Wednesday, May 6, 2026
Home Blog Page 13341

देसवंडीत मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील मुळा नदीपात्रातून होणारा वाळू उपसा त्वरीत बंद करून तहसीलदार फसियोद्दीन शेख तसेच पीआय देशमुख यांनी या वाळू तस्करांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देसवंडी येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांकडून होत आहे.

देसवंडी मुळा नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे हमखास पाणी असणार्‍या विहिरी, कुपनलिका कोरड्या पडून मागील काही वर्षात येथील हमखास बागायती असलेली शेती धोक्यात आली होती. त्यानंतर ग्रामसभेची बैठक होऊन गावातून वाळू वाहतूक होऊ न देण्याची व ज्यांना स्वतःच्या कामासाठी गावातील बांधकामासाठी वाळू लागेल, त्यांनी बैलगाडीतूनच वाळू कामापुरती आणावी, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. दि. 13 ऑगस्टला याबाबत ग्रामसभेत ठराव होऊन त्याची सूचना शंकर कल्हापुरे यांनी मांडली. त्यास सदस्य सागर कल्हापुरे यांनी अनुमोदन दिले होते. याबाबत तहसीलदार राहुरी यांनाही कळविले होते.

मात्र, सध्या गावातील काही वाळू तस्करांनी जवळपास 25 बैलगाड्यांद्वारे नदीपात्रातून वाळू उपसा बेसुमारपणे सुरू ठेवला असून ही वाळू रात्री टेम्पो, डंपरमध्ये भरून दिली जाते. यातून हे वाळूतस्कर लाखो रुपये कमविताना शासनाची मात्र, फसवणूक करीत आहेत. काही कालावधीनंतर यास आळा बसावा, म्हणून ग्रामपंचायतीकडून नदीकडे स्मशानभूमीमार्गे जाणार्‍या रस्त्याला गेट बसविले होते. मात्र, हे गेटही या वाळू तस्करांनी उखडून फेकून देऊन याबाबत अरेरावी करून जो कोणी आडवा येईल, त्याला धमकी देण्यात आली होती.

वाळूतस्करांच्या दादागिरीमुळे सर्वसामान्य ग्रामस्थ मुकाटपणे हे उजाड होणारे भविष्य पाहत आहेत. वाळू तस्करांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सागर कल्हापुरे, अरुण कल्हापुरे, अण्णासाहेब शिरसाठ, सुभाष शिरसाठ, मच्छिंद्र शिरसाठ, अरुण गागरे, आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

नोकरीच्या शिफारशीसाठी धोंडेवाडीच्या तरुणाचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिफारशीशिवाय नोकरी मिळत नाही, नोकर्‍यांसाठी भिकार्‍याप्रमाणे कंपन्यांच्या दारावर भटकंती ः अनिल दरेकर

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – लहान असतानाच वडिलांची छाया हरपल्यामुळे आईने काबाडकष्ट करून माझे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग तसेच एमटेक पर्यंतचे उच्चशिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नोकरी शोधण्याची वेळ आली, तेव्हा समजले की शिफारशी शिवाय नोकरी भेटत नाही. अशाच परिस्थितीत मुले नोकरीच्या शोधात प्लेसमेंट कन्सल्टन्सी (झश्ररलशाशपीं उेर्पीीश्रींरपलू) च्या बळी जाऊन हजारो रुपयांना लुटले जातात.

पंतप्रधान साहेब, मी एका कॉलेजचा टॉपर मुलगा असतानासुद्धा नोकरीसाठी अडचण येत आहे. माझ्यासारखे विद्यार्थी आज रोजगारासाठी-नोकरीसाठी भिकार्‍याप्रमाणे कंपन्यांच्या दरवाजांवर भटकत आहेत. तसेच एखाद्या जुगार्‍याप्रमाणे भेटला नंबर की कर कॉल, दिसला ई-मेल आय-डी कि कर अर्ज-मेल, अशी भयानक परिस्थिती आज आहे. अशा अशायाचे पत्र कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील युवक अनिल रामदास दरेकर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. त्याच्या प्रती सर्वच आमदार व खासदार यांनाही पाठविल्या आहेत.

