्याचे सांगितले. एका महिलेने फार्म हाऊसवर शाळेचे दफ्तर आणि जेवणाचा डबा असून सकाळी 6 वाजेच्या दरम्यान आरोपी व मुलीला जातांना पाहिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना अत्याचार झाले असल्याचे पुरावे आढळून आले.
मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आरोपीविरूध्द भादवि कलम 376 (2), (के)(एल)(एन)363, 366, 366, (ए), 342, 326 बालकांचे लैगिक अत्याचारापासून सरंक्षण अधिनियम 2012 चे कलम 6, अ, अनुसुचित जाती जमाती कायदा कलम 3(1)(डब्ल्यू)3, (2), (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे. सदर आरोपी पाथर्डी तालुक्यातील असून या फार्म हाऊसवर राखणदार म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणबी समाजाने सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्ने करावीत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महासंघाचे अध्यक्ष पटेल : शिर्डीत मराठा कुणबी समाजाचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – मराठा कुणबी समाजाची आर्थिक स्थिती दयनीय होण्याचे एकमेव कारण म्हणजे समाजात होणारे विवाहसोहळे. कर्ज काढून मोठ्या थाटामाटात विवाह केले जातात. अशी हुंडा प्रथा मोडीत काढून सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्ने करावीत, असे आवाहन मराठा महासंघाचे अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी शिर्डीत केले.
शिर्डी शहरात काल शनिवारी अखिल भारतीय कुणबी समाजाच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनास सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे महासंघाचे महासचिव डॉ. व्ही. एस निरंजन, ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर, जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, पैलवान शिवाजीराजे आदींसह स्थानिक पदाधिकारी व देशातील कुणबी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात देशातील विविध भाषांतील कुर्मी क्षत्रिय समाजाचे 25 राज्यांतील सुमारे चार हजाराहून जास्त प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पटेल यांचा शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर व जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले की, राज्यात या योजनांचे मूळ कारण म्हणजे 10 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अधिवेशन झाले त्यावेळी असे समजले की सरदार पटेल समुदाय हा क्षत्रिय आहे, कुणबी आहे. महाराष्ट्र राज्यात समाजाची सर्वात जास्त संख्या आहे. कुणबी समाज शेतकरी असून एवढा मोठा समाज देशात असताना मात्र शेतकरी बेहाल असल्याचे त्यांनी सांगितले. 1988 नंतर पहिल्यांदाच सर्वजण एकत्र आल्याचे त्यांनी सांगून भारतीय सैन्यात शेतकर्‍यांची मुले असतात, राज्यातील आपल्या समाजाचे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिर्डीतून सबका मालिक एकचा मंत्र आपण सर्व घेणार आहोत. सरदार पटेल होते म्हणून देश एकत्र झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे देशाला एकत्र ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाजाच्या उन्नतीसाठी शिर्डी डिक्लेरेशन करणार आहे. यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने एक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय कुणबी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पटेल म्हणाले की, एकट्या महाराष्ट्रात कुणबी समाजाची एकूण लोकसंख्या सात कोटी 20 लाख आहे. म्हणजे देशाच्या 25 टक्के एवढी लोकसंख्या महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी सांगत समाजातील सर्वांना एका छत्राखाली आणणार आहे. या महाअधिवेेशनासाठी देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू ,केरळ, आसाम, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, झारखंड, बिहार आदी राज्यांतून मोठ्या संख्येने समाजाचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहभाग महिलांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात कुर्मी क्षत्रिय मराठा समाजाची संख्या 22 टक्के असल्याचे त्यांनी यावेळी आठवण करून दिली. अखिल भारतीय कुणबी समाज चार सत्रात संघटन करत आहे. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात रोटी एकता असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजाची आर्थिक स्थिती दयनीय याचे एकमेव कारण म्हणजे समाजात होणारे विवाह सोहळ्यासाठी साठ टक्के लोक कर्ज काढून विवाह करतात, त्यामुळे कर्जात बुडत असून हुंडा प्रथा मोडीत काढावी आणि विवाह सोहळे सामुदायिक रितीने करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अधिवेशन यशस्वी होण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयकुमार ठुबे, डॉ. मंगेश देशमुख, क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एस. एल. तांबे, नितीन देशमुख, बळीराजा शेतकरी संघटनेचे विजयराव काकडे, माधवराव देशमुख, व्यंकटराव शिंदे, धनंजय जोगदंड, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले पै. रवींद्र वाघ, पै. मदन मोकाटे, संतोष भोकरे, संतोष घोलप, अशोक काजळे, मच्छिंद्र वदक, अविनाश शिंदे, संकेत गव्हाणे आदी समाजबांधव प्रयत्नशील आहेत.

