Sunday, June 21, 2026
Home Blog Page 13457

महापालिका – पोलीस बंदोबस्तात वसुली; मालमत्तांचा लिलाव करणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

थकित कर जमा करण्यासाठी महापालिकेने जोर वाढविला

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेने आता वसुलीसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. तसेच यापूर्वी सील केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्याचीही तयारी सुरू केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दि. 6 रोजी 25 लाखांची वसुली करण्यात आली. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे दहा लाख रुपये आहेत.

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारताच वसुली आणि स्वच्छता अभियानाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मालमत्ता कराची जवळपास 285 कोटींची थकबाकी असून, त्यातील अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रवीष्ठ आहेत. मात्र जे न्यायालयात प्रकरणे नाहीत, मात्र जाणीवपूर्वक संबंधित मालमत्ताधारकाकडून कर जमा केला जात नाही, अशांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत. यासाठी मालमत्ता जप्त करण्यापासून, संबंधित मालमत्तेचे नळजोड तोडण्याचेही आदेश दिले आहेत.

शिवाय थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्याचीही तयारी सुरू आहे. द्विवेदी आज महापालिकेत जवळपास चार तास ठाण मांडून होते. या काळात त्यांनी विभागप्रमुखांना स्वतंत्रपणे बोलावून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत थ्री स्टार मानांकन मिळविण्यासाठी ते रोज पाठपुरावा करत आहेत. आजही त्यांनी याबाबत माहिती घेतली. तसेच सायंकाळी उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयातही महापालिकेच्या अधिकार्‍यांना बोलावून रोजच्या कामाचा आढावा घेतल्याचे समजते.

मालमत्ता कर वसुलीचे प्रत्येक प्रभाग समित्यांना उद्दिष्ट दिलेले असल्याने सर्वच कर्मचारी आता कामाला लागले आहेत. आज याचाच परिणाम म्हणून 25 लाखांची वसुली झाली. बाजार समितीकडे थकित असलेले दहा लाख रुपये कारवाईचा बडगा उगारताच जमा झाले. यापुढे वसुली मोहीम तीव्र होणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही पोलीस यंत्रणेकडे करण्यात आली आहे. यामध्ये एक अधिकारी आणि आठ पुरूष व आठ महिला कर्मचार्‍यांची मागणी केली आहे.

प्रत्येक प्रभाग समितीमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात वसुली मोहीम आणि कारवाई करण्यात येणार आहे. अनेकदा जप्तीची कारवाई करताना महापालिका कर्मचार्‍यांना विरोध केला जातो. काही वेळा शिविगाळ व मारहाणीचेही प्रकार घडतात. तसेच यावेळी केवळ जप्तीवरच न थांबता नळजोड तोडण्याचीही कारवाई होणार असल्याने पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्याने त्यासाठी द्विवेदी यांनी तयारी दर्शवून पोलीस यंत्रणेकडे तसे पत्र दिले आहे. तसेच यापूर्वी थकबाकी जमा न करणार्‍या मात्र त्यामुळे सील केलेल्या मालमत्तांची थकित रक्कम अदा झालेली नाही. जप्तीची कारवाई करूनही मालमत्ताधारक थकबाकी जमा करत नसल्याने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेने तशी यादी तयार केली असून, त्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.

प्लॅस्टिकविरोधी कारवाईवरून वादावादी
महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी कारवाई जोरदार सुरू केली आहे. गुरूवारी 92 हजार रुपयांचा दंड जमा केल्यानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती. सायंकाळपर्यंत 26 हजारांचा दंड जमा केला होता. मात्र व्यावसायिक आणि कारवाई करणारे कर्मचारी यांच्यात अनेक ठिकाणी खटके उडत होते. कोणत्या प्लॅस्टिकला परवानगी आहे, कोणत्या नाही, हे वादाचे कारण होते. त्या संदर्भातील तक्रारीही महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे येत होत्या. मात्र कारवाई सुरूच ठेवण्यात आल्याने प्लॅस्टिकचा वापर करणार्‍या व्यावसायिकांना दंड भरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

सिंचन योजनांमध्ये रुपयाचीही अनियमितता नाही – आ.महाजन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

युती सरकारच्या काळात राज्यातील 476 पैकी 310 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ही कार्यवाही अत्यंत पारदर्शक झाली असून यात 1 रुपयाचीही अनियमितता नाही.

हवे तर या प्रकरणाची उच्चपदस्थ अधिकार्‍यांची समिती नेमून चौकशी करा, असा खुलासा वजा आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी ठाकरे सरकारला दिले आहे. त्यासोबतच ही कामे अधिक काळ बंद राहिल्यास हा खान्देशच्या विकासावर परिणाम होईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील 5 सिंचन प्रकल्पांच्या चौकशीचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध झाले. याप्रश्नी खुलासा करण्यासाठी महाजन यांनी शुक्रवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सिंचन गैरव्यवहाराचे सारे आरोप फेटाळले.

महाजन पुढे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात सिंचन योजनांमध्ये अनेक गैरव्यवहार समोर आल्याने त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर न्यायालय आणि चितळे समितीने अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता घेतल्याशिवाय पूर्ण करू नयेत, असे निर्देश दिले होते.

युती सरकार सत्तेत आल्यावर न्यायालय आणि चितळे समितीच्या निर्देशानुसार, आम्ही 476 पैकी 310 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. ही कार्यवाही करताना कुठेही अनियमितता झालेली नाही. मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्राधान्य दिले.

त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भासाठी एक वेगळी तर उत्तर महाराष्ट्रासाठी एक वेगळी अशा राज्यस्तरीय दोन तांत्रिक सल्लागार समित्या नेमल्या. एवढंच नव्हे तर नियोजन, वित्त आणि जलसंपदा विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती तसेच तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्णयानंतरच हाती घेतलेल्या सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. नियोजन आणि वित्त विभागाच्या मंजुरीनंतरच सिंचन योजनांच्या कामांना सुरुवात झाली आहे.

काही प्रकल्पांना केंद्राकडून निधी

राज्यातील अपूर्ण राहिलेल्या अनेक मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना तसेच बळीराजा सिंचन योजनेतून निधी मंजूर करून आणला.

त्यात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून 26 तर 96 प्रकल्पांना बळीराजा सिंचन योजनेतून निधी आणला. आज त्यांची कामे वेगात सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर, शेळगाव बॅरेजसारख्या प्रकल्पांनादेखील अशाच पद्धतीने निधी आणला, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

फक्त राजकारण होता कामा नये

मागील काळात सेना आमच्याबरोबर सत्तेत होती. सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्याचा निर्णय त्यांनी आमच्यासोबत घेतला. त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेल्या अनेक प्रकल्पांना त्यांनी मंजुरी मिळवून घेतली. असे असताना आता हा विषयावर राजकारण करायला नको होता, अशा शब्दात महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

आ.गिरीश महाजनांचे खडसेंना खुले आव्हान

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पंकजा मुंडे, अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचा पराभव करणार्‍या स्वपक्षातील लोकांची नावे जाहीर करा !

जळगाव – 

पक्षात कुणीही कुणाला पाडण्याचे उद्योग करणार नाही. खडसे यांना जर संशय असेल तर त्यांनी असे काम करणार्‍यांची  नावे पुराव्यासह जाहीर करावीत, असे  खुले आव्हान आ.गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना दिले आहे.

भाजपाच्या पंकजा मुंडे व मुक्ताईनगरातील उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा आरोप निरर्थक आहे. मुक्ताईनगरात माजी मंत्री एकनाथराव खडसे 2014 च्या निवडणुकीत कमी फरकाने विजय झाले होते.

यंदा तर अ‍ॅड. रोहिणी खडसेंविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंकजा मुंडे व रोहिणी खडसे यांना पक्षांतर्गत कारवाया करुन पाडल्याचा एकनाथराव खडसे यांच्या आरोपावर शुक्रवारी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारणा केली.

त्यावेळी महाजन यांनी सांगितले की, भाजपाने कायम ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका ठेवली आहे. सत्तेत असताना अनेक महत्त्वाच्या मंत्रिपदावर ओबीसी नेतेच होते. मुक्ताईनगरात मागील काळात एकनाथराव खडसे एकवेळा 1200 मतांनी विजयी झाले होते.