त्यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. अतिशय लहान खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा. तुमच्या सारख्या मोठ्या व्यक्तीसोबत बोलून आपले प्रश्न मांडण्याचा योग येत नाही, त्यामुळे माझ्या भावना या पत्रातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान साहेब, सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे आज देशावरील कर्ज वाढत चालले आहे. ते कर्ज कमी करण्यासाठी आज सरकारने शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायजेशन करण्याचा धडाका जोमाने चालवलेला आहे. जर सरकारने शासकीय कंपन्या खाजगी लोकांना विकल्या तर तुम्हीच सांगा रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होणार? सरकारच्या अशा निर्णयामुळे नवीन रोजगार तयार होणार नाहीच, परंतु उपलब्ध असलेला रोजगार पण कमी होत आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक कंपन्या कामावर असलेल्या लोकांची नोकर कपात करत आहेत, अनेक कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. जीएसटीमुळे कंपनी चालवणे परवडत नसल्यामुळे उद्योजक आत्महत्या करत आहेत, अशी अत्यंत भयानक गोष्ट महाराष्ट्रात घडत आहे. म्हणजेच आज शेतकर्‍यांप्रमाणे उद्योजकांवर सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तशीच वेळ काही दिवसानंतर विद्यार्थी, नोकरदार यांच्यावर सुद्धा येऊ शकते. जर नोकरीला असलेल्या लोकांची नोकरी जात आहेत तर अशा स्थितीत नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या मुलांना कोण नोकरी देणार?

पंतप्रधान साहेब खरं सांगू का, माझ्यासारखे अनेक शेतकर्‍यांची मुले आज जेव्हा डॉक्टर- इंजिनिअर होऊन सुद्धा नोकरी मिळविण्यासाठी वणवण भटकतात, तेव्हा त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? शेतकरी आईवडील एक वेळेस स्वतःच्या पोटाला अन्न खात नाही, पण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. अशा वेळी त्या शेतकरी आई-वडिलांनी आणि त्या मुलांनी सुद्धा काय करायचं साहेब?

पंतप्रधान साहेब, मी पण अशाच एका लहान खेड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. माझ्या आईने खूप काबाडकष्ट करून मला शिकवलेले आहे. मला खरच नोकरीची खूप गरज आहे. पंतप्रधान साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर एखाद्या कोणत्या कंपनीमध्ये आपली ओळख असेल तर कृपया मला तुमची शिफारस देऊ शकता का? कारण मला सध्या नोकरीची खूप गरज आहे. तुम्हाला वचन देतो साहेब, मी खुप प्रामाणिकपणे काम करेन. कंपनीची कोणत्याही प्रकारची तक्रार तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. पंतप्रधान साहेब, कृपया मला तुमची शिफारस देऊन सहकार्य करा. मला अपेक्षा आहे, तुम्ही नक्कीच मला मदत कराल. आपल्या उत्तराची अतिशय नम्रपणे एखाद्या चातकाप्रमाणे वाट बघतोय. अशा अशायाचे पत्र दरेकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविले आहे.

शाळा डिजिटल झाल्या होे, पैशाअभावी बंद पडल्या हो…!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अकोले – प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली होती. शाळा आधुनिक करण्याबरोबर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे नवनवीन अध्ययन अनुभव देऊन गुणवत्ता साधण्यासाठी या नव तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला होता. मात्र त्यासाठी लागणारी वीज शाळांना न परवडणारी ठरू लागल्याने शाळांची अवस्था ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ अशीच झाली आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना शासकीय स्तरावरही प्रोत्साहन आणि मदत मिळाली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांना अध्ययन-अध्यापनास मदत करणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. तर अनेक शिक्षकांनी प्रयत्न करीत बाजारातील सॉफ्टवेअरही विकत घेतले आहे. त्याचप्रमाणे पुणे, संगमनेर, नगर, नारायणगाव अशा विविध ठिकाणच्या रोटरी क्लब या संस्थेच्या माध्यमातून शाळांना अल्पदरात डिजिटल साहित्य उपलब्ध करून घेऊन शाळा डिजिटल केलेल्या आहेत. या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील अनेक घटक सुलभ करून मुलांच्या शिकण्याला मदत झाली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखाद्या घटकासाठी सराव घेण्यासाठी मदत झाली आहे. अशा स्वरूपात हातभार लागत असतानाच वाढलेल्या वीज दरामुळे शाळांना या सुविधा बंद करावी लागली आहे.

