Saturday, June 20, 2026
Home Blog Page 13467

जि. प. त अनुकंपा तत्त्वावर 62 जणांना नियुक्तीपत्र

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अंतर्गत शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्यासाठी जिल्हा परिषदेत मंगळवारी (दि.3) झालेल्या पडताळणीनंतर 62 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्तीपत्र देण्यात आली.

जिल्हा परिषदेत 2015 मध्ये अनुकंपा तत्त्वावर भरती झाल्यानंतर चार वर्षांपासून रिक्त झालेल्या जागा अनुकंपा तत्त्वावर भराव्यात यासाठी 296 उमेदवार इच्छुक होते. जिल्हा परिषदेने त्यांची भरती करण्याचा निर्णय करण्यासाठी त्यांच्याकडून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज मागवले. त्यानुसार त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती. यापूर्वी देखील या उमेदवारांना वेळीवेळी कागदपत्रे छाननीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, कधी मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर कधी बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे या बैठका झाल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलवले खरे. मात्र, याच दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने शासनाकडे अनुकंप नियुक्तीच्या अनुषगांने परिचर नियुक्ती संदर्भात मागविण्यात आलेले मार्गदर्शन पत्र प्राप्त झाले. या पत्रात सद्यस्थितीत सर्व जिल्हा परिषदेकडील 2019 मधील पदभरती मध्ये वर्ग-4 ची पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पदभरतीत समावेश नसलेली पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राह्य धरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच ज्येष्ठता सुची तयार करून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले.

याचाच अर्थ परिचरांना अनुकंपा नियुक्ती प्रक्रीयेत नियुक्ती देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते. यावर जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविले असता, त्यावर शासनाने रिक्त जागांच्या 20 टक्के गट क व ड मधून सर्व पदे भरावीत, असा आदेश काढला. पात्र उमेदवारांना मंगळवारी कागदपत्र तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, महेंद्र पवार, रणजीत पगारे, मंगेश केदारे, किशोर पवार, प्रमोद ढोले, शिवराम बोटे उपस्थित होते.

पदनिहाय नियुक्ती
विस्तार अधिकारी-1
वरिष्ठ सहायक-1
परिचर-18
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-1
आरोग्य सेवक-23
स्थापत्य सहायक-4
शिक्षण सेवक-4
अंगणवाडी पर्यवेक्षिका-1
कंत्राटी ग्रामसेवक-7
पशुधन पर्यवेक्षक-2
एकूण-62

निवृत्तीनाथ संस्थान जमीन विक्रीला स्थगिती द्यावी; विश्वस्तांचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या जमीनींची विक्री केली जाऊ नये, अशी मागणी निवृत्तीनाथ संस्थान विश्वस्तांनी केली आहे. सोमवारी (दि.2) याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. या प्रकरणी डोईफोडे यांनी प्रातंधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील गट नं. 354 ही जमीन जुन्या दस्तऐवजावरील नोंद बघता इनामी जमिन आहे. ही जमिन निवृत्तीनाथ महाराज मंदिरासाठी असल्याची कागदोपत्री स्पष्ट नोंद आहे. याबाबत देवस्थानच्या पाच विश्वस्तांनी या जमीनीच्या खरेदी-विक्रीबाबत तत्काळ मनाई हुकूम काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी प्राताधिकार्‍यंना या संदर्भात खरेदी विक्रीच्या व्यवहार स्थगीत करण्याच्या सूचना दिल्याचे विश्वस्तांनी सांगितले.

संस्थांनेचे विश्वस्त त्र्यंबक गायकवाड, ललिता शिंदे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लोंढे, पंडित कोल्हे, रामभाऊ मुळाणे यांनी निवेदन देताना गाव नमुना नं. 3 च्या 1 ते 20 नक्कलीनुसार नोंद वहीतील अनुक्रमांक 14 व 19 अन्वये गट नं. 354 हा देवस्थान इनाम असलेले कागदपत्रे दिली आहेत. तत्कालीन तहसीलदार कार्यालयाने इनाम रद्द करून भोगवटदार 1 नोंद केल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच या जमीनीवरी इनाम रद्द करण्याच्या कारवाईची चौकशी करून संबधित जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांना मनाई हूकुम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोणीत श्रीरामपूर येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी चार आरोपी शिरूर, येवल्यातून अटकेत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लोणी (वार्ताहर)- रविवारी लोणीत गोळीबार करून श्रीरामपूर येथील तरुणाची हत्या करून पसार झालेल्या सातपैकी चार आरोपींना येवला व शिरूर येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