जाती धर्माचा संघर्ष लोकशाहीसाठी घातक – मेधा पाटकर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (वार्ताहर) – भारतीय संविधानाची मूल्य पायदळी तुडविली जात असून जाती-धर्माच्या नावावर सुरू असलेला संघर्ष भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. भारतीय संविधान हे समग्र मानव जातीसाठीचा मानव ग्रंथ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणवादी व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

संगमनेर येथे भास्कर नाना दुर्वे जन्मशताब्दीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी नेत्या अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, प्रदीप मालपाणी, राजाभाऊ अवसक, सीताराम राऊत, साथी युवराज आदी व्यासपीठावर उपस्थित होते

मेधा पाटकर म्हणाल्या, देशात सध्या द्वेषाचा माहोल निर्माण केला जात आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी वास्तव समजून घेण्याची गरज आहे. देशात जाती धर्माच्या नावाखाली संघर्ष करून माणसे मारली जात आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे. या सरकारने ना कोणाला पंधरा लाख दिले ना कोणाला रोजगार दिला. समाजवादी कार्यकर्त्यांनी विरोधी विचारांना न घाबरता विचाराच्या धारेवर उभे राहण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन उभे राहण्याची गरज आहे. एकतेने या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले आहे. बहुमताच्या जोरावर मुस्लिम नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज आहे.

जची परिस्थिती गंभीर आहे. या सरकार विरोधाच्या लढाईत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वासाठी प्रयत्न केला. सामान्य माणसांच्या सोबत उभे राहिले, त्यांना तुरुंगात डांबले जात आहे. पण तुरुंगात गेलो तरी घाबरणार नाही. नागरिकता संशोधन कायदा हा मुस्लिमांवर उगारण्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जाणार आहे. देशातील मुस्लिम आपल्या देशात राहून दहशतीखाली दिसत आहेत.आसाममध्ये सोळाशे कोटी रुपये खर्च करून नागरिकत्वाची नोंदणी केली आहे.

पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश काही राज्यांनी त्याकाळची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. या देशातील आदिवासीकडे कसला पुरावा मागतात. आचारात भ्रष्टाचार आणि भ्रष्ट विचाराच्या माणसांनी या देशातील सामान्य लोकांना देखील नागविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय नागरिकत्व संशोधन कायदा म्हणजे एक धर्म निर्मितीचा पाया आहे. यानिमित्ताने तो घालण्यास सुरुवात केली असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

देशात सर्वात मजबूत होत आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून जनतेमध्ये अभूतपूर्व एकच मग निर्माण होईल त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागणार आहे आज शेतकर्‍यांच्या आत्महत्या लाखोंवर पोहोचत आहेत. शेतीची संस्कृती जीवंत ठेवणारे शेतकर्‍यांचे जीवन अडचणीत येता आले आहे. शेतकर्‍यांना विमा लुटला जात आहे. पण शेतकर्‍यांना विमा दिला जात नाही. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. लोकशाहीचे स्तंभ ओळखले जात आहेत.

99 लढाई काश्मीर ते कन्याकुमारी असाच निर्माण करावा लागणार आहेत. त्यामुळे या लढ्यात अधिक भक्कम करावे लागणार आहेत. जनशक्ती हीच परिवर्तनाची शक्ती आहेत. सरकार कामगार विरोधी धोरणे राबवत असून राज्यस्तरावरील 100 व केंद्र सरकारचे 44 असे कायदेतज्ज्ञ रद्द करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले

निशा शिवूरकर म्हणाल्या, देशात नागरिकत्व संशोधन कायदा संसदेने पारित केला तरी न्यायालयामध्ये तो कायदा टिकणार नाहीत. तो कायदा संविधानविरोधी आहे. राज्यघटनेतील तत्वे आणि मूल्य पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी समाजवादी कार्यकर्त्यांवर आहे. जगातील परिवर्तनशील कार्यकर्त्यांना लोकशाही समाजवाद हीच सावरेल, असे मत व्यक्त केले. यावेळी साथी युवराज, अ‍ॅड. मालपाणी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सीताराम राऊत यांनी केले.

कार्यकर्त्यांना दिली शपथ
यावेळी नागरिक संशोधन कायद्यासाठी सरकारला हवी असलेली अभिलेख उपलब्ध करून न देण्याची व त्या विरोधात लढा उभारण्यासाठी संविधानावर विश्वास असलेली व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने उपस्थितांना उत्तर प्रदेश येथील समाजवादी युवाजन सभेचे अध्यक्ष साथी रिचा सिंग यांनी शपथ दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आधार फाउंडेशनच्यावतीने कार्यकर्त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

लोहोणेर येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लोहोणेर | प्रतिनिधी

येथील रहिवाशी दीपक जयपालसिह परदेशी (वय ३५) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजु शकले नाही. गळफास घेण्याची पंधरा दिवसात लोहोणेर गावातील ही दुसरी घटना आहे. मयत दीपक परदेशी हा चारचाकी गाडीचा चालक म्हणून लोहोणेर येथे काम करीत होता.

आज दुपारी त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी त्याची पत्नी शेती कामासाठी गेली होती. त्याचे लहान मुले घरात आल्या नंतर सदर प्रकार उघडकीस आला. त्याचे पश्चात्त पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.येथील रहिवासी विलास परदेशी यांचा तो बंधू होता.

देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर सायंकाळी लोहोणेर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याचे व अंत्यसंस्कार करण्यात आले. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. एन.सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत. लोहोणेर गावात गेल्या पंधरा दिवसात ही गळफास घेऊन आत्महतेची दुसरी घटनेची घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.