Saturday, June 20, 2026
Home Blog Page 13458

खडसेंच्या प्रवेशासाठी शिवसेनेचे प्रयत्न !

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई  – 

विधानसभा निवडणुकीच्या काळात मेगाभरतीने राजकारणात भाजपने वादळ निर्माण केलं होते. निवडणुकीच्या निकालानंतर सगळीच समिकरणे बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले.

त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची गोची झालीय. तर भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले आहे.

या सगळ्या असंतुष्टांचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे आलेय. खडसेंची ही अस्वस्थता गेली चार वर्षांपासून असून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केल्याची माहिती मिळतेय.

खडसे हे भाजपचे दिग्गज नेते असून गेली 40 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात भाजप रुजविण्यासाठी मेहनत घेतली. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने मुख्यमंत्रिपदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात घातली.

त्यामुळे खडसे अस्वस्थ होते. त्यानंतर त्यांनी फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलेत. त्यामुळे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच त्यांना राजीनामा द्यायचा भाग पाडण्यात आले होते.

त्यानंतर यावेळी विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीटही नाकारण्यात आले. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आले आणि त्यात त्यांचा पराभव झाला.

त्यामुळे खडसे प्रचंड अस्वस्थ आहेत. बदलती राजकीय समिकरणे लक्षात घेऊन शिवसेनेें काही नेत्यांवर खडसेंशी बोलण्याची जबाबदारी सोपवली अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. त्यामुळे पुढच्या काळात भाजपला धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

सिंचन प्रकल्पांची चौकशी ? फडणवीसांचे संकटमोचक ‘संकटात’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – 

सत्ता जाताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाजन हे जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जळगाव जिल्ह्यातील चार जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले. हे चारही प्रकल्प आता चौकशीच्या फेर्‍यात अडकरणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाघूर मोठा प्रकल्प, हतनूर प्रकल्प टप्पा-1, वरणगाव-तळवेल उपसा सचिंन योजना व व शेळगाव बॅरेज या चार प्रकल्पांसाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

मात्र हा निर्णय घेताना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असा आरोप होत आहे. यामुळे उद्धव ठाकरे सरकारने या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

तर सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. या प्रकल्पांसाठी नुसताच 5 हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावांना अर्थमंत्रालयाची परवानगीच नव्हती असेही म्हटले जात आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या अभ्यासासाठी समिती

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नगर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश

  • संदीप वाकचौरे

    संगमनेर – राज्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी व शासनास योग्य त्या शिफारसी करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांनी एकूण 33 अभ्यास गटाची स्थापना केली आहे. या अभ्यास गटात अहमदनगर जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

राज्यात गेली काही वर्ष शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये होणारे विविध प्रकारचे बदल त्यातून निर्माण झालेल्या समस्या तसेच राज्यातील विविध संघटनांच्या असलेल्या मागण्या या सर्व पार्श्वभूमीवर अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अभ्यासगटाने शासनाला योग्य त्या शिफारशी करणे अपेक्षित आहे.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातले रहिवासी व राज्याचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क कायद्यातील प्रवेश प्रक्रिया, अनुदानित विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसाहित शाळेमधील शुल्क आकारणी व मध्यान्न भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी या समित्यांचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आलेले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची सदस्य म्हणून शालेय मूल्यमापन व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठीच्या उपाययोजना सुचविणे या समितीत समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी अरुण धामणे यांचा संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन या अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे.

अहमदनगरचे रहिवासी असलेले जि.प. ठाण्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांचा महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1977 व नियम 1981 अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया या गटातही समावेश करण्यात आला आहे.तर अकोले तालुक्याचे रहिवासी असलेले कोल्हापूरचे उपसंचालक सुरेश आवारी यांचा व्यावसायिक शिक्षण या अभ्यास गटावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मती सुनंदा ठुबे प्राथमिक शिक्षणाधिकारी सांगली यांचा स्वयम् अर्थसाहित शाळांचे सनियंत्रण या गटात समावेश करण्यात आला आहे.