रविवार दि. 1 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील हॉटेल साईछत्रमध्ये श्रीरामपूर येथील फरदिन अबू कुरेशी या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सातही आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर व नाशिक जिल्ह्यातील येवला येथून चार आरोपी जेरबंद करण्यात त्यांना यश आले. संतोष सुरेश कांबळे, सिराज आयुब शेख, शाहरुख शहा पठाण हे श्रीरामपूर येथील तर अरुण चौधरी हा लोणी येथील आरोपी गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत पकडले. उर्वरित उमेश नागरे, अक्षय बनसोड व शुभम कदम या लोणीतील तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

आरोपींना जेरबंद करणार्‍या पथकात पो. हे. काँ. दत्ता हिंगडे, मनोहर गोसावी, अण्णा पवार, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, विजय वेठेकर, संदीप घोडके, संतोष लोढे, संदीप दरंदले, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, मयूर गायकवाड, बबन बेरड आदींचा समावेश होता.सर्व आरोपी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पकडलेल्या आरोपीपैकी सिराज शेख याच्यावर श्रीरामपूर, अहमदनगर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. संतोष कांबळे याच्याविरुद्ध ठाणे, पुणे, जेजुरी, राहुरी, संगमनेर येथे सात गुन्हे दाखल आहेत. तर शाहरुख शहा याच्याविरुद्ध पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत.

जिल्ह्यातील सोसायट्यांच्या थकीत कर्जांची माहिती शासनाने मागवली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सरसकट कर्जमाफी तसेच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांंना आणखी मदत देण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठका घेत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्राथमिक सहकारी सोसायट्यांकडील 1 ऑक्टोबर 2019 व 31 ऑक्टोबर 2019 अखेरची अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदत कर्जाची येणेबाकी तसेच व्याजाची माहिती त्वरीत शासनाने मागविली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेकडून सर्व तालुका विकास अधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे.

ही माहिती 10 डिसेंबर 2019 पूर्वी मुख्य कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही माहिती शासनास अत्यंत तातडीने द्यावयाची असल्याने ती प्राधान्याने द्यावी असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा बँकेचे 1500  कोटींचे कर्ज थकीत

वसुली 39 टक्क्यांवर अडकली, शेतकर्‍यांच्या नजरा संपूर्ण कर्जमाफीकडे

गेल्यावर्षी दुष्काळ आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमुळे जिल्हा बँकेच्या वसुलीला खीळ बसली होती. यंदा देखील ती परिस्थिती कायम आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या 2 लाख 32 हजार सभासद शेतकर्‍यांना 732 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे. मात्र, त्यानंतर देखील जिल्हा बँकेची 1500 कोटी रुपयांची थकबाकी असून आता शेतकर्‍यांच्या नजरा या संपूर्ण कर्जमाफीकडे असल्याने त्याचा परिणाम बँकेच्या वसुलीवर झाल्याचे सांगण्यात आले.

सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफी योजनेचा लाभ थकीत कर्जानूसार देण्यात येतो. गेल्यावर्षी जिल्हा बँकेच्यावतीने 1 हजार 11 कोटी रुपयांचे खरीप तर 41 कोटी रुपयांचे रब्बी कर्ज वाटप करण्यात आले होते. यापैकी दीड लाख, प्रोत्साहनपर आणि दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर तसेच नियमित कर्जाची रक्कम भरल्यानंतर बँकेची विद्यमान परिस्थितीत 1500 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची माहिती बँक प्रशासनाने दिली.

मार्च 2019 अखेर बँकेच्या एकूण कर्जाच्या 37 टक्के वसूली झालेली होती. त्यात नोव्हेंबरअखेर अवघी 2 टक्के वाढ झाली असून वसूलीची टक्केवारी 39 टक्क्यांवर अडकलेली आहे. आता राज्यात अस्तित्वात आलेल्या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्यासोबतच संपूर्ण कर्जमाफीची करण्याचा विचार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता शेतकर्‍यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे लागला आहे. सरकार कर्जमाफीबाबत काय निर्णय घेणार यावर जिल्हा बँकेच्या वसूलीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

साखर कारखानदारीला 2800 कोटींचे कर्ज
जिल्हा बँकेने साखर कारखानदारीला सुमारे 2 हजार 800कोटी रुपयांचे कर्ज दिलेले असून ही साखर गाळप कमी-जास्त झालेले तरी त्याचा या कर्जावर परिणाम होणार नसल्याचा विश्‍वास जिल्हा बँकेला आहे. कारखान्यांच्या साखरेवर बँकेचे नियंत्रण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