महाराष्ट्र विद्युत निर्मिती वितरण कंपनीच्या वतीने शाळांना करण्यात येणार्‍या वीज बिलाची आकारणी घरगुती दराने करण्यात येत होती. मात्र गेली आठ नऊ वर्षे वीज कंपनीने शाळांना करण्यात येणारा वीजपुरवठा व्यवसायिक दराने आकारणे सुरू केली आहे. त्यामुळे वीज बिलाच्या आकारणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येत आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तथापि त्यावर अद्याप मार्ग निघू शकलेला नाही. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले होते.कंपनीसोबत बैठक घेण्याचे मान्य केले होते. त्यावर निर्णय होऊ शकलेला नव्हता.

त्यामुळे शाळा समोरचा प्रश्‍न अधिक गंभीर बनत गेला आहे. वीज कंपनीने शाळा हा व्यवसाय करणार्‍या संस्था मानल्या आहेत. त्यामुळे गावागावातील छोट्या-छोट्या शाळांना वीज जोडणी टिकवून ठेवणे हेच आता आव्हान बनले आहे. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी मदत करत स्थानिक शाळा गुणवत्तेत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तथापी शिक्षणावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न झाल्याने शाळांचे अनुदान घटले आहे. त्यामुळे शाळांना वीज बिल भरणे कठीण बनल चालले आहे.

या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्हा परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळांचे विज बिल ग्रामपंचायतीद्वारे भरण्याचे आदेश दिले आहे. तथापी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या या आदेशाची अंमलबजावणी काही ग्रामपंचायतींनी केली असली तर काहींनी मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींवर कारवाई झाल्यास जिल्ह्यातील सर्व शाळांना वीज पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.

शाळा अनुदानात घट
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळांना 5000 देखभाल दुरुस्ती, पाच हजार रुपये शाळा अनुदान व प्रति शिक्षक 500 रुपये अनुदान दिले जात होते. मात्र समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत अनुदानाचे धोरण बनविण्यात आले आहे. त्यानुसार 50 पेक्षा कमी पट असणार्‍या शाळांना वर्षभरात केवळ पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तर शंभर पर्यंत पट असलेल्या शाळांना 10 हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. त्यापुढच्या टप्प्यावर 25 हजारांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. राज्यात सुमारे 40 टक्के शाळा या की पटाच्या आहेत. त्यामुळे या शाळांना वीज बिल भरणे देखील अशक्य होणार आहे. या शाळांकडे डिजिटल साधनसुविधा आहे. मात्र दरमहा येणारे 500 ते 800 रुपये कसे भरायचे हा खरा प्रश्‍न आहे. बिलासाठी सरासरी सहा हजार ते 10 हजारांपर्यंत खर्च शाळांना येत आहे. अनुदान 5000 आणि खर्च अधिक असेल तर शाळांना वीज जोडणी नको असे म्हणण्याची वेळ आली आहे.

या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडले
भोळेवाडी, चितळवेढे, भोजदरी (विठे), माडगेवाडी, गोपाळवाडी (कोतूळ), पिंपरवाडी, तळे, लव्हाळी कोतूळ, सावरकुटे, चिल्लरवाडी (शिरपुंजे), कोदणी, सुगाव बुद्रुक, ढोक्री, देवठाण.

