Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीगोंद्यात नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला आग

श्रीगोंद्यात नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला आग

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सोमवारी (दि.22) सायंकाळी सहा वाजता मोठी आग लागली यात हजारो टन कचरा जळून खाक झाला आहे. याच्या धुरामुळे परिसरातील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

- Advertisement -

श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन नीट नाटके होत नसल्याने परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रकल्पाला आग लागल्यानंतर अग्निशमन दल सज्ज झाले परंतु पाण्याचे अंतर व कचर्‍या पेटलेले अंतर 6 किलोमीटर असल्याने कचरा भिजवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.

श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये वर्षाला साधारण तीन कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन यासाठी खर्च केला जातो. रोजचा दहा टन कचरा संकलित होतो साधारण दोन वर्षाचा कचरा असल्यामुळे हजारो टन कचरा जळून खाक झालेला आहे. श्रीगोंदा नगरपरिषद ठेकेदारामार्फत हे सर्व करून घेत असते. ठेकेदाराचे काम शहरातील प्रत्येक घरातील कचरा गोळा करून त्याचे ओला सुका वेगळा करून कचरा डेपो या ठिकाणी नेला जातो. त्या ठिकाणी वर्गीकरण करून प्लास्टिक वेगळे केले जाते. असे सांगीतले जाते. प्रत्यक्ष या ठिकाणी असे काहीच दिसून येत नाही. मूळ ठेकेदार या ठिकाणी कधीच येत नाहीत. काही दिवसांपुर्वीच संभाजी ब्रिगेडने घनकचरा व्यवस्थापन डेपोला टाळे ठोकण्याचे तोंडी इशारा दिला होता.

या प्रकल्पाला 2017 ला मंजुरी मिळाली होती. गेली सहा वर्ष झाले त्या प्रकल्पातली एकही मोटर फिरली नाही. पालिका प्रशासनाचे घनकचरा डेपोकडे अक्षरशा दुर्लक्ष आहे. परिसरातील नागरिकांना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच कचरा पेटल्यानंतर परिसरामध्ये श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा परिसरामध्ये उग्र असा वास कायमस्वरूपी चालू असतो. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाला भेट दिली या प्रकल्पाची कंपाउंड भिंत उंच करून देऊ असे आश्वासन दिले परंतु याचे पुढे काहीच झाले नाही. येत्या काळात नगर विकास मंत्री यांना पत्रव्यवहार करणार आहोत. तसेच श्रीगोंदा नगर परिषदेने लवकरात लवकर हा प्रकल्प चालू न केल्यास संभाजी ब्रिगेड कचरा डेपोला टाळे ठोको आंदोलन छेडणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या