2 लाख 46 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अवकाळी पाऊसग्रस्त : शेतकर्‍यांसह प्रशासन दुसर्‍या हप्त्याच्या प्रतीक्षेत

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 135 कोटीच्या रक्कमेचा पहिला हप्ता पाठविण्यात आला होता. या रक्कमेपैकी जवळपास 100 टक्के रक्कम 2 लाख 45 हजार 547 रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान, मदतीचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग झाला असून आता शेतकर्‍यांसह जिल्हा प्रशासनाच्या नजरा सरकारकडून पाठविण्यात येणार्‍या दुसर्‍या आणि तिसर्‍या हप्त्याकडे आहेत. मदतीचा दुसरा हप्ता सोमवारीच येणार असल्याचे संकेत प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, आता कशामुळे मदतीची प्रक्रिया लांबली हे कोणालाच सांगता येत नसल्याचे चित्र आहे.

नगरसह राज्यात सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नगर जिल्ह्यात 4 लाख 54 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांचे 449 कोटी रुपयांच्या नुकसानीचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारने या नुकसान भरपाईपोटी 135 कोटी रुपयांचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. या भरपाईच्या रक्कमेची जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या सुचनेनूसार मराठी अद्य अक्षरांप्रमाणे महसूल मंडल, गावे आणि शेतकर्‍यांच्या नावानुसार वर्गीकरण करून पहिल्या टप्प्यातील भरपाईची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.

सरकारने जिरायत आणि बागायत भागातील पिकांसाठी सरकट 8 हजार रुपये आणि फळबागांना 18 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मदतीची रक्कम जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याचे तहसीलदार यांनी आधी सरकट जिरायत आणि बागायत भागातील शेतकरी यांची निवड करून त्यांना भरपाई दिलेली आहे. यामुळे या तालुक्यातील फळबागा असणार्‍या शेतकर्‍यांना अद्याप मदत मिळालेली नाही. पुढील टप्प्यात या शेतकर्‍यांना मदती देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मदत मिळालेले शेतकरी
नगर 17 हजार 654, अकोले 19 हजार 447, जामखेड 4 हजार 841, कर्जत 13 हजार 393, कोपरगाव 13 हजार 683, नेवासा 23 हजार 724, पारनेर 23 हजार 622, पाथर्डी 33 हजार 987, राहुरी 14 हजार 291, संगमनेर 24 हजार 498, शेवगाव 19 हजार 972, श्रीगोंदा 15 हजार 213, श्रीरामपूर 11 हजार 925 आणि राहाता 9 हजार 306 यांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव/यावल – 

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या किनगाव येथील विवाहितेचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास निधन झाले.

या महिलेची शस्त्रक्रिया किनगाव ग्रामीण रुग्णालयात झाली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे.

गिरीश माधवराव पाटील (रा. किनगाव, ता. यावल) हे टेलरिंगचे काम करतात. त्यांची पत्नी सुनीता गिरीश पाटील (वय 32) व दोन अपत्य भूमिका आणि कुणाल असा त्यांचा परिवार आहे.

गिरीश पाटील यांनी सुनीता यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियासाठी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 23 नोव्हेंबर रोजी दाखल केले होते. शस्त्रक्रिया देखील त्याच दिवशी झाली.

सात दिवसांनंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे या महिलेस जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात 30 नोव्हेंबर रोजी दाखल केले. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शस्त्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे जखम भरली नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला.

यावल पोलिसात नोंद

किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी ही शस्त्रक्रिया केली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती गिरीश पाटील यांच्यासह नातेवाईकांनी केला आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

कोल्हार येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार येथील बेलापूर रोडवरील लोकवस्तीत एकाच रात्रीत तब्बल सात घरे चार अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन पलायन केले. सदर घटना रात्री दीड ते साडेतीनच्या दरम्यान घडली.

कोल्हार बुद्रुक येथे बेलापूर रोडवरील राऊत वस्तीवर चोरट्यांनी प्रथम लक्ष्य साधले. मात्र येथे रेखा राऊत व मोहिनी राऊत यांची चोरट्यांशी नजरानजर झाल्याने तेथून चोरट्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर चोरट्यांनी संजय बांगरे यांच्या घरातून रोख रक्कम व सोने असा ऐवज चोरून श्रीगणेशा केला. त्यानंतर चोरटे बेलापूर रोडवरील लोकवस्तीमध्ये घुसले. येथे प्रथम वैशाली रवींद्र गाडेकर यांच्या घराचे कुलूप बाहेरून तोडून सामानाची उचकापाचक केली. मात्र चोरट्यांचा हाती येथे काही लागले नाही. त्यानंतर राहुल बंग, राजस्थानी चौधरी, छाया वाघमारे, येथे चोरटे गेले मात्र येथे चोरीचा प्रयत्न फसला.

