Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमCrime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना पकडले

Crime News : शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्र चोरी प्रकरणी तिघांना पकडले

साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त || स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील पिंप्रीलौकी फाटा शिबलापूर (Shilapur) येथील कृषी सेवा केंद्राच्या (Agricultural Service Centre Theft) गुन्ह्यातील 3 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 8 लाख 57 हजार 392 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

- Advertisement -

पिंप्रीलौकी येथल संदीप पोपट गिते हे 15 मे रोजी त्यांचे कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Centre Theft) बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून त्यामधील माल चोरुन नेला होता. याबाबत आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रमोद जाधव, मयूर गायकवाड, प्रशांत राठोड व महादेव भांड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देत रवाना केले.

YouTube video player

सदर पथकाने बुधवारी (दि.21) गुन्ह्याचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तीन इसम हे त्यांच्याकडील पिकअप गाडीमधून (क्र.एमएच.21, बीएच.5443) अहिल्यानगर (Ahilyanagar) ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जाणार्‍या रस्त्यालगत आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ शेतीचे औषधे संशयास्पद विकत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने गणेश विठ्ठल आव्हाड (वय 23, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, अहिल्यानगर), राज संदीप गायकवाड (वय 24, रा. विळद, ता. अहिल्यानगर), आदित्य संतोष इंगोले (वय 23, रा. गजानन कॉलनी, वडगाव गुप्ता, ता. अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले.

तसेच पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीचे औषधे व रसायन मिळून आले. तसेच गुन्ह्याची कबुली देत पंचासमक्ष 8 लाख 57 हजार 392 रुपये किमतीचे कीटकनाशक, औषधे व मोबाईल असा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

 

 

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...