नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर जिल्ह्यातील (Kanker District) कोरार गावाजवळ (Korar village) शालेय विद्यार्थ्यांना (Students) घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत; ‘हे’ आहे कारण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाळा संपल्यानंतर १२ मुले ऑटोने आपल्या घरी जात होती. त्यावेळी कोरेरजवळ भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ऑटोचे पार्ट उडून गेले. तसेच या धडकेत ५ मुलांचा जागीच मृत्यू झाला असून ७ मुले जखमी (injured) झाली आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
काँग्रेसकडून पटोलेंना ‘ना-ना’?
दरम्यान, या घटनेत ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी (Treatment) कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी दुःख व्यक्त करत प्रशासनाकडून जखमींना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे म्हटले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल