Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Mann Ki Baat मधून 'या' मुद्द्यांवर केले भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Mann Ki Baat मधून ‘या’ मुद्द्यांवर केले भाष्य

दिल्ली l Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केलं.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार) ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी ‘मन की बात’ मधून देशातील जनतेशी संवाद साधत असतात. यावेळी मोदींनी जलसंधारण, राष्ट्रीय विज्ञान दिवस यावर भाष्य केले.

आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमण यांच्याही कार्याचे स्मरण केले. रमण यांनी ‘रमण इफेक्ट’चा शोध लावला. म्हणून त्यांच्या या शोधासाठी आजचा दिवस समर्पित करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांचा इतिहास तरुणांनी जरुर वाचावा, असे आवाहनही मोदींनी केले.

तसंच जलशक्ती मंत्रालयाकडून ‘Catch the Rain’ हे नवे अभियान सुरु करण्यात येणार असून जलसंधारणाबाबत नागरिकांनी अधिक जागरुक असणे गरजेचे आहे, जलसंधारणाबाबत आपण आपली भूमिका आणि कर्तव्ये जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.. या महिन्याच्या २२ मार्च रोजी राष्ट्रीय जल दिवस साजरा केला जाणार आहे. ‘Catch the Rain, where it falls, when it falls’ असे अभियानाचे घोषवाक्य आहे. जलसंधारण व्यवस्थापनेमुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ११२ विविध प्रजातीच्या पक्षांचे दर्शन घडते, असे मोदींनी सांगितले.

त्याचबरोबर देशाच्या विविध भागातील व्यक्तींच्या प्रेरणादायी गोष्टीही जनतेसोबत शेअर केल्या. ओडिसा मधील अरखुदा येथील सिलू नायक हे एका नवीन मिशनवर आहेत. सुरक्षा दलामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांना हे मोफत प्रशिक्षण देतात. भारतातील सुरक्षा दलातील कित्येक जवानांना त्यांनी ट्रेनिंग दिले आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत भारतावर देखील भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, आत्मनिर्भतेची पहिली अट असते आपल्या देशाच्या वस्तूंबाबत अभिमान बाळगणे. ज्यावेळी प्रत्येक देशवासियाला असा अभिमान वाटेल त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडले जातील आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या