तसेच मोदी लाट असतानाही त्यांना 8500 मताधिक्य होते. यंदा तर या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे ती पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होऊन रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. कदाचित रोहिणी खडसेंऐवजी एकनाथराव खडसे असते तर विजयी झाले असते, असेही महाजन यांनी सांगितले.

कुणीही पक्ष सोडणार नाही

भाजपातील नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याच्या केवळ अफवा व कल्पना आहेत. कुणीही पक्ष सोडणार नाही. भाजप एकसंध आहे आणि राहील, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

Need for society to change : CP

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Nashik police always there to help women

NASHIK:

Police is always ready to ensure the safety of girls and women, but incidents like Hyderabad and Madhya Pradesh still happen, the society needs to change and respect women for such incidents to stop, stated Commissioner of Police Vishwas Nangare Patil while speaking to Deshdoot Times. There is a need to give proper gender and sex education to children during the stage of adolescence and need to teach them how to respect women, he added.
The country has been shocked following rape and murder incidents at Hyderabad and Madhya Pradesh. On the backdrop of this, Nagre Patil expressed his views regarding women safety.

He said, Nashik is a developing city and women and girls here feel secure. In case of any harassment, police is always ready to provide safety for women. Giving priority to the safety of women and girls, many projects have been conducted in the area falling under the police commisionerate. Nirbhaya squads have been mainly formed and action has been taken against hundreds of eve-teasers so far.

Police have traced out 500 black spots in the city, increasing vigil in such areas. Nirbhaya squads, as well as beat marshals, are regularly patrolling there. Women police personnel in Nirbhaya squad are taking action against eve-teasers in case of harassment. Besides this, Nirbhaya squads are regularly visiting schools and colleges and are creating awareness among the students. Toll-free number 1091 of Nirbhaya squad is in the list of quick response.

A women cell in the police commissionerate has been made active. After a complaint by women, police are taking immediate action. Help from expert psychologists is being taken to give mental support to women. In addition, such training has also been given to those officials and personnel working in the cell. Orders have been issued for police stations to take immediate note of complaints by women and girls and to address them, Nangre Patil informed.
Women and girls avoid to visit police station for fear of society and defamation, but eve-teasers take benefit of this. If the help of police is taken in time, next mishap can be averted, he cautioned.

“Amendments are being made in the laws being meant for the safety of girls and women. We are always ready to protect girls and women, but they should be trained for self-defence. They cannot fight with anybody after three days of training. Training how to rescue self from such condition can be given in short period. It is essential to give training like karate for a year. This should be a part of education”, Nangre Patil expressed.

Efforts to achieve coordination among all depts

Various government departments are working for the welfare of women. We are working incoordination with women and child welfare department, family courts, fast track courts and Commission for Women. This will help in providing help to women at one place.

There should be initiative in the family itself

The atmosphere in the family is playing an important role in the development of children during their adolescence. If a woman does not get respect at home, children tend to develop similar attitudes. If they are not given proper sexual education, they get false information through film, TV serial, social media and internet and involve in bad acts. To prevent this, it is the responsibility of parents and educational institutes to provide proper guidance and education to children.

Learn to say NO

Girls many times are lured by friends or unknown person. There is an attempt to trap girls through chatting on facebook, WhatsApp or emotional blackmail. Girls should identify the motive of the person and stop talking to such people and learn to say no. They can also seek help of the police who will help, protecting the identity of the girls and women, said Nangre Patil.

Video : समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज – आयुक्त नांगरे-पाटील

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । खंडू जगताप 

मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कायम तत्पर आहेतच, परंतु पुरुषी मानसिकता बदलत नाही, समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हैदराबाद, मध्यप्रदेशसारख्या घटना होतच राहतील. वयात येताना मुलांना योग्य प्रकारे लैंगिक प्रशिक्षण देऊन त्यांना महिलांचा आदर करण्याची शिकवण देणे गरजेचे असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.
हैदराबाद तसेच मध्यप्रदेश येथे घडलेल्या अत्याचार व खून प्रकरणांनी देश हादरला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व येथील महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना नांगरे-पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, नाशिक हे विकसीनशील शहर असून येथील महिला, मुली नक्कीच सुरक्षितता अनुभवतात. कोणत्याही घटकांकडून तुम्हाला त्रास होत असल्यास आपले माहेर समजून पोलीस ठाण्यात यावे.पोलीस आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असतील. नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. प्रामुख्याने निर्भया पथके अधिक सज्ज करण्यात आली असून शेकडो टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