मुस्ताक शेख शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचा खाजगी शिकवणी वर्गातील सनियंत्रण अभ्यास गटात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्य श्रीमती अचला जडे यांची पूर्व प्राथमिक शाळांचे नियोजन या अभ्यास गटाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या आहेत समित्या-शिक्षण आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या विविध समित्यांमध्ये शिक्षण हक्क कायदा प्रवेश प्रक्रिया,इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया.अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळा मध्ये शुल्क आकारणी. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम 1977 नियम 1981. संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. शिक्षकांना वेतन अनुदान देणे ऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान देणे.शाळा व विद्यार्थ्यांच्या छळाच्या तक्रारी निवरण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे.

विभागीय चौकशी व कार्य निरीक्षणे.दप्तराचे ओझे कमी करणे .एकाच परिसरातील विविध संस्थांनी चालविलेल्या शाळांचे एकत्रीकरण. मुख्याध्यापकांची पदे सरळसेवेने भरणे बाबत. केंद्रप्रमुख या पदाचे सक्षमीकरण. सैनिकी शाळा व विद्यानिकेतन यांची गुणवत्ता वाढविणे. न्यायालयीन प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्याची योजना. मध्यान्न भोजन योजनेची प्रभावी अंमलबजावणी. पूर्व प्राथमिक शाळांचे नियोजन. डी. एल .डी आणि बी.एड अभ्यासक्रमाची उपयोगिता निश्चित करणे. स्वयम् शाळांचे सनियंत्रण. अल्पसंख्यांक शाळांचे व्यवस्थापन. खाजगी शिकवणी वर्गात सनियंत्रण. विविध स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इयत्ता अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमाचे परीक्षण करणे .शिक्षक मुख्याध्यापकांची अशैक्षणिक कामे कमी करण .

महानगर पालिका शाळांची गुणवत्ता वाढविणे. उर्दू माध्यमिक शाळांची गुणवत्ता विकास. निरंतर शिक्षणाधिकारी यांची भूमिका व कार्य. लोकसहभाग सहभाग वाढविणे. शालेय मूल्यमापन. व्यावसायिक शिक्षण व स्थलांतरित मुले .शालेय शिक्षण स्तरावरील शिष्यवृत्ती सुधारणा समिती. अर्थसंकल्प तयार करणे व लेखाविषयक बाबींचे सुलभीकरण. कार्यालयाची रचना व कार्यपद्धती अभिलेख पद्धती तसेच माहिती अधिकार अभिलेख बाबत जाणीव जागृती. शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे .या गटांचा समावेश असणार आहेत.

शिक्षकांना वेतनाऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान अभ्यास गट
राज्यातील शिक्षकांना सध्या विद्यार्थी संख्येवर वेतन न देता त्यांना वेतन आयोगातील वेतनश्रेणीप्रमाणे वेतन देण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान देणे संदर्भाने अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट निश्चित करण्यात आला आहे.प्रति विद्यार्थी अनुदान संस्थेत देण्याबाबतचा अभ्यास करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली होती. त्यानुसार शिक्षकांना वेतन अनुदान देण्याऐवजी प्रतिविद्यार्थी अनुदान संस्थेस अदा केल्यास शासनाच्या आर्थिक बळावर, प्रशासकीयदृष्ट्या काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काही परिणाम होऊ शकेल का याचा अभ्यास हा अभ्यासगट करणार आहे.  या अभ्यास गटात राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील अध्यक्ष असणार असून, त्यात प्रभावती कोळेकर,दीपक माळी, श्रीमती झनकर या शिक्षण अधिकाराचा समावेश आहे. हनुमंत जाधव उपशिक्षणाधिकारी हे सदस्य असणार आहेत. तर सचिव म्हणून राजेश्वरी चंदनशिवे अधीक्षक या काम पाहणार आहेत. या समितीच्या अहवालावर ती राज्याच्या सर्व शिक्षकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या अभ्यास गटाचा शिफारसी काय येतात याकडे राज्याच्या शिक्षकांचे लक्ष लागून राहणार आहेत.