विद्युतजोडणी तोडण्यापूर्वी संपर्क करायला हवा
अकोले तालुक्यातील 391 शाळा असून सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत. वीजबिल भरू न शकणार्‍या शाळांचे कनेक्शन तोडण्यात आलेले आहेत. वीज कंपनीने अशा स्वरूपाची बिले थकलेल्या शाळांची माहिती पंचायत समितीला देणे आवश्यक आहे. मात्र शाळांची वीज जोडणी तोडण्यात आली असली तरी शिक्षकांनी पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे. अनेक शिक्षक स्वतःचा लॅपटॉप आणून मुलांच्या शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवत आहेत.
-अरविंद कुमावत (प्रभारी गट शिक्षणाधिकारी, अकोले)

विधानसभेतही वीज बिलावर चर्चा
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या विजबिलात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अनेक शाळांची वीज तोडली गेली होती. या संदर्भाने समर्थन या मुंबईच्या संस्थेच्या वतीने विविध आमदारांद्वारे राज्यातील शाळांचा प्रश्‍न विधानसभेत मांडण्यात आला होता. यासंदर्भात सचिवालयाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यातील शाळांची माहिती मागविली होती. या प्रश्‍नावर राज्य विधिमंडळात सदरचा प्रश्‍न उपस्थित करण्यात आलेला होता. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघू शकलेला नाही.

Govt to inspect onion storages, act against hoarders

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK: In order to provide relief to common man from soaring onion prices, the district administration has asked retailers and wholesale traders to keep daily account of buy and sell transactions of their onion produce.
It has also ordered tehsildars to crack down on onion hoarding and ensure stock holding limits with a view to keep a check on increasing prices.

District collector (in-charge) Bhuvaneshwari S yesterday issued orders in this direction while chairing a crucial review meet on rising onion prices and overall situation at the collectorate here which was attended by district sub-registrar Gautam Balsane, manager (marketing board, Nashik division) B C Deshmukh, district agriculture superintendent Sanjeev Padwal, manager (marketing federation) Dileep Patil and district supply officer Arvind Narasgikar.

The prolonged rains have damaged about 80% of onion crops in the district resulting into a surge in the average market price above Rs 8000 per quintal.  Currently, on an average 25000 quintals of onion is arriving in the agriculture produce market committees (APMCs) which is being traded at an average price of Rs 7800/quintal, an official at the APMC said. During the corresponding period of the previous year, a whopping 18000 quintals of onion had hit the APMCs.

This season, on today’s date, a drop of 60% has been recorded with just 7,52,000 quintals of onion produce so far has arrived in the local markets. The formation of four cyclones — Vayu, Hikka, Kyarr, and Maha — in the Arabian Sean this year, severely damaged red onion crop in major onion-producing states of Andhra Pradesh, Karnataka and Maharashtra.

एकनाथ खडसेंनी घेतली तावडे, पंकजा यांची भेट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी बुधवारी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली. त्यानंतर एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना मावळे शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता.

या पोस्टवरून सुरू झालेला भाजपातील राजकीय गोंधळ थांबायची चिन्हे दिसत नाही. पंकजांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गौप्यस्फोट केला. ओबीसी असल्यानेच पंकजा यांचं खच्चीकरण केलं जात असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. स्व. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठरावही भाजपाने केला होता.

मात्र, त्याला विरोध केल्यानं तो ठराव फेटाळण्यात आला. तोच प्रकाश पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे,असे शेंडगे म्हणाले होते. शेंडगे यांच्या आरोपानंतर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंही पंकजा यांची भेट घेतली आहे.

बुलेट ट्रेन : शिवसेनेच्या भूमिकेमुळे केंद्र सरकारच्या अडचणी वाढल्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्याही अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या बुलेट ट्रेन प्रकल्पाला कर्जपुरवठा करणार्‍या जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची लवकरच भेट होणार आहे. त्याआधीच या प्रकल्पाचा आढवा घेण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने मोदी अ‍ॅबेंना काय उत्तर देणार याबद्दल केंद्र सरकार संभ्रमात असल्याचे समजते.

