Wednesday, January 7, 2026
HomeUncategorizedSanjay Raut : हा मोदी, शहांचा तिसरा चोरबाजार; शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर राऊतांची...

Sanjay Raut : हा मोदी, शहांचा तिसरा चोरबाजार; शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर राऊतांची खोचक टीका

मुंबई । Mumbai

यंदाच्या दसरा सणापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पाच वेगवेगळ्या ‘दसरा मेळाव्यां’ची जोरदार चर्चा रंगली आहे. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवतीर्थावरील मेळावा, शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचा नेस्को येथील मेळावा, मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगावमधील मेळावा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) नागपूर येथील मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा भगवानगडावरील शक्तीप्रदर्शन मेळावा यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मात्र, याच मेळाव्यांच्या गर्दीतून शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर आज अत्यंत घणाघाती टीका करत निशाणा साधला आहे. बुधवारी (१ ऑक्टोबर) प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या मेळाव्याला थेट ‘चोरबाजार’ असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणातील दसरा मेळाव्याची चर्चा अधिकच तापली आहे.

YouTube video player

खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले की, दसऱ्याला महाराष्ट्रात केवळ दोनच मेळावे राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे मानले जातात. राऊत म्हणाले, “दसरा मेळाव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा असे दोनच मेळावे महत्त्वाचे आहेत. इतर मेळाव्याला तुम्ही दसरा मेळावा म्हणत असाल, तर हा तुमचा प्रश्न आहे.” या दोन मेळाव्यांमधून देशाच्या राजकारणाची आणि हिंदुत्वाची नेमकी भूमिका काय असेल, हे पाहण्यासाठी देशातील जनतेचे कायम लक्ष लागलेले असते, असेही राऊत यांनी नमूद केले.

शिंदे गटाच्या मेळाव्यावर थेट हल्ला करताना राऊत म्हणाले, “चोरबाजारात खूप माल विकायला असतो. मुंबईत आणि दिल्लीत हा चोरबाजार आहेच, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांचा तिसरा बाजार काढला आहे.” या ‘चोरबाजारात’ चोरीचा माल असलेल्या वस्तू विकायला ठेवल्या आहेत, अशी उपरोधिक टीका राऊत यांनी केली. ते पुढे म्हणाले, “जनता त्यांना (शिंदे गट) शिवसेना मानत नाही. निवडणूक आयोग, मोदी आणि शाह यांना सोडले तर त्यांना कोणीही शिवसेना मानत नाही. प्रचंड पैशांचा वापर करून लोकं आणली जातात आणि ‘आमचा मेळावा’ असे ते म्हणतात,” असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला.

शिंदे गटाला आव्हान देत राऊत यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विचारले, “अरे तुम्ही कोण? तुम्ही शिवसेना कधी स्थापन केली? तुम्ही महाराष्ट्राला काय विचार दिला? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, तेव्हा तुम्ही कुठे होता? कुठल्या गोधडीत मुतत होता?”. जर कोणाला वाटत असेल की, ‘आम्ही शिवसेनेची स्थापना केली’, तर त्यांनी जन्माचे दाखले घेऊन यावेत, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

अखेरीस त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “एक आरएसएसचा आणि दुसरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा (उद्धव ठाकरेंचा) होणारा मेळावा हे सोडले, तर बाकीचे मेळावे होत असतात,” अशी घणाघाती टीका करून राऊत यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे महत्त्व राजकीय पटलावर कमी करण्याचा प्रयत्न केला. राऊतांच्या या विधानांनी आता दसरा मेळाव्याच्या राजकारणाला नवी धार चढली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...