पाच कोटींची बँक गॅरंटी भरा : हरित लवादाचे मनपाला आदेश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – कचरा व पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यावश्यक असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला प्रादेशिक प्रदूषण निर्मूलन महामंडळाकडे पाच कोटींची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश गुरूवारी दि. 5 रोजी दिले आहेत. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतीही दिल्या आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाकडे कचरा डेपो, तेथे साचणार्‍या कचर्‍यावरील प्रक्रिया, मृत जनावरे यासंदर्भात तक्रारी गेलेल्या आहेत. त्यावर सातत्याने सुनावण्या होऊन लवादाने उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र महापालिकेकडून त्या पूर्ण झाल्या नाहीत.

यापूर्वी बायो मेथिनेशन प्रकल्प उभारण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदत देऊन त्यासाठी प्रदूषण निर्मूलन महामंडळाकडे एक कोटीची बँक गॅरंटी जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार बँक गॅरंटी जमा झाली, मात्र प्रकल्प पूर्ण न होऊ शकल्याने ती गॅरंटी जप्त करण्यात आली. आता पुन्हा पाच कोटींची बँक गॅरंटी जमा करण्यास सांगितली आहे.

यात दहा मेट्रिक टन क्षमतेचा बायो मेथिनेशन प्रकल्प एक महिन्यात, शंभर मेट्रीक टन खत प्रकल्प  28 फेब्रुवारी, मृत जनावरे नष्ट करण्यासाठी इन्सिलेटर प्रकल्प 28 फेब्रुवारी, बुरूडगाव येथील कचरा डेपोवर जुना कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या मुदती दिल्या आहेत. या मुदतीत प्रकल्प पुर्ण न झाल्यास पाच कोटींची बँक गॅरंटी जप्त करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी 9 जानेवारीला मतदान

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आचारसंहिता लागू

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील विविध 8 जिल्ह्यांमधील 34 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 9 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी थेट जनतेतून सरपंचांची निवड होणार असल्याने चुरस पहायला मिळणार आहे.
संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 19 ते 24 डिसेंबर 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 26 डिसेंबर 2019 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबर 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: अहमदनगर- 8, नाशिक- 6, ठाणे- 2, जळगाव- 7, यवतमाळ- 4, नागपूर- 2, औरंगाबाद- 2, आणि सातारा- 3. एकूण- 34.

येथे रणधुमाळी
संगमनेर- नान्नज दुमाला, काकडवाडी
श्रीगोंदा- मांडवगण, म्हांडुळवाडी, कोकणगाव, भावडी
पारनेर – राळेगण थेरपाळ, म्हसे खुर्द