त्यानंतर चोरट्यांनी गोविंद नथुलाल शर्मा यांचे घर फोडले येथे मात्र चोरट्यांचे नशीब फळफळले. येथे तब्बल दीड लाखांची रोख रक्कम चोरट्यांना मिळाली. तसेच संजय बांगरे यांच्याकडेही रोख रक्कम व ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. सात घरांत मिळून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे प्रथमदर्शनी समजते.

घटनेनंतर लोणीचे सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली. त्या नंतर नगरहून श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान पथक पुढे काही अंतरावर घुटमळले. चोरी करणारे चार इसम असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अवघ्या चार दिवसांपूर्वी लकी ट्रेडर्स हे पोलीस स्टेशन लगतचे दुकान चोरट्यांनी फोडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला होता. त्यानंतर एकाच वेळेस चोरट्यांनी भर लोकवस्तीत सात घरे फोडली. मात्र वारंवार होणार्‍या या चोरीच्या पर्शवभूमीवर लोणी पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिल्याचे समोर येत आहे.

भेंडा-कुकाणा परिसरातील 13 खासगी पशुवैद्यकांना जनावरांच्या ‘ब्रुसेलॉसीस’ची बाधा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सर्वांवर पुण्यात उपचार सुरू; संसर्गामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकांसह पशुपालकही धास्तावले

नेवासा- जनावरांच्या सतत संपर्कात असणारे शेतकरी, गोठ्यात काम करणारे महिला-कामगार आणि जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक हे बाधित जनावरांमधील ब्रुसेलॉसिस आजाराच्या जिवाणूला बळी पडत असून नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरातील खासगी सेवा देणार्‍या 16 पैकी 13 पशुवैद्यांना ब्रुसेलॉसीस आजाराची बाधा झाल्याचे पुणे येथील तपासणीत निष्पन्न झाले असून हे सर्व पशुवैद्यकीय डॉक्टर पुणे येथे उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या रोगाच्या संसर्गाच्या भीतीने पशुवैद्य व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांसह पशुपालकही धास्तावले आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यात 97 पशुधन विकास अधिकारी, 39 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, 141 पशुधन पर्यवेक्षक, 37 व्रणोपाचारक/ड्रेसर व 255 परिचर असे एकूण 569 पशुवैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय जिल्ह्यात हजारो पशुधन पालक, खाजगी पशुवैद्य यांचाही सातत्याने जनावरांशी संपर्क येतो. या सर्वांनाच ब्रुसेलॉसिसचा कमी अधिक प्रमाणात संसर्ग होण्याची भीती आहे.

काय आहे ब्रुसेलॉसिस?
ब्रुसेलॉसिस आजार हा जनावरांच्या सांसर्गिक गर्भपातातून ब्रुसेला अबॉर्टस जिवाणूमुळे होतो.प्रत्यक्ष जनावरांच्या सानिध्यात काम करणारे,उपचार करणारे पशुवैद्य व वैद्यकीय कर्मचारी,गोठ्यात काम करणारे शेतकरी-कर्मचारी,महिला या व्यक्तींना आजाराचे संक्रमण होण्याचा जास्त धोका असतो. वासरू पूर्ण वाढ झाल्यानंतर, गाभणपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जर सारखा सारखा गर्भपात होत असेल तर ते जनावर ब्रुसेलॉसिसने बाधित असू शकते.

संक्रमण- आजाराचा प्रसार हा संक्रमित प्राण्याच्या सानिध्यात आल्यास काही वेळा श्वसनाव्दारे हवेमध्ये असणारे जिवाणू शरिरामध्ये गेल्याने, त्वचेला संक्रमण झाल्याने, संक्रमित प्राण्यांचा संपर्क त्वचेला झालेल्या जखमेला झाल्यास या आजाराचा प्रसार होतो. तसेच गर्भपात झालेल्या जारातील पाणी किंवा रक्तमिश्रित पाणी यामुळे रोगाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते.