मोदी आणि अ‍ॅबे महिन्याभरामध्ये भारत- जपान वर्षिक परिषदे अंतर्गत बैठक होणार आहे. ईशान्य भारतामध्ये ही भेट होण्याची शक्यता असली तरी भेटीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या बैठकीत दोन्ही पंतप्रधानांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. या दोघांनीच संयुक्तरित्या 2017 साली सप्टेंबर महिन्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला होता. जपानमधील शिंकान्सेन बुलेट ट्रेन तंत्रज्ञानानुसार मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 18 टक्के रक्कम जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीकडून (जेआयसीए) अत्याल्पदरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार होती.

मागील वर्षी 18 सप्टेंबर रोजी जेआयसीए आणि भारतीय अर्थमंत्रालयादरम्यान यासंदर्भात एक करारही झाला होता. जेआयसीएकडून भारताला या प्रकल्पासाठी पाच हजार 591 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. बुलेट ट्रेनचे बांधककाम संथ गतीने सुरु असण्यासंदर्भांत याआधीच जपानने भारत सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याने जपानला चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे भविष्यात परदेशातून भारतात केल्या जाणार्‍या गुंतवणुकीलाही फटका बसू शकतो, असे मत एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने व्यक्त केलं आहे.

रांजणी येथे घर बांधकाम मजुराचा खंडणीसाठी कुर्‍हाडीने खून

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील रांजणी येथे नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करणार्‍या नगर तालुक्यातील खोसपुरी येथील साहिल पठाण या मजुराचा गावातील गावगुंडानी हप्ता न दिल्याच्या रागातून कुर्‍हाडीने डोक्यात गंभीर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी, ता. नगर) यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराचे बांधकाम करण्याचा ठेका घेतलेला होता.  या कामावर 10 दिवसापासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण (रा खोसपुरी ता. नगर) हे मजुरीने बांधकाम करत होते. मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली.

असता दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान वाळू चाळत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात असे सांगितले त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले असता त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेहले व आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कुर्‍हाडीने वार करून गंभीर दुखापत केली त्यामुळे साहिल यास तात्काळ पाथर्डी व नंतर नगर येथे खाजगी दवाखान्यात हलवले परंतु गंभीर दुखापत असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला.

रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार व साहेबराव पवार तसेच ईतर दोन अज्ञात आरोपीं विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जावळे हे करत आहेत. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले आहेत.

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वडनेर भैरव | वार्ताहर

शेतीच्या वादातून चांदवड तालुक्यातील वडनेर वडनेर भैरव  येथे वयोवृद्ध माजी सरपंचाच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वडनेर भैरव येथील खडकजांब रोडवर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी गट क्रमांक  ८७४ या वडिलोपार्जित जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू असलेल्या शेतात बंडू विश्वनाथ पाचोकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर जमीन वहीती करत असताना त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या माजी उपसरपंच फकीरराव नारायण पाचोरकर (वय ८०) यांच्या अंगावर ट्रक्टर घालून ठार केल्याचा मारल्याचा आरोप मयताची पत्नी रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी फिर्यादीत केला.

नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान काल (दि. ०३) रोजी मृत्यू झाला. दरम्यान, नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता.

३०४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४९ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (दि. ४) रोजी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. पोलीस स्टेशनला असंख्य नातेवाईकांनी गर्दी केल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आल्याने छावणीचे स्वरूप आले होते.

रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडनेर भैरव खडकजांब रस्त्यालगत  गट नंबर ८७४ या वडिलोपार्जीत जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू आहे.

नियमित बातम्या थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी आमचे ‘टेलिग्राम चॅनल’ (Telegram) जॉईन करा

दावा प्रलंबित असून निकाल लागलेला नसतानाही जमिनीवर शेतीची मशागत करण्यासाठी शनिवारी (दि.२३) दुपारी १२:३० वाजता आले होते.

