मुंबई | Mumbai
जानेवारी महिन्यात पाऊस अनुभवल्यानंतर आता राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.
हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार, २२ ते २८ जानेवारी आणि २९ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारतात कोरडे वातावरण असेल. तर त्याचवेळी उत्तर आणि दक्षिणेकडील भागांत काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होईल. ५ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकणामध्ये पावसाळी वातावरण अधिक प्रमाणात जाणवेल.
१२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रात इतर ठिकाणी देखील पावसाळी वातावरण पाहायला मिळेल. अशी प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक के, एस, होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान, याबद्दलची खात्रीशीर माहिती जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात मिळू शकेल, हे देखील त्यांनी स्पष्ट केले.