शहरात 500 ब्लॅक स्पॉट शोधले असून या ठिकाणी निर्भया तसेच बीट मार्शलची नियमित गस्त चालू आहे. निर्भया पथकातील पोलीस महिला साध्या वेशात अशा भागात जाऊन टवाळखोरांकडून त्रास होताच गुप्त चित्रिकरण करून त्यांना धडा शिकवत आहेत. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन दररोज निर्भया पथके मुलांची जनजागृती करत आहेत. निर्भयाचा टोल फ्री क्रमांक 1091 हा सर्वाधिक जलद प्रतिसाद या यादीत आहे. अवघ्या काही मिनिटांत महिलांना आहे त्या ठिकाणी मदत दिली जात आहे.

आयुक्तालयातील महिला कक्ष सक्षम करण्यात आला असून महिलांची तक्रार येताच याची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे. यासह महिलांना मानसिक आधार देण्यासाठी या कक्षात व्यावसायिक तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतो, यासह येथील अधिकारी व सेवकांना तसे प्रशिक्षण दिले गेले आहे. यासह त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला व मुलींच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत.

मुली व महिला बदनामी व समाजाच्या भितीने पोलीस ठाण्यात येण्याचे टाळतात. परंतु याचा गैरफायदा टवाळखोर घेऊन पुढचे पाऊल उचलतात यामुळे पहिल्यांदाच पोलिसांची मदत घेतली तर पुढील अनर्थ टाळता येतील.

स्वरक्षणासाठी सज्ज व्हा

मुली व महिलांसाठी कायद्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. पोलीस म्हणून आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर आहोतच, परंतु स्वरक्षण, बचावासाठी त्यांना तयार केले पाहिजे. मुलींना तीन दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्या कोणाचा मुकाबला करू शकणार नाहीत. या तीन दिवसांत अशा प्रसंगातून सुटका करून घेण्याचे प्रशिक्षण देता येईल. तर मार्शल आर्ट, कराटेसारखे स्वरक्षणाचे वर्षभराचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. हा सर्व शिक्षणाचा भाग व्हावा असे नांगरे पाटील यांनी नमुद केले.

सर्व विभागांच्या समन्वयाचा प्रयत्न

शासनाचे विविध विभाग महिलांसाठी कार्य करत असतात. यामध्ये पोलिसांसह, महिला कक्ष, महिला व बालकल्याण विभाग, कौटुंबिक न्यायालये, शीघ्रगती न्यायालये, महिला आयोग असे महिलांसाठी काम करणार्‍या सर्व विभागांचा समन्वय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेणेकरून महिलांना सर्व मदत एकाच ठिकाणी व वेळेवर मिळेल.

कुटुंबांपासून प्रारंभ व्हावा

मुले वयात येताना त्यांच्यावर घरातील वातावरणाचा प्रभाव पडत असतो. पालक कसे वागतात. महिलेला घरात कसे वागवले जाते, त्यांचा आदर केला जात नसेल तर मुले बाहेरील महिलांबाबतही वाईट कमेंट पास करण्यास सुरुवात करतात. त्यांना वेळीच लैंगिक शिक्षण दिले गेले नाही तर चित्रपट, मालिका, सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून मिळणार्‍या चुकीच्या माहितीच्या आहारी जाऊन नको ती कृत्य करतात. यासाठी वयात येणार्‍या मुलांना वेळीच योग्य मार्गदर्शन, शिक्षण देण्याची जबाबदारी पालक तसेच शिक्षण संस्थांची आहे. कुटुंबापासूनच याची सुरुवात झाल्यास त्यांची मानसिकता बदलेल.

वेळीच नाही म्हणायला शिका

मुली अनेकदा मित्रांमध्ये अगर अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यास बळी पडतात. सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग गोड बोलून अगर, ईमोश्नल ब्लॅकमेल करून, जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पुढील व्यक्तीचा हेतू ओळखून पहिले बोलणे बंद करा. दुसरे वेळीच नाही म्हणायला शिका, याचा परिणाम नाही झाला तर कसलीही भीती न बाळगता पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला शिका. पोलीस आपली बदनामी न होऊ देता मदत करतील व पुढील अनर्थ टळतील.