म्हणून मी व माझे  पती त्यांना समजण्यास गेलो असताना अजून आपल्या दाव्याचा निकाल लागलेला नाही म्हणून आपण शेतीची मशागत करू नका अशी चर्चा करत असताना ट्रक्टर चालक रोशन बंडू पाचोरकर याने फकीरराव पाचोरकर यांच्या कमरेवर व पायावर ट्रक्टर चालविल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बंडू विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, हरी बंडू पाचोरकर,प्रतिक सुरेश पाचोरकर,गोकुळ सुरेश पाचोरकर,अलका बंडू पाचोरकर, आशा सुरेश पाचोरकर यांनी शिवीगाळ करून ओढताड केली.

याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकही संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी रेड्डी मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहे.

पोलिसाची उपअधीक्षकांकडून धुलाई; अदखलपात्र गुन्हाची नोंद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानी नेमणुकीस असलेल्या एका पोलीस शिपायाला नगर ग्रामीणच्या पोलीस उपअधिक्षकांनी व त्यांच्या सोबतच्या सहकार्‍यांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार पोलीस मुख्यालयाच्या गेट शेजारी मंगळवारी (दि. 03) रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक याविषयी कोणती भूमिका घेतात याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलीस शिपाई सागर भास्कर तावरे हे मंगळवारी रात्री वरिष्ठांच्या परवानगीने मुख्यालयातील स्वत:च्या निवासस्थानी गेले. तावरे यांनी घरी जेवण केल्यानंतर मुख्यालयातील गेटजवळ असलेल्या एका टायर दुकानासमोर सहकार्‍यांसह गप्पा मारीत थांबले होते. साडेदहाच्या सुमारास नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे सहकार्‍यांसह शासकीय वाहनाने पोलीस मुख्यालयाकडे जात होते. तावरे उभा असलेल्या ठिकाणी उपाअधीक्षक पाटील हे सहकार्‍यांसह उतरले व त्यांनी तावरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

पोलीस कर्मचारी असल्याचे कळाले तरी पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले, तुला मारहाण केली तर बाकी लोक पळून जातील. पाटील यांनी मारहाण केल्याने तावरे हे दुचाकीवरून खाली पडले. ते जखमी झालेत. पाटील यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍याने तावरे यांचे हात पकडून मारहाण करण्यासाठी मदत केली. तावरे यांच्या सोबत असलेल्या सय्यद नावाच्या मित्राने यांना सांगितले की, तावरे हे पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानी आहे. त्यावर पाटील म्हणाले, तो कुठे असला तरी माझे कोणीच काही करू शकत नाही. पाटील यांनी तावरे यांना शिवीगाळ केले असल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक हे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत नेहमीच कठोर निर्णय घेत असतात. आतापर्यंत गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. तावरे यांना झालेली मारहाण धक्कादायक आहे. वरिष्ठांच्या आदेशानेच तावरे यांनी पोलिसांत तक्रार दिली असल्याचे समजते. याबाबत आता पोलीस अधीक्षक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते- जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबांच्या दरबारात येऊन मनाला शांती मिळत असून प्रसन्नता वाटते, याठिकाणी मी येत नसून बाबा मला बोलावून घेतात अशी प्रतिक्रिया जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान बॉलीवुडचे सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेता जितेंद्र यांनी बुधवारी सकाळी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी शिर्डीला येत नाही मात्र साईबाबा मला येथे बोलावतात. आम्ही कितीतरी दिवसांपासून दर्शनासाठी येण्याचा विचार केला होता पण जोपर्यंत साईंचा बुलावा येत नाही तोपर्यंत शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर मनशांती होते तसेच आत्मा तृप्त होतो. जणूकाही परमेश्वराला स्पर्श केल्यासारखे वाटते. माझ्या परीवारासह सर्वासाठी साईबाबांना प्रार्थना केली आहे. 22 वर्षापूर्वी स्टुडिओच्या बाहेर पाय ठेवला असून पुन्हा स्टुडिओत जाणार नाही हा संकल्प केला होता. सध्या माझी मुलगी आणी मुलगा यांच्या पाठीमागे उभा असल्याचे जितेंद्र यांनी सांगितले.