वाळूतस्करांविरोधात ग्रामस्थ एकवटले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी
नेवाशातील पुनतगावात तराफा महसूल व ग्रामस्थांनी पेटवून केला नष्ट
पाचेगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात पुनतगाव बंधार्‍याजवळ महसूल विभागाने कारवाई करत वाळूतस्करीच्या उपयोगासाठी आणलेला तराफा (थर्माकोल बोट) उद्ध्वस्त केला तर दुसर्‍या तराफ्यासह पसार होण्यात वाळूतस्कर यशस्वी ठरले.
पाचेगाव, पुनतगाव परिसरातून वाळू तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.
मात्र पाणी असल्यामुळे तस्करांना वेगळी पद्धत वापरावी लागत आहे. प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर हे तीनही बंधारे सध्या पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे पाण्यातून वाळू बाहेर काढावी लागत आहे. त्यासाठी थर्माकॉल तराफ्याचा वापर तस्कर करत आहेत.
काल गुरुवारी सकाळी 11 वाजता महसूल विभागाने पुनतगाव बंधार्‍याशेजारी कारवाई करत एक तराफा (बोट) उद्ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान दुसरा तराफा पसार करण्यात वाळू तस्कर यशस्वी झाले. या कारवाईत वाळू तस्करांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पाण्यातून ही वाळू उपसून नदी काठावर साठविण्यात येत होती. त्यानंतर वाहनात भरून वाळू विकली जात होती. या घटनेची खबर लागताच महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तेथील एक तराफा पेटवून दिला. या घटनेची वाळू तस्करांना खबर लागताच पाचेगाव शिवरात असणारा आणखी एक तराफा वाळू तस्करांनी पसार केला.
प्रवरा नदीपात्रात गेल्या एक वर्षांपासून महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या महिनाभरापासून पुन्हा वाळू तस्करांनी अनधिकृत वाळू उपसा सुरू केला होता.पाचेगावात चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी वाळू चोरी करणारा टेम्पो पेटविला होता. तर दोन वर्षांपूर्वी वाळू भरलेल्या अवस्थेत दोन डम्परवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. वाळू तस्करांना पुनतगाव व पाचेगावातीलच काही तरुणांची मदत होत असल्याची चर्चा आहे.
कालच्या कारवाई प्रसंगी कामगार तलाठी गणेश जाधव यांच्यासह पुनतगाव ग्रामस्थ उपस्थित होते. कामगार तलाठी यांचा येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सत्कार केला. वाळूतस्करांना सहकार्य करणार्‍या शेतकर्‍यांना बहसूल विभागाकडून नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वाळू वाहतूक होणार्‍या रस्त्यांवर खड्डे खोदण्यात येणार असून पाचेगाव ग्रामस्थांनी वाळूतस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व ते उपाय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. ग्रामस्थांची एकजूट कायम राहिली व कोणीही गद्दारी करुन तस्करांना सहकार्य केले नाही तर वाळू तस्करी करण्याची कोणीच हिंमत करु शकणार नाही. कारण येथील संतप्त ग्रामस्थ काय करु शकतात हे याआधीच्या घटनांतून दिसून आले आहे.
वाळूतस्करांकडून दमबाजी
महसूल विभाग व ग्रामस्थांनी तिथे उपलब्ध झालेले डिझेल व उसाच्या पाचरटाचा तराफा जाळण्यासाठी उपयोग केला. दरम्यान कारवाई करणारे कामगार तलाठी व ग्रामस्थांना वाळू तस्करांकडून दमबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे. महसूल विभागाने जाळलेल्या तराफ्याच्या किंमतीची भरपाई देण्याची मागणी केली असल्याचे समजते.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नगरच्या अंजली वल्लाकट्टी यांना सुवर्णपदक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिल्लीच्या त्यागराज स्टेडीयम येथे झालेल्या कजाक कुराश नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत नगरच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली वल्लाकट्टी यांनी सुवर्णपदक पटकावले. चंडीगडच्या खेळाडूला अवघ्या पन्नास सेकंदात आसमान दाखवत अंतिम फेरीत बाजी मारली. अंजली वल्लाकट्टी यांची आता कजाकिस्तान येथे होणार्‍या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघात निवड झाली आहे.

कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी यांनी या आधीही अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदके पटकावली आहेत. मात्र गेल्या 10 ते 12 वर्षांपासून त्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांपासून अलिप्त होत्या. मात्र यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेऊन प्रदीर्घ काळानंतर त्यांनी यावर्षीच्या कजाक कुराश नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत भाग घेतला.

त्यासाठी भरपूर सराव करत मेहनत घेतली होती. क्रीडा प्रशिक्षक प्रा.संजय धोपावकर व अंकुश नागर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत झालेले सर्वसामन्यांचा निकाल गुणांवर आधारावर देण्यात आले. मात्र केवळ अंजली वल्लाकट्टी यांनीच प्रतिस्पर्धीला चीतपट करण्याची कामगिरी केली. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य. अंजली वल्लाकट्टी यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ग्रामपंचायतअंतर्गत 14व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव-पिंपरखेड तांडा (गोरखपूर) या गटात सन 2017-2018 आणि 2018-2019 या दोन वर्षात ग्रामपंचायतच्या 14 वित्त आयोगाअंतर्गत विविध कामे न करता, बील काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्या सुनंदा सिताराम चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

मात्र याप्रकरणाची ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे यांनी दखल न घेतल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले.

रांजणगाव-पिंपरखेड तांडा या गटात गेल्या दोन वर्षात 14व्या वित्त आयोगाअंतर्गत कामे  न करता, निधीची बीले परस्पर संगनमताने काढण्यात आली आहे.  या प्रकरणाची ग्रामपंचायत विभागामार्फत सीईओंनी चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करणे गरजेचे आहे. 