शहादा येथे एक लाखाची चोरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शहादा – 

शहरातील प्रकाशा रोडवर वीज वितरण कंपनीच्या शासकीय निवासस्थानाच्या तिसर्‍या मजल्यावरील घराचा कडीकोंडा तोडून रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेल्याची घटना भरदुपारी घडली.

यामुळे  शासकीय निवासस्थानातील रहिवासी यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील वीज वितरण कंपनीत दयानंद अनंत भामरे प्रधानतंत्रज्ञ आहेत. ते प्रकाशा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये राहतात. दवाखान्यानिमित्त आज धुळे येथे गेले होते.

त्यादरम्यान दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरांत प्रवेश करून  सुमारे एक लाख रुपयांचा मुदेमाल लंपास केला आहे. घरातील बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त असल्याने त्यांना संशय आला. त्यानी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी दिनेश लाडकर, संजय रामोळे,  चेतन चौधरी, व्ही.टी.पावरा यानी भेट देऊन माहिती घेतली असता चोरी करणारे हे दोन किवा जास्त असल्याची माहिती दिली.

चोरट्यांनी  कपाट्यातील ठेवलेले तीस हजार रूपये किमतीचा सोनी कंपनीचा टि.व्ही. 54 हजार रूपये रोख, 3 हजार रूपये लहान मुलांचा गल्ला व किरकोळ रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

वीज वितरण कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही असल्याने चोरटे कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. त्याचा तपास पोलिस करत आहे. शासकीय कार्यालयात प्रथम चोरी झाल्याने येथील रहिवासी यांच्यात घबराट निर्माण झाली आहे.

नंदुरबार येथील श्वान पथक व ठसे तंज्ञ यांना प्राचारण करण्यात आले होते. शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्या असल्याने नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे.

Citizen experience centre to be set up at art gallery

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

Nashik Municipal Smart City Development Ltd. is thinking to set up citizen experience centre under safer city Nashik. A team of Smart City company, UST Global and EY Consultant jointly conducted inspection at Mahatma Phule gallery to set up the citizen experience centre on the first floor. Nashikites can experience historic, spiritual, mechanical and Nashik in future in this proposed Centre.

There will be information about smart city projects, models of that projects, various videos, innovation hub and start up. Information about the projects which have been completed under the smart city mission and those projects which will begin. Students and citizens can experience Nashik’s historic, spiritual, industrial and smart city in future under one roof. All of these can be experience in 2D and 3D form.

As Mahatma Phule art gallery is besides Kalidas auditorium, citizens can also experience virtual reality. As it is located in the central area of the city and entry is free, citizens in large numbers will visit the centre and will take experience. This project will be an addition to the popularity of Mahatma Phule art gallery.

The information about the projects will be displayed on the walls in the form of pictures and graphics. 2D and 3D models of the projects under the smart city mission will be exhibited in the Centre. In addition, information about smart city projects will also be given through murals. The journey of Nashik from a land of mantras to a land of machines will be presented through a short film. In addition, there will be a dark room means virtual reality experience room. Citizens can take the experience of videos and informative films which will be prepared in the angle of 360.

Citizens can also see and experience smart devices like flood sensor, environment sensor, CCTV camera, wi-fi devices, public redressal system, emergency call box and other smart devices here. After usage of two-third space of the hall for Citizen Centre, it is possible to make planning for start-up showcase in rest area. Students will get available a bigger opportunity here.

अंकुर फिल्म फेस्टिवल : सोशल मिडिया नवंमाध्यम, त्यातून व्यक्त व्हा – चक्रवर्ती भटकळ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : प्रतिनिधी

आपल्याकडे जी साधने आहेत त्यांना अजिबात कमी लेखू नये. देशात दूरदर्शन हे सर्वात  मोठे व्यासपीठ असून त्यामार्फत आम्ही लाखो लोकांपर्यंत आमचा विषय पोहोचवला.  विशेष म्हणजे या डॉक्युमेंटरीमध्ये कोणताही प्रसिद्ध चेहरा नाही. तरीही लोकांनी याला भरभरून दाद दिली.