ब्रुसेलॉसिसची लक्षणे – पाठदुखी, भूक मंदावणे, थंडी येणे, सुस्ती येणे, प्रचंड डोकेदुखी, पोटात आणि पोटाचे आजुबाजूने दुखणे, सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ-उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, नैराश्य येते. स्नायू व शारीरिक वेदना, एन्सेफलाइटिस,एंडोकार्डिटिस मेनिनजाइटिसचाही धोका निर्माण होऊ शकतो.

उपाययोजना- गायी-म्हैस यांची गर्भपात झालेली जागा व संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. गर्भपात झालेली जागा जाळावी. जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी. गोठ्यात जनावरे बदलतांना किंवा नवीन मागवताना विशेष काळजी घ्यावी. संक्रमण झालेले प्लासेंटा (नाळ) व गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.शेतकरी-गोठ्यात काम करणारे कर्मचारी व प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर) तसेच सतत प्राण्यांच्या संपर्कात असणार्‍या लोकांनी विशेष काळजी.

ब्रुसेलॉसिस हा एक असा संसर्गजन्य आजार आहे की जो बॅक्टेरियाच्या समूहामुळे होतो.
घ्यावयाची काळजी – ब्रुसेलॉसिस या बैक्टीरिया विशेषतः जनावरे आणि माणसं दोघांनाही संक्रमित करते. ब्रुसेलॉसिसला प्रतीबंध करण्यासाठी पशु-जनावरे यांचे सोबत काम करताना हँडग्लोज, मास्क, चष्मा व सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पातळीवर 27.5 टक्के लोक प्रभावित…

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरियाणा यांनी अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेनुसार राष्ट्रीय पातळीवर पशुपालन आणि डेअरी व्यवसाय करणारे माणसं, पशुवैद्यकीय कर्मचारी यातील सुमारे 27.5 टक्के पशुवैद्य आणि 5.1 टक्के पशुधन पालक या ब्रुसेलोसिसने प्रभावीत आहेत.

शासनाने तरतूद करावी-डॉ.तुंबारे
जनावरांना ब्रुसेलॉसिस होऊ नये यासाठी लस उपलब्ध आहे परंतु माणसांसाठी लस नाही. फक्त काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे कॅम्प घेऊन पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी (टेस्ट) केली होती. यासाठी शासनाकडून कुठल्याच निधीची तरतूद नाही. त्यामुळे हा सर्व खर्च कर्मचार्‍यांच्या वर्गणी तून करण्यात आला होता.किमान वर्षांतून एकदा सर्व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी करण्यासाठी निधीची तरतूद करावी.निधीची तरतूद करण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दरम्यान नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात खाजगी सेवा देणार्‍या 16 पशुवैद्यांनी स्वतःची ब्रुसेलॉसिसची पुणे येथे तपासणी (टेस्ट) केली असता 16 पैकी 13 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून ते पुणे येथे खाजगी डॉक्टरकडून उपचार घेत आहेत.

30 ते 40 टक्के पशुवैद्य-पशुपालक बाधित…
सातत्याने जनावरांच्या संपर्कात येणारे 30 ते 40 टक्के पशु वैद्यकीय डॉक्टर आणि शेतकरी, महिला या ब्रुसेलोसिस आजाराने बाधीत असतातच.परंतु जोपर्यंत शरिरात प्रतिकारशक्ती आहे तोपर्यंत या रोगाचा संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. लक्षणे दिसू लागल्यावरच ते समजते. ताप येतच असतो असे समजून सहज घेतलं जातं. परंतु सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसू लागल्यावर समजते की ब्रुसेलॉसिसचा प्रकार आहे. दवाखान्यात सर्व तपासण्या करण्यासाठी एक दीड महिन्याचा कालावधीही लागतो. निदान झाल्यावर पूर्ण बरे व्हायला मला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला.
– डॉ. मनोज शिंदे, पशुधन विकास अधिकारी, जोहारापूर

लसीकरण करून घ्यावे..
पशुधन पालकांनी 4 ते 12 महिने वयाच्या सर्व वासरांना (विशेषतः मादी वासरे) लसीकरण करून घ्यावे.अशा वासरांना एकदा लसीकरण केल्यास त्याचा त्याला आयुष्यभर लाभ होतो. गायींपेक्षा म्हैस वर्ग पशुधन पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
-डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहमदनगर

जिल्हा परिषद सभेत आवाज उठविणार
नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.त्यामुळे जनावरे आणि जनावरांच्या संपर्कात येणारे पशुधन पालक, पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ब्रुसेलॉसिस या आजाराची तपासणी करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद जनरल बॉडी मिटिंगमध्ये मी आवाज उठविणार आहे.
– दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य

साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात नंबर वन असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांची साईबाबा संस्थान एम्प्लॉइज को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे सचिव नबाजी डांगे याच्याकडे सुपूर्द केले आहे. नूतन अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान साईबाबा संस्थान एम्लॉईज सोसायटीच्या अध्यक्षपदी तुषार शेळके तसेच उपाध्यक्षपदी दीपक धुमसे यांची मागील वर्षी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचा एक वर्षाचा कालावधी 22 ऑक्टोबर 2019 रोजी संपला आहे. विद्यमान संचालक मंडळाची बैठक येत्या 10 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विषय क्रमांक 7 व 8 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे स्वीकारण्याबाबत सभेपुढील विषय असल्याने नूतन अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते तसेच पुढील घडामोडी काय घडतात याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान 75 कोटींच्या आसपास ठेवी असलेल्या व वर्षाला साधारणपणे चार कोटी रुपये नफा मिळवणारी जिल्ह्यातील अग्रगण्य ठरणारी एकमेव सोसायटी म्हणून नावारूपास आली आहे. नवीन अध्यक्षपदासाठी विद्यमान संचालक यादवराव कोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत शेळके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळात संस्थानचे अधिकारी व सहकारी संस्थेचे सहा. निबंधक जितेंद्र शेळके यांनी सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

माझा कार्यकाळ संपला असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून वर्षभरातील कामकाजाबाबत मी अत्यंत समाधानी आहे. मला आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेली जबाबदारी निर्विवादपणे पार पाडली आहे. त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.
– तुषार शेळके, अध्यक्ष, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

राहाता तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना सर्वसामान्य कर्मचार्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या सूचना व निर्णय मला मान्य राहतील.
-यादवराव कोते संचालक, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

गुलाबवाडी होणार ‘गुलाबी गाव’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चंद्रकांत विचवे,रावेर ।

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावाला गुलाबी गाव अशी ओळख जितेंद्र गवळी या शिक्षकाने करून दिली. आता रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्याचा विडा उचलला आहे.

500 लोकसंख्या आणि 170 घरे असलेल्या या गावात 25 डिसेंबरपर्यंत संपूर्ण घरांना गुलाबी रंग लावून महिला सक्षमीकरण गजर केला जाणार आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथील जितेंद्र गवळी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात कार्यरत असताना भिंतघर गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्यासाठी पुढाकार घेतला. आता त्यांनी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ गाव करण्यासाठी संकल्प केला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून या गावात हे शिक्षक शाळा सुटल्यावर जाऊन गावकर्‍यांच्या गाठी भेटी घेतात. सर्वच गावकर्‍यांकडून त्यांच्या या संकल्पनेला होकर मिळत आहे.

प्रत्येक कुटुंबांकडून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी जमा करून गावाला रंगरंगोटी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ओला सुका कचरा संकलित करणे, रस्त्यावर सडा-रांगोळी घालून रस्ते सुशोभित करणे, गुरांच्या गोठ्यात स्वच्छता राखणे, मुलांचे गणवेश, त्यांना नीट नेटके ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन, भिंतीवर प्रबोधन करतील अशा सुरेख म्हणी, नागरिकांना वृक्ष तोडीपासून परावृत्त करणे, प्लास्टिक बंदी, गलुल बंदी, हुंडाबंदी यासारख्या सामाजिक प्रथांना रोखण्यासाठी गावकर्‍यांना संघटीत केले जात आहे. यासाठी गावकर्‍यांची आदर्श ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमावर ऊहापोह केला जातो.

चार महिन्यांपूर्वी जितेंद्र गवळी आले तेव्हा नागरिकांना अनुत्साह होता. यापूर्वी गावातील जवळपास 10 जण किडनीच्या आजाराने दगावले असल्याने नागरिक हताश झाले होते.

त्यांना या संकल्पना आणि उपक्रमात काही रस नव्हता. मात्र गवळी यांनी हार न मानता गावकर्‍यांच्या भावनांना साद घालून सर्वांची मते परिवर्तीत केले. नागरिकांना गावात पडणार्‍या पावसांची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक लावण्यास उद्युक्त केले.

आता गावाला रंग-रंगोटी सुरू आहे. 25 डिसेंबर रोजी ब्रह्मलीन प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या पुण्यतिथीपासून गावाला ‘पिंक व्हिलेज’ म्हणून ओळखले जाणार असल्याचा विश्वास जितेंद्र गवळी यांना आहे.