-सुनंदा चव्हाण,जि.प.सदस्या

घोळ प्रकरणात ग्रामपंचायत विभाग रडारवर 

ग्रामपंचायत विभागामधील 10 टक्के अनुशेष भरती प्रकरणात घोळ झाल्याची बाब उघडकीस आली आहे. त्या पाठोपाठच 14व्या वित्त आयोगाअंतर्गत पिंपरखेड तांडा (गोरखपूर) या गावात कामे न करता, परस्पर बीले सादर करुन ती अभियंत्यांमार्फत काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत विभाग पुन्हा चौकशीच्या रडारवर आला आहे.

सदस्यांच्या मागणीला केराची टोपली

गटात कामे न करता, परस्पर निधी लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी  जिल्हा परिषद सदस्या सुनंदा चव्हाण यांनी दि. 22 नोव्हेंबर रोजी प्रभारी सीईओंना निवेदनाव्दारे केली. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे जि.प.च्या सभेत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला.

धुळ्यात कांद्याला विक्रमी ११ हजारांचा भाव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे ।

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लाल कांद्याची  2 हजार 200 गोणी तर पांढर्‍या कांद्याची 400 गोणी आवक झाली. लाल कांद्याला जास्ती जास्त 11 हजार रूपये क्विंटल तर सरासरी 7 हजार रूपये भाव मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव तेजीत आहेत. कांद्याच्या वाढत्या भावाने  मध्यवर्गीयांचा वांदा केला आहे.तर सध्या चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात  समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान आज येथील बाजार समितीत लाल कांद्याची 2 हजार 200 गोणी आवक झाली. त्याला कमी कमी 500 व जास्तीत जास्त 11 हजार रूपये व सरासरी 7 हजार रूपये  क्विंटल भाव मिळाला.

तर 400 गोणी पांढर्‍या कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी 700 रूपये व जास्तीत जास्त 8 हजार 800 रूपये व सरासरी 6 हजार रूपये भाव मिळाला.

पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लालबहादूर शास्त्रीनगरातील घटना : रोख रकमेसह सव्वातीन लाख लंपास

धुळे –

शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. चोरट्यांनी पुन्हा पोलिस कर्मचार्‍याकडे घरफोडी  पोलिसांना आव्हान दिले आहे. लालबहाद्दुर शास्त्री नगरातील पोलिसा कर्मचार्‍याच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह 3 लाख 25 हजारांचा मुद्येमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील नवजीवन ब्लड बँकेच्या मागे लालबहाद्दुर शास्त्री नगरातील प्लॉट क्र. 26/27 मध्ये संजय दादाभाई ठाकुर (वय 43) हे राहतात. ते शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे देवपूरात राहणारे मेहुणे किरणकुमार अहिरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यामुळे संजय ठाकुर हे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह त्याकडे राहत असल्यामुळे त्यांचे घर बंद होते.

ही संधी साधत काल दि. 4 ते 5 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले उसनवारीचे 1 लाख 20 हजार व आईच्या पेन्शनचे 40 हजार असे एकुण 1 लाख 60 हजार रूपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 3 लाख 25 हजारांचा ऐजव चोरून नेला.

आज सायंकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संजय ठाकुर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शिवानंद कॉलनीत घरफोडी

शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगरातील शिवानंद कॉलनीतील शेतकर्‍यांचे बंद घर  फोडून चोरट्यांनी 74 हजारांचा मुद्येमाल लांबविला.

याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवानंद कॉलनीत प्लॉट नं. 8 मध्ये सुरेश नथ्थु हिरे हे राहतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 10 हजार रूपये किंमतीचा टीव्ही, 4 हजार रूपये किंमतीची देवाची मुर्ती, पितळी भांडे असा 74 हजार रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला.

सुरेश हिरे घर परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत मोहाडी पोलिसात माहिती देण्यात आली.  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथकाला बोलविण्यात आले. परंतू श्वानला माग गवसला नाही.