Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत आजपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी, काय आहे कारण?

मुंबईत आजपासून १५ दिवसांसाठी जमावबंदी, काय आहे कारण?

मुंबई | Mumbai

मुंबईत (Mumbai) पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी (Prohibition) ३ डिसेंबर ते १७ डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत लागू असेल.

- Advertisement -

शहरात शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हे जमावबंदीचे आदेश आहेत. मुंबई शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाई आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार शहरात ४ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीतही संपूर्ण शस्त्रबंदी लागू राहणार आहे. यासोबतच लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावरही बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या