नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. मे २०२३ पासून सुरू असलेल्या मैतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. ते इंफाळ आणि चुराचांदपूर येथे दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित करणार आहेत. तसेच बैराबी-सैरंग रेल्वे मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील… त्याचबरोबर, पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा राज्याचा आठवा दौरा आहे.
ईशान्येकडील मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या पहिल्याच दौऱ्यावर येत आहेत. मोदी सरकारने ४ सप्टेंबर रोजी कुकी अतिरेकी गटांसोबत युद्धबंदी करारावर स्वाक्षरी करून प्रथम मोठे यश मिळवले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मणिपूरला भेट देतील आणि राज्याला विकासाची भेट देतील.
पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये ८,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण करतील. पंतप्रधान मोदी कुकी समुदायाचे वर्चस्व असलेल्या चुराचांदपूरमध्ये ७,३०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाची पायाभरणी करतील. त्याच वेळी, पंतप्रधान मोदी मेईतेईचे वर्चस्व असलेल्या इम्फाळमध्ये १,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करतील. अशाप्रकारे, पंतप्रधान मोदींनी कुकी आणि मेईतेई दोन्ही समुदायांच्या क्षेत्रात विकासाची पायाभरणी करून मणिपूरमध्ये शांततेची नवी पहाट आणण्याची योजना आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे भेट देणार आहेत, इम्फाळऐवजी प्रथम चुराचांदपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीमागे हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिक समुदायांशी संवाद साधणे हा उद्देश आहे. तप्रधानांचा दौरा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे. यावेळी ते स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार असून, विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांवर भर देणार आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





