जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
भाजपच्या महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दि.26 फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेत सत्कार केला होता.
चांगल्या कामाचे कौतूक करणे हे आमच्या वरिष्ठांकडून शिकत आलो आहे. महापौरांनी चांगले काम केले म्हणून त्यांचे मी कौतूक केले. महापालिकेत शिवसेना विरोधीपक्षाचे काम चोख बजावित असून मी देखील भाजपला कामय विरोध करत आलो आहे. अजून ठाम पणे भाजपच्या विरोधात मी राहील. मी सत्कार केला म्हणून भाजपच्या जवळीक आहे असे काही नाही.चांगल्याला चांगले म्हणने ही भूमिका आधीपासूनच माझी राहिली आहे.
बंटी जोशी, नगरसेवक, शिवसेना
मनपात शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. बंटी जोशी हे अडीच वर्ष गटनेते राहिले आहेत. दुसर्यांना संधी मिळाली पाहिजे ही आधीपासूनच पक्षाची भूमिका राहिली आहे.त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे. आम्ही मनपात विरोधी पक्षात आहोत.आमच्यात कुठलिही अंतर्गत गटबाजी नाही.
नितीन लढ्ढा, शिवसेना नेते
या प्रकरणी शिवसनेच्या वरिष्ठांना न सांगता सत्कार केल्याबद्दल शिवसेना संर्पक प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत गटनेते बंटी जोशी यांनी वरिष्ठांना मी केलेल्या सत्कार चुकीचा वाटत असेल तर माझी चुक मान्य करतो.
असे स्पष्टीकरण देवून त्यांनी मनपा शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
भाजप महापौर भारती सोनवणे यांचा पदाचा कार्यकाळ संपत असल्याने शनिवारी त्यांची शेवटची महासभा होती.
त्यांनी कोरोनाच्या काळात व त्यांच्या सव्वा वर्षाच्या कार्यकाळात शहराच्या विकास कामांसाठी निधी, रखडलेले कामांना गती आदी चांगले काम केल्याबद्दल शिवसेना गटनेते बंटी जोशी व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महापौरांचा वाजत गाजत व सन्मानपत्र देवून सत्कार केला होता.
याप्रकरणी शिवसेना संपर्क प्रमुखांनी रविवारी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेवून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच सदस्यांना वरिष्ठांना विचारल्या शिवाय करू नये अशी ताकीद दिली होती.
शिवसेनेतील अतंर्गत गटबाजी चव्हाट्यावर
महापालिकेत यापूर्वी भाजपमध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात होते. परंतू आता शिवसेनेत देखील अंतर्गत गटबाजी उघड झाले आहे. भाजप महापौरांचा सत्कार केल्या प्रकरणी शिवसेना गटनेता पदाचा जोशी यांनी राजीनामा दिला. तसेच संपर्क प्रमुखांनी बैठकीमधील चर्चा कुठे बाहेर जाता कामा नये असे सांगून देखील बैठकीतील माहिती बाहेर गेल्याने शिवसेनेची गटबाजी पून्हा चव्हाट्यावर आली आहे.