दुसरीकडे सोशल मिडिया रोज बदलत असून त्याद्वारे आपली गोष्ट सांगता आली तर ती नक्कीच लोकापर्यंत पोहोचणार आहे. अंकुर फिल्म फेस्टिवल सारख्यामाध्यमातून स्वतः फिल्म निर्माण करणाऱ्याला थेट लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधता येतो हे फार महत्वाचे आहे असे मत प्रसिद्ध दिग्दर्शिका, लेखिका, पाणी फौंडेशनच्या सोशल मिडिया प्रमुख स्वाती चक्रवर्ती भटकळ यांनी व्यक्त केले. स्वाती यांच्या हस्ते अभिव्यक्तीच्या आठव्या अंकुर फिल्म फेस्टिवलचे औपचारिक उद्घाटन कुसुमाग्रज स्मारकात झाले.

यावेळी स्वाती चक्रवर्ती भटकळ यांची प्रसिद्ध डॉक्युमेंटरी ‘रूबरू रोशनी’ चे प्रथमच सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनिंग केले आहे. ही डॉक्युमेंटरी आमिर खान प्रोडक्शनने निर्मित केली असून, नेटफ्लिक्सवर ही फिल्म उपलब्ध आहे. यावेळी फिल्म दाखवल्यानंतर  त्यांनी प्रेक्षकांसोबत संवाद देखील साधला.

डॉक्युमेंटरी ‘रूबरू रोशनी’ बद्दल स्वाती म्हणाल्या की हा विषय नसून या घटना एखाद्याच्या आयुष्यात घडल्या आहेत. त्यामुळे ‘गोष्ट’ म्हणून मी त्याकडे पाहिले. मला या गोष्टी कुणाच्या तरी जीवनात घडल्या असल्याने महत्वाच्या वाटतात. त्यामुळे या मी निर्मित केल्या आहेत.

या सर्व गोष्टी डॉक्युमेंटरी बघत असलेल्याच्या हृदयाला भिडतात असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिव्यक्तीचे अध्यक्ष संजय सावळे यांनी संस्थेची माहिती दिली. फेस्टिवल निवड समितीचे सदस्य यांनी फिल्म निवडीविषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर अंकुर संयोजन समितीचे अध्यक्ष जितेंद्र पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

अनोख्या पद्धतीने उद्घाटनाची परंपरा कायम 

अंकुरचे उद्घाटन कायमच अनोख्या पद्धतीने होत आले आहे. यंदा ही हीच परंपरा कायम ठेवत स्वाती यांनी ‘ तुम्ही सगळे आलात म्हणजेच अंकुरचे उद्घाटन झाले असे सांगत फेस्टिव्हलचे  औपचारिक उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.

फेस्टिव्हलमधील आकर्षणे

कार्यशाळा : अॅड फिल्म मेकिंग

दिनांक : ७ डिसेंबर, वेळ १०.३० ते १.३० वाजेपर्यत

मार्गदर्शक :  सॅविन तुस्कानो

दिनांक : ७ डिसेंबर, वेळ ८  ते ९ वाजेपर्यत

डॉ. अरुण गद्रे यांच्या ‘एक एम आर की मौत’ कि या फिल्मचे सादरीकरण आणि चर्चा

या फिल्मचे आहे सादरीकरण

पहिले सत्र सकाळी १० ते  दुपारी १

आलम, सेल्फी, द सिटी ऑफ हनी, 15.7 किमी, रिबेल्स ऑफ भागपथ, महिला सभा, सरपंच पती थांबनार कधी, ओके सर्टिफिकेट, अ न्यू वर्ल्ड, कीप ट्राइंग, इकोज,

सत्र दुसरे दुपारी २ ते ४:३०  

वुमन इन मेन्स वल्ड, लिक्विड ट्राईट्स ऑफ अन इमेज अप्रत्युस , एक चमच सपने, द अन संग, ट्रॅव्हल हॉलिक, होरपळ, उडणे डो, प्रोग्रेशन,

सत्र तिसरे संध्याकाळी ५ ते ८

सारी, वीन & लॉस, चेक मेट, अनफिट, खुली आखे, रेशन आमच्या हक्काचे, व्हील्ड विंगस, शेडलेस, गिफ्ट, अर्ली स्प्रिंग

नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी